शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था : परशुराम उपरकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:08 IST

जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देशासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था : परशुराम उपरकर  जिल्हा शल्यचिकित्सकांकडून केवळ केला जाताहेत उद्घाटने

कणकवली : सिंधुदुर्गचे जिल्हा शल्यचिकित्सक मंत्र्यांना खूश करण्यासाठी डायलिसिस, आयसीयू सारख्या सेवांची उद्घाटने करीत आहेत. यापूर्वी माजी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते एमआरआय मशीन व सीटी स्कॅन मशिनचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या मशीन बंद आहेत.

जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी दोन दिवस जिल्ह्यात तर इतर दिवस आपल्या गावी जाऊन बसतात. याकडे जिल्हा शल्यचिकित्सक लक्ष देत नाहीत. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेची दयनीय अवस्था झाली आहे, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपरकर म्हणाले, जिल्हा शल्य चिकित्सक जनतेबरोबरच मंत्र्यांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चालू करण्यात आलेली डायलिसिस व आयसीयू सेवा बंद आहे. आयसीयूमध्ये केवळ एसी लावून खोली थंड करण्यात आली आहे.जिल्हा रुग्णालयात डॉक्टर सकाळी ९ ऐवजी ११.३० पर्यंत येतात. तर जिल्हा शल्यचिकित्सक दुपारी १२ वाजता येत असतात. मुख्यालयात न राहता बरेचशे डॉक्टर आपापल्या जिल्ह्यात जाऊन काम करतात. त्याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचा लक्ष नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक एस. एस. पाटील व जिल्हा रुग्णालयातील डॉ. गावकर हे केवळ दोन दिवस सेवा बजावून आपापल्या गावात जात असतात, असा आरोप परशुराम उपरकर यांनी यावेळी केला.जिल्हा रुग्णालयात हिंद लॅबमध्ये चुकीच्या पध्दतीने रक्त तपासणीचे अहवाल दिले जात आहेत. अणावमधील एका रुग्णाला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त तपासणी केल्यानंतर चुकीचा अहवाल दिला. त्यामुळे चार तासांत त्या रुग्णाला हृदयविकाराचा धक्का बसला. जिल्हा शल्यचिकित्सक या सगळ्या सेवांकडे दुर्लक्ष करीत आहेत. केवळ कार्यालयीन कामकाज पाहतात. रुग्णांची स्वत: तपासणी करत नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सक हे भूलतज्ज्ञ आहेत. मात्र, त्यांनी एका तरी शस्त्रक्रियेच्यावेळी उपस्थिती दर्शविली का? असा प्रश्न आहे.पूर्वीच्या पालकमंत्र्यांना जशी चुकीची माहिती देऊन फसवणूक केली जात होती. तशी फसवणूक या नव्या पालकमंत्र्यांची केली जात आहे. आयसीयू चालविण्यासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, फिजिशियन व लागणारा स्टाफ नसतानादेखील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात आली आहे.आरोग्य यंत्रणा सुधारत नसल्याने जनतेने या विरोधात आवाज उठवावा. मनसे त्यांच्या पाठीशी राहिल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेकरूंना टोलमाफी द्यागणेशोत्सव काळात ज्याप्रमाणे चाकरमान्यांना टोलमाफी दिली जाते तशीच आंगणेवाडी यात्रा व कुणकेश्वर यात्रेसाठी मुंबई, पुणे येथून येणाऱ्या भक्तांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आपण केली आहे, असे परशुराम उपरकर यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग