शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भास्कर जाधव यांना सामंत यांचे प्रतिआव्हान

By admin | Updated: July 1, 2016 23:42 IST

विधानसभा : जाधव यांच्यासमोर कोठेही लढण्याची तयारी

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार, असे सांगून आव्हान देणाऱ्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांना आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी प्रतिआव्हान दिले. रत्नागिरी किंवा गुहागरच काय, राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची आपली तयारी आहे. रत्नागिरीतून मीच काय, सेनेच्या कोणत्याही उमेदवाराने निवडणूक लढवली तरी जाधव यांचा पराभव निश्चित आहे, असेही सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठणकावले.रत्नागिरी माळनाका येथे गुरुवारी (दि. ३०) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता, त्यावेळी आमदार जाधव यांनी सामंत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर चौफेर टीकाही केली होती. आघाडीच्या काळात झालेली कामे आपण केल्याचे सांगून आमदार सामंत श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याबाबत बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मी राष्ट्रवादीत आमदार असताना आघाडीच्या काळात येथे विकासकामे झाली हे मान्य आहे. परंतु, गद्दारीचा विषय आता जुना झाला आहे, हे कोणीतरी जाधव यांना सांगण्याची गरज आहे. मेळाव्याच्यावेळी व्यासपीठावर असलेल्यांपैकी एक-दोघे सोडले तर बाकीच्या लोकांची निष्ठा जाधव यांनी तपासून बघायला हवी. गद्दारीचा आरोप माझ्यावर करताना मेळाव्यात व्यासपीठावर असलेल्यांनी किती वेळा गद्दारी केली, याचा इतिहास प्रथम जाधव यांनी तपासून घ्यावा, असेही सामंत म्हणाले.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील १०९ पैकी ९४ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे. ११ ग्रामपंचायती भाजपकडे, दोन गाव पॅनेलकडे, एक कॉँग्रेसकडे, तर रत्नागिरी तालुक्यात बळ वाढत असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे केवळ एक ग्रामपंचायत आहे. जाधव यांना त्यांच्याच पक्षातील लोक चुकीची माहिती देत आहेत. चुकीच्या माहितीवर बोलणे राष्ट्रवादीतील जबाबदार व्यक्तीला कितपत शोभते, हा खरा प्रश्न असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)संधिसाधूंकडून जाधव यांचा ढालीसारखा वापरजाधव हे प्रामाणिक आहेत, तसेच भावनाशीलही आहेत. त्यामुळे त्यांना कोणी काही सांगितले की तेच सत्य मानून भावनेच्या भरात ते बेधडक बोलत जातात. त्याचाच फायदा त्यांच्या पक्षात त्यांच्याबरोबर वावरणारे लोक घेत आहेत. स्थानिक नेते जाधव यांना ढाल म्हणून पुढे करीत स्वत:चा उद्देश साध्य करून घेत आहेत. जाधव यांच्या मागेपुढे फिरत आपण पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, असे म्हणणाऱ्यांनीच अनेकदा गद्दारी केल्यामुळे अशा संधिसाधूंसाठी ढाल बनायचे की नाही, हे आता जाधव यांनीच ठरवावे, असा टोलाही आमदार सामंत यांनी लगावला.