शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

पारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 12:12 IST

गेल्या काही दिवसात संदेश पारकर आणि त्यांचे सहकारी शासकीय रुग्णालय, वीज वितरण कार्यालय, महामार्ग कार्यालय , पोलीस स्टेशन व अन्य काही विभागांमध्ये जाऊन सरकार अपयशी ठरल्याचाच पुरावा एकप्रकारे त्यांच्यासमोर देत आहेत . रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्हीही अनेकदा आवाज उठवला होता . मात्र, संदेश पारकर यांच्या या कृतीतून भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्या साडेचार वर्षात खऱ्या अर्थाने अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.

ठळक मुद्देपारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोलारुग्णालयातील रिक्त पदांबाबत आवाज

कणकवली : गेल्या काही दिवसात संदेश पारकर आणि त्यांचे सहकारी शासकीय रुग्णालय, वीज वितरण कार्यालय, महामार्ग कार्यालय , पोलीस स्टेशन व अन्य काही विभागांमध्ये जाऊन सरकार अपयशी ठरल्याचाच पुरावा एकप्रकारे त्यांच्यासमोर देत आहेत . रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्हीही अनेकदा आवाज उठवला होता . मात्र, संदेश पारकर यांच्या या कृतीतून भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्या साडेचार वर्षात खऱ्या अर्थाने अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे , गटनेते संजय कामतेकर , किशोर राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी समीर नलावडे म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे संदेश पारकर यांनी येत्या सहा महिन्यात 100% भरावीत. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू . परंतु राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे अपयशी ठरल्याचा दाखला संदेश पारकर यांनी दिल्याबद्दल नगरपंचायतच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो.वीज वितरण मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा पुरावा कार्यकारी अभियंत्यांना भेट घेऊन त्यांनी सादर केला . या कृतीतून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे . त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार करण्यास कुचकामी ठरत असल्याचे या वेगवेगळ्या प्रश्नांवर दिसत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.ते पुढे म्हणाले, पारकर यांच्या या सरकारविरोधी भूमिकेविषयी भाजपाची भूमिका कोणती आहे ? ते पहिल्यांदा भाजपा जिल्हाध्यक्षांनी जाहीर करावे . साडेचार वर्षात सरकार अपयशी ठरल्याचे पारकर दाखवून देत आहेत . त्यामुळे शिवसेना भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पारकरांचा पराभव झाल्यामुळे आता पत्रकबाजी करून आपण कार्यरत असल्याचे दाखविण्याचा प्रकार संदेश पारकर करत आहेत . हिंमत असेल तर त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत. लोकांसमोर नौटंकी करून दिशाभूल करू नये. असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे.कणकवली भूमिगत वीज वाहिन्या बाबत निर्णय घ्यायला आम्ही सत्ताधारी म्हणून सक्षम आहोत . कणकवलीचा नगराध्यक्ष या नात्याने मी आणि मुख्याधिकारी भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प यशस्वीपणे राबविणार आहोत .यापूर्वी पारकर यांचे पंधरा नगरसेवक असायचे. मात्र, आता त्यांच्या हातात तीनच नगरसेवक आहेत त्यामुळे लोकांनी नाकारलेल्या पारकर यांना कणकवली शहराबद्दल बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही . आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदेश पारकर फक्त नौटंकी करत असल्याचा आरोप समीर नलावडे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग