शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातूनही पुरस्कार परत देणार

By admin | Updated: October 19, 2015 23:41 IST

मुख्यमंत्र्यांना पत्र : लोकशाहीतील निंदनीय घटनांच्या निषेधार्थ कृत्य

सावंतवाडी : सध्या लोकशाहीची मुल्ये पायाखाली तुडवली जात आहेत. सामान्य माणसाला योग्य दिशा दाखवणाऱ्यांचे जीवन संपवले जात आहे. तर अशा अनेक साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. या निंदनीय घटनांबाबत साहित्यिक ांमार्फत राज्य शासनाचे पुरस्कार परत देण्यासाठीच्या लढ्यात आता सिंधुदुर्गातही सुरूवात झाली आहे. येथील प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोंविद काजरेकर यांनी तसे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, भारतीय लोकशाहीने दिलेल्या आचार-विचारांच्या स्वातंत्र्याचा निषेध अत्यंत हिंसक आणि निंंदनीय स्वरूपात होताना दिसत आहे. घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडणाऱ्या विचारवंत, कार्यकर्ते, लेखक यांच्या हत्या होणे, त्यांना धमक्या मिळणे हे प्रकारही वाढीस लागले आहेत. या विरोधात शासन पुरेसे गंभीर असल्याचे वा या घटनांशी संबंधित संशयित व्यक्ती व संस्था यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठोस पावले उचलत असल्याचे निदर्शनास येत नाही. एक लेखक म्हणून अशा परिस्थितीत शासनाने लेखन गौरवासाठी दिलेले पुरस्कार आम्ही सिंधुदुर्गातील लेखक, कवी अत्यंक उद्विग्न मन:स्थितीत परत करू इच्छितो. लेखक वा लेखनाचा गौरव व्हावा असे वातावरण आजूबाजूला दिसत नसल्याने व त्याला शासनाची अनास्था जबाबदार असल्याचे जाणवल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही ही कृती करत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण संवेदनशीलतेने आमची भूमिका समजून घेऊन राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जिविताची व त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी, अशी कळकळीच विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. निवेदनावर साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर, वीरधवल नारायण परब, गोंविद गंगाराम काजरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्य शासनाने दिलेले गौरवास्पद पुरस्कार परत करण्याची चळवळ राज्यभर सुरू असताना सिंधुदुर्गातूनही या चळवळीला मिळालेले बळ उपरोक्त अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. (वार्ताहर)