शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

टीकाकारांना कामातून उत्तर- दीपक केसरकर        

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 23:55 IST

जे माझ्यावर सोशल मीडिया आणि बॅनरमधून टीका करीत आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्ह्यात किती निधी आणला त्याची माहिती मागवली होती.

सावंतवाडी : जे माझ्यावर सोशल मीडिया आणि बॅनरमधून टीका करीत आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्ह्यात किती निधी आणला त्याची माहिती मागवली होती. त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. मग त्यांनी निधी आणला  म्हणून तरी जनतेला का सांगितले नाही? माझ्यावर टीका करणा-यांनी जरूर करावी. त्यांना मी माझ्या कामातूनच उत्तर देईन, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राजन पोकळे, नितीन वाळके, रूपेश राऊळ, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा ही योजना सिंधुदुर्गसाठी लाभदायी आहे. त्यातून सिंधुदुर्गचा सर्व थराचा विकास होणार आहे. चांदा ते बांदा योजनेचे कामही प्रगतीपथावर सुरू आहे. प्रगत शेती सुरू करण्यात आली आहे. काथ्या उद्योगांचे बारा युनिट तयार करण्यात आले आहेत. आता यापुढे बेरोजगारांच्या हाताला काम देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्या शिवाय शिक्षण व आरोग्याच्याबाबत क्रांती करायची आहे, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत आहे. मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आला आहे. यापूर्वी एवढा निधी कधीही आला नाही. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तसेच देवगड येथे रूग्णालयांची कामे सुरू आहेत. तर कुडाळ येथील महिला रूग्णालयाचे काम पुढील पाच ते सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. सावंतवाडीतील आयएएस व आयपीएस सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात याचे एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.माझ्यावर टीका करणा-यांनी माहितीच्या अधिकारातून वेगवेगळी माहिती आमच्या कार्यालयाकडे मागवली होती. त्यावेळी सर्व माहिती देण्यात आली आहे. जिल्हाात २७०० कोटीचा निधी कशा प्रकारे आला तेही सांगण्यात आले आहे. तरीही सोशल मीडिया तसेच बॅनर लावून माझी जाहिरात करण्यात येत आहे. मला कामाचा बॅनर लावण्यास वेळ नाही. ते काम ही मंडळी करीत आहेत, असे सांगत मी कुणावरही टीका करणार नाही. त्यांना कामातूनच उत्तर देईन, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यात असतोमी वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने सिंधुदुर्गमध्ये आठवड्याला येत असतो. प्रत्येक बैठका काय कणकवलीला घेणे शक्य नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीच बैठका घेण्यात येतात. या पुढे आता आठवड्याचे दोन दिवस जिल्ह्यात थांबून काम करेन तसेच प्रत्येक प्रकल्पावर विशेष लक्ष देऊन काम करून घेईन, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले

टॅग्स :Dipak Kesarkarदीपक केसरकर