शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

By सुधीर राणे | Updated: August 11, 2023 16:39 IST

लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले

कणकवली: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे महंमदवाडी टाळंबा व इतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ते तत्काळ सोडवावेत. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी राज्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल  पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.दरम्यान, त्याअनुषंगाने लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, चिटणीस बाप्पा सावंत, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सूरज परब आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील नरडवे येथील महंमदवाडी धरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. याठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. तसेच टाळंबा धरणाच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.यावेळी मंत्री पाटील व आमदार तटकरे यांनी या हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तसेच अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल मागवून घेऊन देय असलेली सर्व भरपाई तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग