शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

सिंधुदुर्गातूनही पुरस्कार परत देणार

By admin | Updated: October 19, 2015 23:41 IST

मुख्यमंत्र्यांना पत्र : लोकशाहीतील निंदनीय घटनांच्या निषेधार्थ कृत्य

सावंतवाडी : सध्या लोकशाहीची मुल्ये पायाखाली तुडवली जात आहेत. सामान्य माणसाला योग्य दिशा दाखवणाऱ्यांचे जीवन संपवले जात आहे. तर अशा अनेक साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. या निंदनीय घटनांबाबत साहित्यिक ांमार्फत राज्य शासनाचे पुरस्कार परत देण्यासाठीच्या लढ्यात आता सिंधुदुर्गातही सुरूवात झाली आहे. येथील प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोंविद काजरेकर यांनी तसे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, भारतीय लोकशाहीने दिलेल्या आचार-विचारांच्या स्वातंत्र्याचा निषेध अत्यंत हिंसक आणि निंंदनीय स्वरूपात होताना दिसत आहे. घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडणाऱ्या विचारवंत, कार्यकर्ते, लेखक यांच्या हत्या होणे, त्यांना धमक्या मिळणे हे प्रकारही वाढीस लागले आहेत. या विरोधात शासन पुरेसे गंभीर असल्याचे वा या घटनांशी संबंधित संशयित व्यक्ती व संस्था यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठोस पावले उचलत असल्याचे निदर्शनास येत नाही. एक लेखक म्हणून अशा परिस्थितीत शासनाने लेखन गौरवासाठी दिलेले पुरस्कार आम्ही सिंधुदुर्गातील लेखक, कवी अत्यंक उद्विग्न मन:स्थितीत परत करू इच्छितो. लेखक वा लेखनाचा गौरव व्हावा असे वातावरण आजूबाजूला दिसत नसल्याने व त्याला शासनाची अनास्था जबाबदार असल्याचे जाणवल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही ही कृती करत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण संवेदनशीलतेने आमची भूमिका समजून घेऊन राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जिविताची व त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी, अशी कळकळीच विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. निवेदनावर साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर, वीरधवल नारायण परब, गोंविद गंगाराम काजरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्य शासनाने दिलेले गौरवास्पद पुरस्कार परत करण्याची चळवळ राज्यभर सुरू असताना सिंधुदुर्गातूनही या चळवळीला मिळालेले बळ उपरोक्त अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. (वार्ताहर)