शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नैनिताल, चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर : मोहम्मद अजीज खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:57 IST

राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत.

ठळक मुद्देनैनिताल, चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर : मोहम्मद अजीज खानगोसेवा सद्भावनेनिमित्त सावंतवाडी शहरात पदयात्रा

सावंतवाडी : माझ्या संपूर्ण भारत भ्रमंतीत नैनिताल आणि चंदीगडपेक्षाही सावंतवाडी शहर सुंदर व स्वच्छ वाटले. ही सुंदरता अशीच कायम ठेवा, असे आवाहन गोसेवा सद्भावनेनिमित्त पदयात्रा करीत सावंतवाडीत आलेल्या मोहम्मद अजीज खान यांनी केले.राष्ट्रीय गोसेवा प्रकोष्ठ मुस्लीम संस्थेच्यावतीने खान यांनी १२ हजार किलोमीटरचा देश पायी जाण्याचा संकल्प सोडला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. लेहपासून कन्याकुमारी आणि आता कन्याकुमारीपासून अमृतसर असा प्रवास करत आहेत. ते सावंतवाडी शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचा सावंतवाडी नगरपालिका व वेदशाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मी आतापर्यंत २१ महिन्यात अनेक गावे, शहरे फिरलो. मात्र, सावंतवाडीसारखे सुंदर आणि स्वच्छ शहर कुठेही दिसले नाही. याचे सर्व श्रेय येथील नगराध्यक्षांना देणे क्रमप्राप्त असल्याचे ते म्हणाले. गोसेवेसाठी ही देशभ्रमंती सुरू केली आहे.

गाय वाचविण्याची गरज असून, त्यासाठी समाजातील सर्व थरातील लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गायीच्याबाबतीत राजकारण करणे चुकीचे आहे. गीता, गायत्री आणि राम हेच सर्व समाजासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे त्याचे कुणी राजकारण करत असेल तर ते अयोग्य आहे, असे मत मोहम्मद खान यांनी मांडले.गोसंवर्धन काळाची गरज : मोहम्मद खानगाईचे संवर्धन ही काळाची गरज असून, याबाबत जनजागृतीसाठी आपली पदयात्रा सुरू आहे. कॅन्सरमुक्त भारत असा पण करून आपल्या या पदयात्रेला सुरुवात केली आहे. गायीपासून मिळणारे पंचगव्य मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने बहुपयोगी आहे. विविध आजारांवर औषध म्हणून उपयोगी ठरणाऱ्या पंचगव्याचा कॅन्सरमुक्त होण्यासाठीही वापर केला जातो, अशी माहिती खान यांनी दिली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग