शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

तिलारी घाटातील निम्मा रस्ता खचल्याने घाट वाहतुकीस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 18:02 IST

नजीकच्या गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्याला कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट शुक्रवारी पहाटे कोसळला.

दोडामार्ग : नजीकच्या गोवा राज्याबरोबरच दोडामार्ग तालुक्याला कोल्हापूरशी जोडणारा तिलारी घाट शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने या वेळी वाहतुकीची वर्दळ नसल्याने कोणताही अपघात झाला नाही.  मात्र निम्मा रस्ता खचल्याने हा घाट वाहतुकीसाठी अनिश्चित काळाकरिता बंद करण्यात आला आहे.दोडामार्ग आणि पर्यायाने गोवा राज्याला घाट माथ्याशी अर्थात कोल्हापूर जिल्ह्याची जोडण्यात तिलारी घाट महत्त्वाचा आहे.  अत्यंत नागमोडी वळणे आणि अति तीव्र उतारामुळे वाहतुकीसाठी अवघड घाट अशी ओळख या घाटाची आहे.  रामघाट या नावानेही या घाटाला ओळखले जाते.  तिलारी प्रकल्पाचे काम करताना यंत्रसामग्रीचे ने-आण करण्यासाठी पाटबंधारे विभागाने हा घाट तयार केला होता.  गेली 35 वर्षे हा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात होता.  मात्र गेल्या वर्षीच बांधकाम विभागाने हा घाट आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूर विभागाकडे वर्ग केला.  त्यानंतर या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले.  जवळपास तीन कोटी रुपये खर्ची घालून घाटातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली.  तर चार महिन्यापूर्वी संरक्षक कठड्यांचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते.  त्यामुळे घाटातील वाहतूक वर्षभरापासून वाढली होती.  अत्यंत जवळचा रस्ता असल्याने बेळगाव व कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणी जाणारी बरीचशी वाहतूक या मार्गाने होत होती.  शिवाय आंबोली घाटाला पर्याय म्हणून तिलारीकडे पाहिले जात होते. मात्र शुक्रवारी पहाटे हा घाट कोसळला. शुक्रवारी पहाटे कोंबड्यांची गोव्याकडे वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घाट कोसळल्याची घटना उघडकीस आली.  त्यानंतर या ठिकाणी दगड ठेवून उपाययोजना करण्यात आली.  मात्र हा रस्ता निम्मा खचल्याने आणि पावसात आणखीन खचण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने अनिश्चित काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे.  घाटाच्या पायथ्याशी व माथ्यावर दोन्हीकडे घाट बंद असल्याचे वाहनचालकांना सूचित करण्यासाठी पोलिस कर्मचारी ठेवण्यात आले आहेत.जिओच्या केबल खोदाईचा घाटाला फटका? जिओ कंपनीच्या केबल टाकण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करण्यात आली होती.  या खोदाई वेळी घाट रस्त्याला धक्का बसला.  केबल टाकल्यानंतर चर बुजवण्यात आले.  मात्र बाजू पट्टी भक्कम करण्यात आली नाही त्यामुळे पावसाचे पाणी आत मध्ये झिरपून नव्याने बांधलेल्या संरक्षक कठड्यासह रस्ता कोसळला आणि  घाट वाहतुकीस बंद झाल्याचा अंदाज वाहनचालकांमध्ये वर्तविला जात आहे.लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव तिलारी घाट कोसळल्याचे समजतात तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली.  जि.प.सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सेनेचे उपजिल्हासंघटक गोपाळ गवस,  महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संतोष नानचे,  शैलेश दळवी, बाबा जुवेकर,  खानयाळे सरपंच विनायक शेट्ये  आदींनी कोसळलेल्या घाटाची पाहणी करीत या दुर्घटनेला जिओचा ठेकेदार कारणीभूत असल्याचा आरोप केला.

मातीचा गाळ रस्त्यावरतिलारी घाट कोसळल्यामुळे या घाटातील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आली.  ज्या ठिकाणी हा रस्ता खचला तिथून शंभर फूट खोल दरीत रस्त्याचा असलेला भाग, माती, दगड,  गाळ व झाडे रस्त्यावर खालच्या बाजूला पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आली त्यामुळे रस्ता गाळाने माखला होता.