शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

नारायण राणेंकडे राज्याचे नेतृत्व देण्याचा ठराव

By admin | Updated: May 21, 2014 17:38 IST

काँग्रेस चिंतन बैठक

 सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत अपयशावर चिंतन करून आणि झालेल्या चुका सुधारून पुन्हा येत्या दोन महिन्यात काँग्रेस पक्ष बळकट करू, असा निर्धार आजच्या काँग्रेस चिंतन बैठकीत करण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्यादृष्टीने नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारीणीची चिंतन बैठक आज सिंधुदुर्गनगरी येथे झाली. या बैठकीत माजी आमदार राजन तेली, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अशोक सावंत, विकास सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दत्ता सामंत, अ‍ॅड. संग्राम देसाई, जयेंद्र परूळेकर, मिलिंद कुलकर्णी, प्रज्ञा परब आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी माहिती देताना जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात पालकमंत्री नारायण राणे यांच्या व नीलेश राणे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. आम्ही कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण आम्ही करणारच आहोत. या निवडणुकीतील अपयश सहजासहजी पचविता येणारे नाही. मोदींच्या लाटेची त्सुनामी आली हे खरे असले तरी काही आमच्या चुका झाल्या हे नाकारता येणार नाही. त्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी आज चिंतन बैठक झाली. नीलेश राणेंच्या पराभवामुळे राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे. राणे कुटुंबियांमुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी आली. त्यांनी या जिल्ह्यासाठी कार्यरत रहावे यासाठी त्यांचा राजीनामा मागे घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार विजय सावंत यांनी पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याच्याविरोधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी सावंत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी यामागची कारणे शोधून पुन्हा जोमाने काम करू. ‘जनता हीच लोकशाहीचे दैवत आहे’ तेव्हा पुन्हा एकदा जनतेला विश्वासात घेऊन संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करू. कार्यकर्त्यांमुळे मतदार दुखावणार नाहीत याची दक्षता घेतानाच प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून यापुढे काँग्रेस संघटना वाढवू आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पुन्हा राणे फॅक्टरच दिसून येईल. कोणत्याही चुकांचे एका दिवसात चिंतन पूर्ण होत नाही. यापुढे ते सुरूच राहील. २२ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले. तर २६ ते २८ मे या दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेऊन जनतेशी चर्चा करणार. चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)