शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बारकोड नोंदीनंतरच दाखल्यावर सही

By admin | Updated: May 22, 2015 00:15 IST

सुशांत खांडेकर : महसूल खात्याला आली जाग

राजापूर : तीन महिन्यांपूर्वी राजापुरात खळबळ उडवून देणाऱ्या जातीच्या बनावट दाखल्याच्या प्रकरणानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. बारकोडची आॅनलाईन नोंद झाल्याशिवाय दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे सेतू कार्यालयातून वितरित होणाऱ्या दाखल्यांच्या रजिस्टरचीही नियमित तपासणी करण्यात येणार असल्याचे खांडेकर यांनी म्हटले आहे. राजापुरातील महा - ई सेवा केंद्रातून जातीच्या बनावट दाखल्याचे वितरण करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणामुळे महसूल खात्यावर टीकेची चौफेर झोड उठली होती. महसूल खात्याच्या कारभाराचा हा पंचनामाच असल्याच्या प्रतिक्रियाही तालुकाभरातून व्यक्त होत होत्या. तीन महिन्यानंतर का होईना महसूल प्रशासनाने यातून बोध घेतला आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पावले उचलली आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होताच महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया सुरु होईल. या प्रवेशासाठी विविध दाखले आवश्यक असतात. त्याचबरोबर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्येही विविध दाखल्यांची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर सेतू व महा-ई सेवा केंद्रामध्ये आतापासूनच गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी खांडेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आॅनलाईन नोंद केलेल्या दाखल्यावर बारकोड नसेल तर अशा दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. सेतू कार्यालयातून वितरीत होणाऱ्या दाखल्यांची नोंदणीनिहाय तपासणी केल्यानंतरच या दाखल्यांवर स्वाक्षरी केली जाईल, असे खांडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता तरी बनावट दाखल्यांची प्रकरणे थांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी).