शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

भास्कर जाधव यांना सामंत यांचे प्रतिआव्हान

By admin | Updated: July 1, 2016 23:42 IST

विधानसभा : जाधव यांच्यासमोर कोठेही लढण्याची तयारी

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, असे सांगून आव्हान देणाऱ्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांना आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी प्रतिआव्हान दिले. रत्नागिरी किंवा गुहागरच काय, राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. रत्नागिरीतून मीच काय, सेनेच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवली तरी जाधव यांचा पराभव निश्चित आहे, असेही सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठणकावले.रत्नागिरी माळनाका येथे गुरुवारी (दि. ३०) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, त्यावेळी आमदार जाधव यांनी सामंत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर चौफेर टीकाही केली होती. आघाडीच्या काळात झालेली कामे आपण केल्याचे सांगून आमदार सामंत श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याबाबत बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मी राष्ट्रवादीत आमदार असताना आघाडीच्या काळात येथे विकासकामे झाली हे मान्य आहे. परंतु, गद्दारीचा विषय आता जुना झाला आहे, हे कोणीतरी जाधव यांना सांगण्याची गरज आहे. मेळाव्याच्यावेळी व्यासपीठावर असलेल्यांपैकी एक-दोघे सोडले तर बाकीच्या लोकांची निष्ठा जाधव यांनी तपासून बघायला हवी. गद्दारीचा आरोप माझ्यावर करताना मेळाव्यात व्यासपीठावर असलेल्यांनी किती वेळा गद्दारी केली, याचा इतिहास प्रथम जाधव यांनी तपासून घ्यावा, असेही सामंत म्हणाले.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील १०९ पैकी ९४ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. ११ ग्रामपंचायती भाजपकडे, दोन गाव पॅनेलकडे, एक कॉँग्रेसकडे, तर रत्नागिरी तालुक्यात बळ वाढत असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे केवळ एक ग्रामपंचायत आहे. जाधव यांना त्यांच्याच पक्षातील लोक चुकीची माहिती देत आहेत. चुकीच्या माहितीवर बोलणे राष्ट्रवादीतील जबाबदार व्यक्तीला कितपत शोभते, हा खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)संधिसाधूंकडून जाधव यांचा ढालीसारखा वापरजाधव हे प्रामाणिक आहेत, तसेच भावनाशीलही आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही सांगितले की तेच सत्य मानून भावनेच्या भरात ते बेधडक बोलत जातात. त्याचाच फायदा त्यांच्या पक्षात त्यांच्याबरोबर वावरणारे लोक घेत आहेत. स्थानिक नेते जाधव यांना ढाल म्हणून पुढे करीत स्वत:चा उद्देश साध्य करून घेत आहेत. जाधव यांच्या मागेपुढे फिरत आपण पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, असे म्हणणाऱ्यांनीच अनेकदा गद्दारी केल्यामुळे अशा संधिसाधूंसाठी ढाल बनायचे की नाही, हे आता जाधव यांनीच ठरवावे, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.