शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भगवा फडकला

By admin | Updated: October 19, 2014 22:25 IST

नारायण राणेंचा पराभव : शिवसेनेचे वैभव नाईक, दीपक केसरकर तर काँग्रेसचे नीतेश राणे विजयी

सिंधुदुर्गनगरी : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रचारप्रमुख तथा माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तब्बल १० हजार ३७६ मतांनी पराभूत केले. १९९० पासून २०१४ पर्यंत सलग २५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर राजकीयदृष्ट्या वर्चस्व गाजविणाऱ्या राणे यांना विजयात सातत्य राखण्यापासून नाईक यांनी रोखले आहे. वैभव नाईक यांना ७० हजार ५८२ तर नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली. तर सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांनी आपल्या सर्व विरोधकांना धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय मिळवत ही सावंतवाडीची जागाही शिवसेनेकडे खेचून आणली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ वर्षानंतर पुन्हा दोन आमदार आल्याने सिंधुदुर्गात भगवा डौलाने फडकला आहे.एकीकडे सावंतवाडी आणि कुडाळमध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व राखले असले तरी कणकवली मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांचा २५ हजार ९७९ एवढ्या मोठ्या मताधिक्याने काँगे्रसच्या नीतेश राणे यांनी पराभव करीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसतर्फे एकमेव आमदार होण्याची संधी मिळवली आहे.१९९० पासून सलग सहावेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या नारायण राणे यांची विजयी घोडदौड शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी रोखली आहे. या पराभवानंतर नारायण राणे आता राजकारणात कोणती भूमिका घेतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कासार्डे येथे प्रचार सभा होऊनदेखील भाजपाचे एकमेव आमदार असलेल्या प्रमोद जठार यांचा पराभव झाल्याने सिंधुदुर्गात मोदी लाटेचा कोणताही प्रभाव दिसून आला नाही. मतदारसंघ एकत्रित असताना युतीची राजवट वगळता देवगड मतदारसंघ कायमच विरोधी पक्षात राहिला होता. या निवडणुकीतदेखील कणकवली मतदारसंघ पर्यायाने देवगड तालुका काँग्रेसच्या रूपाने विरोधी पक्षात राहणार आहे. मात्र, नारायण राणे यांना विरोध म्हणून कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघाने शिवसेनेच्या पदरी घवघवीत यश टाकले आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन जागांपैकी दोन जागा शिवसेना तर एक जागा काँग्रेसकडे आली आहे. गत निवडणुकीप्रमाणेच तीनपैकी एका जागेवरच काँग्रेसला समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे नारायण राणेंची राजकीय इनिंग संपून नीतेश राणेंच्या इनिंगला सुरूवात झाली आहे. (प्रतिनिधी)कोणत्या कारणामुळेपक्ष जिंकलाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थ साथीमुळे वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघात कार्यकर्त्यांना हाताशी धरून घवघवीत यश संपादन केले.नारायण राणे यांना विरोध तसेच काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांबाबतची नाराजी, जनसंपर्क कमी ठेऊन ग्रामीण भागात विकासकामांबाबत असलेल्या नाराजीचा फटका काँग्रेसला या निवडणुकीत बसल्याने नारायण राणेंसारख्या नेत्याचा पराभव झाला.वैभव नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष संघटना वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. तसेच विविध आंदोलनांद्वारे आघाडी सरकारबाबत लोकांच्या मनात असलेल्या खदखदीला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच ते या खेळीत यशस्वी झाले.ठळक वैशिष्ट्येराज्याचे माजी उद्योगमंत्री नारायण राणे विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभूत झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कासार्डे येथे प्रचारसभा घेऊनही प्रमोद जठार निवडून येऊ शकले नाहीत.दीपक केसरकर यांनी सर्व विरोधी उमेदवारांना पराभवाची धूळ चारत तब्बल ४१ हजार १९२ मतांनी विजय संपादन केला.