शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

By सुधीर राणे | Updated: August 11, 2023 16:39 IST

लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले

कणकवली: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे महंमदवाडी टाळंबा व इतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ते तत्काळ सोडवावेत. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी राज्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल  पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.दरम्यान, त्याअनुषंगाने लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, चिटणीस बाप्पा सावंत, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सूरज परब आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील नरडवे येथील महंमदवाडी धरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. याठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. तसेच टाळंबा धरणाच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.यावेळी मंत्री पाटील व आमदार तटकरे यांनी या हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तसेच अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल मागवून घेऊन देय असलेली सर्व भरपाई तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग