शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

शासन निर्णयाविरोधात सरपंच एकटवले

By admin | Updated: December 30, 2015 00:34 IST

संगमेश्वरातील सरपंचांची बैठक : घरबांधणी निर्णयाविरोधात लढा देण्याची भूमिका

देवरूख : ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या घरबांधणीच्या सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा आदेश राज्य शासनाने पारीत केला आहे. याविरोधात संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच एकवटले असून, याबाबतची विशेष बैठक देवरूखमध्ये घेण्यात आली होती. या शासन निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला होता. दरम्यान, संगमेश्वर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात लढा देण्याची भूमिका संघटितरित्या घेऊया, असे आवाहन संगमेश्वर तालुक्यातून आंबवली गावचे सरपंच दीपक सावंत व लोवले गावचे सरपंच चंद्रकांत ऊर्फ बावा चव्हाण यांनी केले. घर बांधणी परवानगीचे अधिकार राज्य शासनाने सरपंचांकडून काढून घेतले आहेत. यापुढे हे अधिकार नगररचनाकार विभाग, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेऊन तसा शासन निर्णयही जारी केला आहे. १९५८चे कलम ५२ नुसार यापूर्वी घरबांधणीकरिता परवानगी देण्याचे अधिकार सरपंचांना होते. यामुळे सर्वसामान्य जनतेला घरबांधणीकरिता अडचणीच्या फेऱ्या टळल्या जात होत्या. परवानगी ग्रामपातळीवर मिळत होती, ही प्रक्रिया सुलभ होती. मात्र, या अधिकारावरच गदा आणल्याने जिल्हाभरातून एकच संतापाची भावना व्यक्त होत आहे. याविरोधात आंबवली गावचे सरपंच दीपक सावंत, लोवले गावचे सरपंच बावा चव्हाण यांनी पुढाकार घेऊन देवरूख येथे तालुक्यातील सर्व सरपंचांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील सरपंचांची तालुका कमिटीही निवडण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातून शासनाने जारी केलेला आदेश रद्द करण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यात येणार आहे. शासनाचा हा आदेश सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याने याबाबत सरपंचांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. संगमेश्वर तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील तमाम सरपंचांनी एकत्र येऊन सरपंचांच्या अधिकारावर घाला घालणाऱ्या निर्णयावर संघर्ष करणे गरजेचे बनले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येण्याकरिता दीपक सावंत - आंबवली व बावा चव्हाण - लोवले यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यात सरपंचांच्या एकीचे प्रदर्शन घडवत शासनाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याकरिता एकत्रित लढण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)घरबांधणीच्या सरपंचांच्या अधिकारवर गदा.संघटितरित्या लढा देण्याचा निर्णय.घरबांधणीकरिता अडचणीच्या फेऱ्या टळल्या जात होत्या.शासनाच्या निर्णयामुळे जिल्हाभरातून संताप.तालुक्यातील सरपंचांची तालुका कमिटी स्थापन.जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येण्याचे आवाहन.