शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाविरोधात सरपंच एकटवले

By admin | Updated: December 30, 2015 00:34 IST

संगमेश्वरातील सरपंचांची बैठक : घरबांधणी निर्णयाविरोधात लढा देण्याची भूमिका

देवरूख : ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या घरबांधणीच्या सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा आदेश राज्य शासनाने पारीत केला आहे. याविरोधात संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच एकवटले असून, याबाबतची विशेष बैठक देवरूखमध्ये घेण्यात आली होती. या शासन निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला होता. दरम्यान, संगमेश्वर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात लढा देण्याची भूमिका संघटितरित्या घेऊया, असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातून आंबवली गावचे सरपंच दीपक सावंत व लोवले गावचे सरपंच चंद्रकांत ऊर्फ बावा चव्हाण यांनी केले. घर बांधणी परवानगीचे अधिकार राज्य शासनाने सरपंचांकडून काढून घेतले आहेत. यापुढे हे अधिकार नगररचनाकार विभाग, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेऊन तसा शासन निर्णयही जारी केला आहे. १९५८चे कलम ५२ नुसार यापूर्वी घरबांधणीकरिता परवानगी देण्याचे अधिकार सरपंचांना होते. यामुळे सर्वसामान्य जनतेला घरबांधणीकरिता अडचणीच्या फेऱ्या टळल्या जात होत्या. परवानगी ग्रामपातळीवर मिळत होती, ही प्रक्रिया सुलभ होती. मात्र, या अधिकारावरच गदा आणल्याने जिल्हाभरातून एकच संतापाची भावना व्यक्त होत आहे. याविरोधात आंबवली गावचे सरपंच दीपक सावंत, लोवले गावचे सरपंच बावा चव्हाण यांनी पुढाकार घेऊन देवरूख येथे तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील सरपंचांची तालुका कमिटीही निवडण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून शासनाने जारी केलेला आदेश रद्द करण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यात येणार आहे. शासनाचा हा आदेश सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याने याबाबत सरपंचांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. संगमेश्वर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील तमाम सरपंचांनी एकत्र येऊन सरपंचांच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या निर्णयावर संघर्ष करणे गरजेचे बनले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येण्याकरिता दीपक सावंत - आंबवली व बावा चव्हाण - लोवले यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात सरपंचांच्या एकीचे प्रदर्शन घडवत शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याकरिता एकत्रित लढण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)घरबांधणीच्या सरपंचांच्या अधिकारवर गदा.संघटितरित्या लढा देण्याचा निर्णय.घरबांधणीकरिता अडचणीच्या फेऱ्या टळल्या जात होत्या.शासनाच्या निर्णयामुळे जिल्हाभरातून संताप.तालुक्यातील सरपंचांची तालुका कमिटी स्थापन.जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येण्याचे आवाहन.