शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कार्यकर्त्यांच्या उरातही ‘धकधक’

By admin | Updated: October 17, 2014 22:13 IST

लढत अटीतटीची : ‘सामंत की माने’ राजकीय गणित सुटेना---रत्नागिरी

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक यावेळी काय गूल खिलविणार, याबाबत सर्वांच्याच मनात ‘धकधक’ सुरू आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले उदय सामंत आपली आमदारकी तिसऱ्यांदा राखणार की, मोदी लाटेवर स्वार होत भाजपाचे बाळ माने विजयश्री खेचणार, याबाबतची राजकीय गणिते मांडण्यात सर्वजण गर्क आहेत. मतदानाआधी इकडे पॅक, तिकडे पॅक सांगणारेच आता या वाडीने फसविले, त्या वाडीने दगा दिला, असे सांगत असल्याने आधीच्या हिशेबात धरलेले ‘हातचे’ कमी झाले आहेत. घसरलेल्या टक्क्यामुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उरातही धडकी भरली आहे. सामंत-माने गणित सुटता सुटत नसल्याने ‘१९ ला पाहू’ असे सांगत अनेकांनी हे गणित सोडविणेच बंद केले आहे. रत्नागिरी मतदारसंघात १५ आॅक्टोबरला अत्यंत शांततेत मतदान झाले. मतदारसंघात यावेळी २ लाख ६५ हजार २०१ एवढी मतदारसंख्या होती. निवडणुकीतील चुरस पाहता त्यातील किमान ७० टक्के मतदान होईल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात ६४.६१ टक्के एवढेच मतदान झाले. २००९ मधील मतदान टक्केवारीच्या तुलनेत यावेळी मतदानात एक टक्का घसरला आहे. त्यातही यावेळी मतदारांची संख्या या मतदारसंघात ४४०० एवढी वाढली आहे. त्यामुळे घसरलेली टक्केवारी ही अधिक आहे. याचाच अर्थ एखाद्या पक्षाच्या मतदारांनी मतदानात भागच घेतला नाही, असा असू शकतो किंवा राजकीय उदासिनतेपोटी काहींनी मतदानच केले नसावे, असाही त्याचा अर्थ असावा, अशी चर्चा रंगली आहे. मतदानोत्तर स्थितीचा आढावा मतदारसंघातील काही जाणकारांकडून, कार्यकर्त्यांकडून घेतल्यानंतर त्यातून अनेक राजकीय कोड्यांचा उलगडा होताना दिसून येत आहे. रात्रीत काही वाड्या दुसऱ्या उमेदवाराच्या बाजूने फिरल्याची चर्चाही होत आहे. ज्या भागावर काही उमेदवारांची मदार होती तेथील मतदार व कार्यकर्त्यांनी त्यांना तोंडघशी पाडल्याच्या सुरस कथा आता रंगत आहेत. जयगड विभागात व रत्नागिरी शहरात भाजपाची स्थिती चांगली असल्याचा जाणकारांचा होरा आहे, तर नाचणे विभागासह ग्रामीण भागात सेनेची स्थिती भक्कम असल्याचा व शहराचा बॅकलॉग भरून काढण्याइतपत मतदान सेनेला झाल्याचा दावाही केला जात आहे. मतदारसंघात एकूण ९ जिल्हा परिषद गट असून, त्यामध्ये शिवसेनेचे चांगले वर्चस्व आहे. शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यासाठी शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केल्याने सामंत यांचा विजय निश्चित असल्याचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे मत आहे. आधी हो म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांनी रात्रीत दगा दिल्याची चर्चाही रंगली आहे. दुसरीकडे भाजपा कार्यकर्तेही ठामपणे मानेच निवडून येणार असल्याचे सांगत आहेत. या निवडणुकीत भाजपाबरोबर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही छुपी युती केली होती. त्यांची मतेही भाजपाकडे वळल्याची चर्चा आहे.शहर ठरणार निर्णायक!रत्नागिरी शहरात लोकसभा निवडणुकीच्या वेळी ३२ हजार मतदान झाले होते. विधानसभा निवडणुकीत त्यात ५ हजारांनी वाढ झाली असून, यावेळी शहरात एकूण ३७ हजार मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेली ही मते भाजपासाठी संघाची असल्याचीही चर्चा आहे. जे मतदार सहसा मतदानासाठी बाहेर पडत नाहीत, त्यांचीच ही मते असल्याच्या चर्चेने राजकीय गणित गुंतागुंतीचे बनले आहे. त्यातच यावेळी संघाने केलेल्या जोरकस प्रचारामुळे शहरात बाळ माने यांना ६ ते ७ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा भाजपा नेत्यांचाच दावा आहे. त्यामुळे शहरातील मतदान हे निकालात निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. ‘फॉर्च्युन’ कोणाला लाभणार?रत्नागिरी मतदारसंघातील या चौरंगी निवडणुकीत विजयासाठी सर्वच उमेदवारांनी नेट लावला असला तरी त्याचा लाभ कोणत्या उमेदवाला होणार, कोणत्या उमेवाराचे ‘फॉर्च्युन’ यावेळी वेगात असेल? विजयाचे ‘फॉर्च्युन’ कोणाला लाभणार, असे अनेक प्रश्न मतदारांमध्ये चर्चिले जात आहेत. त्याचे उत्तर मात्र १९ आॅक्टोबरलाच मिळणार आहे.