शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्नपूर्णा नदीतील गाळ काढला

By admin | Updated: May 3, 2016 00:36 IST

देवगड तहसीलदारांचा पुढाकार : प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम, लोकसहभागातून कामाचा प्रारंभ

देवगड : तालुक्यातील देवगड जामसंडे गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ देवगड तहसीलदार जीवन देसाई यांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून काढण्यात आला. कित्येक वर्षे जे लोकप्रतिनिधींना शक्य झाले नाही ते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करून दाखविले आहे. लोकसहभागातून अन्नपूर्णा नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी चिरेखाण मालक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद साटम, सेक्रेटरी काका जेठे, खजिनदार बाबा कोकरे, मिठबाव सरपंच जयकुमार नारिंग्रेकर, दहिबाव सरपंच शरद परब, नारिंग्रे सरपंच स्वाती बापट, शरद ठुकरूल, योगेश चांदोस्कर आदी उपस्थित होत. नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्याचे महत्त्वाचे पाऊलएप्रिलपासून उष्म्याचा जोर वाढू लागला. मे महिन्याच्या प्रारंभीच तीव्र उष्मा जाणवू लागला असून त्यामुळे पाण्याची पातळीही घटत आहे. अशा स्थितीत देवगड नळयोजनेच्या जलवाहिनीची गळती हा गंभीर प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. गळतीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने देवगड जामसंडे भागातील नळग्राहकांना पाण्याची चणचण भासत आहे. तसेच विद्युतपुरवठा अचानक खंडित झाल्यास अथवा पंपिंग यंत्रणेत बिघाड झाल्यास पाणीपुरवठा बंद होतो. याच कालावधीत देवगड अथवा जामसंडे गावांना पाणीपुरवठा करण्याचा दिवस असेल तर पाणीपुरवठा होत नाही. दरम्यान, एक दिवस आड करून पाणीपुरवठा केला जात असल्याने यापैकी एका गावाला तीन ते चार दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.देवगड जामसंडे ही दोन्ही गावे कातळावर वसल्याने व समुद्राच्या नजीक असल्याने या भागात उन्हाचे चटके बसू लागल्यावर पाण्याची पातळीही कमी होत जाते. परिणामत: विहिरी आटतात. विंंधन विहिरींमधूनही पाणी मिळत नाही. पाण्याचा इतर कुठलाही स्रोत नसल्याने या दोन गावांना पाण्यासाठी नळयोजनेवरच विसंबून राहावे लागते. देवगड तालुक्यात देवगड जामसंडे ही सर्वांत जास्त लोकसंख्येची गावे आहेत. दिवसेंदिवस तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या या गावामध्ये झपाट्याने वसाहती वाढत असून शहरीकरणाच्या वाढीमुळे पाण्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी व प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या सहकार्यातून या दोन गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दहिबाव नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे तहसीलदार जीवन देसाई यांनी सांगीतले.++नदीपात्रात धूप प्रतिबंधक बंधारा बांधणार : देसाईमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून नदीच्या दुतर्फा धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रथम एका बाजूच्या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन देसाई यांनी दिली. तसेच देवगड, जामसंडे, दहिबांव, तांबळडेग, बागमळा, हिंदळे, नारिंग्रे, किंजवडे, मिठबांव, कोटकामते, खुडी, मोर्वे या गावांना पाणीपुरवठा होतो त्या विहिरींचे गाळ काढण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे.देसाई यांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुकसध्या कार्यरत असलेल्या नळयोजनेच्या मुख्य दुखण्यांकडे लक्ष दिल्यास पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही, हा दृष्टिकोन ठेवून तहसीलदार जीवन देसाई यांनी लोकसहभागातून केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी दहिबाव नदीतील गाळ लोकसहभातून काढण्याच्या कामाला देवगड चिरेखाण मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.