शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

खारे पाणी शेतीत घुसले

By admin | Updated: December 28, 2014 00:11 IST

पाल-गोडवणेवाडीतील शेतकऱ्यांचे नुकसान

वेंगुर्ले : पाल-गोडवणेवाडी येथील खारलॅण्ड बंधाऱ्याच्या मोरीला फळ्या नसल्यामुळे खारे पाणी शेतीत घुसून सुमारे १५ ते २० एकर वायंगणी भातशेती, पाच एकर माड बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. याबाबत वेळोवेळी संंबंधित विभागास लेखी तक्रारी करूनही कोणतीच कारवाई न केल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून ढासळलेले बंधारे व मोऱ्यांची डागडुजी करावी, अशी मागणी खारलॅण्ड उपविभाग वेंगुर्ले यांच्याकडे पाल ग्रामपंचायतीने ठराव करून केली आहे. पाल-गोडवणेवाडी येथून मोचेमाड खाडी जात असून खारे पाणी शेत जमिनीत व माड बागायतीत येऊ नये, यासाठी शासनाच्या खारलॅण्ड विभागाने तुळस ते आसोली हद्दीपर्यंत धूपप्रतिबंधक बंधारे व ठिकठिकाणी मोऱ्या बांधल्या आहेत. या बंधाऱ्यांना सुमारे २५ वर्षे उलटून गेली असून याकडे गेल्या पंचवीस वर्षात खारलॅण्ड विभागाने देखभाल दुरुस्तीची कामेच केली नाहीत. त्यामुळे नदीकडेने असलेले बंधारे ढासळल्याने तसेच मोरी लिकेज झाल्याने खारे पाणी भातशेतीत, माड बागायतीत घुसून शेती व बागायती नापीक झाली आहे. यामुळे स्थानिक लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जवळील पिण्याचे पाणीही खराब झाले आहे. धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची दुरुस्ती व्हावी, यासाठी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून वेळोवेळी लेखी निवेदनेही दिली होती. परंतु याकडे खारलॅण्ड विभागाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्यावतीने वेंगुर्ले खारलॅण्ड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी पाल-गोडवणेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)