शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातूनही पुरस्कार परत देणार

By admin | Updated: October 19, 2015 23:41 IST

मुख्यमंत्र्यांना पत्र : लोकशाहीतील निंदनीय घटनांच्या निषेधार्थ कृत्य

सावंतवाडी : सध्या लोकशाहीची मुल्ये पायाखाली तुडवली जात आहेत. सामान्य माणसाला योग्य दिशा दाखवणाऱ्यांचे जीवन संपवले जात आहे. तर अशा अनेक साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. या निंदनीय घटनांबाबत साहित्यिक ांमार्फत राज्य शासनाचे पुरस्कार परत देण्यासाठीच्या लढ्यात आता सिंधुदुर्गातही सुरूवात झाली आहे. येथील प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोंविद काजरेकर यांनी तसे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, भारतीय लोकशाहीने दिलेल्या आचार-विचारांच्या स्वातंत्र्याचा निषेध अत्यंत हिंसक आणि निंंदनीय स्वरूपात होताना दिसत आहे. घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडणाऱ्या विचारवंत, कार्यकर्ते, लेखक यांच्या हत्या होणे, त्यांना धमक्या मिळणे हे प्रकारही वाढीस लागले आहेत. या विरोधात शासन पुरेसे गंभीर असल्याचे वा या घटनांशी संबंधित संशयित व्यक्ती व संस्था यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठोस पावले उचलत असल्याचे निदर्शनास येत नाही. एक लेखक म्हणून अशा परिस्थितीत शासनाने लेखन गौरवासाठी दिलेले पुरस्कार आम्ही सिंधुदुर्गातील लेखक, कवी अत्यंक उद्विग्न मन:स्थितीत परत करू इच्छितो. लेखक वा लेखनाचा गौरव व्हावा असे वातावरण आजूबाजूला दिसत नसल्याने व त्याला शासनाची अनास्था जबाबदार असल्याचे जाणवल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही ही कृती करत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण संवेदनशीलतेने आमची भूमिका समजून घेऊन राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जिविताची व त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी, अशी कळकळीच विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. निवेदनावर साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर, वीरधवल नारायण परब, गोंविद गंगाराम काजरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्य शासनाने दिलेले गौरवास्पद पुरस्कार परत करण्याची चळवळ राज्यभर सुरू असताना सिंधुदुर्गातूनही या चळवळीला मिळालेले बळ उपरोक्त अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. (वार्ताहर)