शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

आरपीआय जिल्हाध्यक्षांसह चौघांना मारहाण, शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली/खारेपाटण : तालुक्यातील चिंचवली-बौद्धवाडी स्मशानभूमीचा वाद आणखीनच चिघळला आहे. त्यातूनच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्यासह चौघांना शिवीगाळ करीत मारहाण झाली आहे. गंभीर जखमी असलेल्या कांबळे यांच्यावर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल ...

लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली/खारेपाटण : तालुक्यातील चिंचवली-बौद्धवाडी स्मशानभूमीचा वाद आणखीनच चिघळला आहे. त्यातूनच रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांच्यासह चौघांना शिवीगाळ करीत मारहाण झाली आहे. गंभीर जखमी असलेल्या कांबळे यांच्यावर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, यावेळी तानाजी कांबळे यांच्यासोबत मारहाण झालेले रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चेमहाराष्ट्र सचिव तसेच सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक मधुकर देऊ मोहिते (६१, रा. ठाणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी चिंचवली येथील तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांच्यासह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मधुकर मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे की, चिंचवली-बौध्दवाडी येथील स्मशानभूमीच्या प्रश्नाबाबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना तेथील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. मंत्री बडोले यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाºयांना त्याबाबत कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रांताधिकाºयांची एक सदस्यीय समिती नेमली होती. त्यामुळे प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी १0 आॅगस्ट रोजी चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयात संबधित ग्रामस्थांची बैठक बोलविली होती. तसेच प्रांताधिकाºयांनी या बैठकीला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांना पत्र देऊन निमंत्रित केले होते.त्यामुळे तानाजी कांबळे यांच्यासोबत पक्षाचा सचिव म्हणून आपण इतर पदाधिकारी व सहकाºयांसोबत तिथे गेलो होतो. त्यावेळी आमच्यासोबत चिंचवली बौध्दवाडी येथील स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते. गुरुवारी दुपारी १२.३0 वाजता आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहोचलो. ग्रामपंचायतीच्या गेटसमोर सूर्यकांत भालेकर, स्वप्नील भालेकर, सुनील भालेकर, रविंद्र गुरव, राजू भालेकर, श्रीकृष्ण भालेकर, श्रीकांत भालेकर, देवेश भालेकर, अनिल पेडणेकर, प्रवीण गुरव, जयदास भालेकर, सागर भालेकर असे ४0 ते ४५ लोकांचा जमाव होता.त्यांनी आम्हांला बैठकीच्या ठिकाणी जायला अटकाव केला. तसेच तुम्हांला आत जाता येणार नाही. तुम्ही बाहेर थांबा असे सांगितले. आम्हांला प्रांताधिकाºयांनी बोलाविल्याचे आम्ही भालेकर यांना सांगितले. मात्र, त्यांनी काहीही न ऐकता माझ्या थोबाडीत मारली. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. मी जमिनीवर पडल्यावरही मारहाण करण्यात आली. यामध्ये इतर लोकही सहभागी होते. त्यामुळे माझ्या उजव्या हाताला मार लागलेला आहे. तसेच माझा मोबाईल गहाळ झाला असून चष्माही तुटला आहे.त्याचप्रमाणे माझ्यासोबत असलेले तानाजी कांबळे, त्यांची पत्नी आरती कांबळे व त्यांचा मुलगा अभिषेक यांनाही लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच सूर्यकांत भालेकर यांच्यासह इतरांनी तानाजी कांबळे तेथून पळत असताना त्यांची पाठ धरून रस्त्याच्या बाजूच्या गटारात पाडून दंडुक्याने मारहाण केली. त्याचबरोबर शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्या पाठीला, डोक्याला जबर मार लागला आहे.त्यावेळी तिथे रूपेश कांबळे, सचिन पवार, शोभा कांबळे, गंगाधर कांबळे हे ग्रामस्थ उपस्थित होते. मला स्वप्नील भालेकर मारहाण करीत असताना शोभा कांबळे यांनी त्यांच्या हातात असलेला दंडुका पकडल्याने माझे प्राण वाचले आहेत, असेही या तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तानाजी कांबळे यांच्यासह जखमी झालेल्यांना काही कार्यकर्त्यांनी उपचारासाठी तत्काळ कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर तानाजी कांबळे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे एकच हलकल्लोळ उडाला. त्यामुळे या घटनेची माहिती घेत प्रांताधिकारी नीता सावंत यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.प्रांताधिकाºयांकडूनअक्षम्य दुर्लक्षमारहाणीची घटना घडत असताना प्रांताधिकारी कार्यालयात फक्त बसून राहिल्या. त्यांनी या घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांनी वेळीच कृती करणे आवश्यक होते. तर घटनेनंतर दीड तासाने पोलीस घटनास्थळी आले. त्यामुळे त्यांना या घटनेचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होते, असे मधुकर मोहिते यांनी पोलीस ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.कार्यकर्त्यांची रुग्णालयात धाव !या घटनेवेळी आरपीआयचे जिल्हा सचिव मोहन जाधव, मुंबई जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. घटनेची माहिती समजताच आरपीआयचे उपाध्यक्ष खंबाळकर तसेच कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. नाना डामरेकर, संदीप कदम, रमाकांत जाधव,आदी नेतेही उपजिल्हा रुग्णालय तसेच पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.