शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
3
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
4
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
5
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
6
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
7
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
8
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
9
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!
10
हरितालिका तृतीया २०२५: व्रत पूजेचे सगळे साहित्य घेतले ना, काही राहिले तर नाही? पाहा, यादी
11
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
12
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
13
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
14
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
15
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
16
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
17
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
18
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
19
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
20
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!

सावंतवाडीत युवकांच्या अटकेची अफवा

By admin | Updated: August 22, 2014 01:06 IST

अन्य आरोपींच्या अटकेसाठी उद्या काँग्रेसचा मोर्चा : अत्याचार प्रकरणावरून राजकीय आरोपांची धुळवड कायम

सावंतवाडी : युवतीच्या अत्याचार प्रकरणावरून सावंतवाडीत सध्या जोरदार अफवांचे पिक पसरले आहे. गुरूवारी सकाळी शहरातून पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातमीने सर्वत्र एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांशी संपर्क केला असता, अशी कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे सांगत पोलिसांनी अफवेचे खंडन केले आहे. तर बुधवारी सावंतवाडीत उडालेला राजकीय धुरळा गुरूवारीही कायम होता.काँग्रेसने या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी उघड माथ्याने फिरत आहेत. त्यांच्या अटकेसाठी शनिवार, २३ आॅगस्ट रोजी धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तर शिवसेनेने आमच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस धमकी देत असल्याचा आरोप केला आहे. मनसेने या प्रकारात स्थानिक पोलिसांना जबाबदार धरले आहे.मात्र, या प्रकरणात सावंतवाडीतील आणखी काही युवकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रत्यदर्शींनी पाहिल्याने हे प्रकरण या सहाजणांपुरते मर्यादीत न राहता उर्वरित आरोपींवरही कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व थरातून होत आहे. दरम्यान, मंगळवारी सहा आरोपींना अटक केल्यानंतर अद्यापपर्यंत कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. पण आणखी काही आरोपींना अटक करण्यात आली, अशी अफवा गेले दोन दिवस शहरात पसरवण्यात येत आहे. गुरूवारी तर राजवाड्यानजीक एका बारमधून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात बड्या धेंड्याचे मुलगे आहेत, असे सांगण्यात आले. मात्र, सावंतवाडी पोलीस तसेच ओरोस पोलीस यांच्याशी याबाबत संपर्क केला असता, असे कोणतेही आरोपी पकडण्यात आले नाही, असे सांगण्यात आले तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती ही पोलिसांनी केली आहे.ही कारवाई स्थानिक पोलिसांनी केली नाही तर ती ओरोस येथील पोलिसांनी केली असल्याचे हे राजकीय पक्ष सांगत आहेत. तसेच आपल्याकडील काही प्रकरणे लवकरच पोलिसांजवळ देणार असल्याचे काहींनी सांगितले. सावंतवाडी शहरातील अल्पवयीन मुलीचा प्रकार पुढे आल्यानंतर असे अनेक प्रकार दिवसा ढवळ्या घडत असल्याचे पुढे येत आहे. यात सावंतवाडी शहरातील काही युवक नेहमी किमती मोबाईल तसेच आलिशान गाड्यांचा वापर करीत काही कॉलेज तरूणींना भुरळ घालतात आणि त्यांना फिरायला नेतात, अशा तक्रारी पोलिसांकडे प्राप्त आहेत. पण पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अशामुळे हे प्रकार वाढीस लागत असून, आता तरी पोलिसांनी जागे व्हावे, अशी अपेक्षा शहरातील नागरिक करत आहेत.गुरूवारी काँग्रेसने पत्रकार परिषद घेत एका महिला पदाधिकाऱ्याच्या मुलावर थेट आरोप केला आहे. हा मुलगा संबंधित मुलीच्या घरी रात्रीचा काय करीत होता. अनेकवेळा त्याचे आई व वडिल त्याला घरी घेऊन गेले आहेत. मग एवढा सभ्यतेचा आव आणून मुलाला वाचवण्यासाठी काही महिला पदाधिकारी या अंकुर महिला निवारण केंद्राच्या फेऱ्या का मारत आहेत, असा सवाल काँग्रेस उपस्थित करत आहे. तसेच या मुलाव्यतिरिक्त आणखी काही युवक असूून, हे युवक सध्या खुलेआम फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई का नाही, याप्रकरणातील आरोपींची यादी मोठी आहे. यातील सर्वांची नावे पोलिसांकडे देणार असल्याचेही काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे. याच्या तपासाची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)