शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

खारे पाणी शेतीत घुसले

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

पाल-गोडवणेवाडीतील शेतकऱ्यांचे नुकसान

वेंगुर्ले : पाल-गोडवणेवाडी येथील खारलॅण्ड बंधाऱ्याच्या मोरीला फळ्या नसल्यामुळे खारे पाणी शेतीत घुसून सुमारे १५ ते २० एकर वायंगणी भातशेती, पाच एकर माड बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. याबाबत वेळोवेळी संंबंधित विभागास लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून ढासळलेले बंधारे व मोऱ्यांची डागडुजी करावी, अशी मागणी खारलॅण्ड उपविभाग वेंगुर्ले यांच्याकडे पाल ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे. पाल-गोडवणेवाडी येथून मोचेमाड खाडी जात असून खारे पाणी शेत जमिनीत व माड बागायतीत येऊ नये, यासाठी शासनाच्या खारलॅण्ड विभागाने तुळस ते आसोली हद्दीपर्यंत धूपप्रतिबंधक बंधारे व ठिकठिकाणी मोऱ्या बांधल्या आहेत. या बंधाऱ्यांना सुमारे २५ वर्षे उलटून गेली असून याकडे गेल्या पंचवीस वर्षात खारलॅण्ड विभागाने देखभाल दुरुस्तीची कामेच केली नाहीत. त्यामुळे नदीकडेने असलेले बंधारे ढासळल्याने तसेच मोरी लिकेज झाल्याने खारे पाणी भातशेतीत, माड बागायतीत घुसून शेती व बागायती नापीक झाली आहे. यामुळे स्थानिक लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळील पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून वेळोवेळी लेखी निवेदनेही दिली होती. परंतु याकडे खारलॅण्ड विभागाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने वेंगुर्ले खारलॅण्ड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पाल-गोडवणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)