शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नारायण राणेंकडे राज्याचे नेतृत्व देण्याचा ठराव

By admin | Updated: May 21, 2014 17:38 IST

काँग्रेस चिंतन बैठक

 सिंधुदुर्गनगरी : लोकसभा निवडणुकीत अपयशावर चिंतन करून आणि झालेल्या चुका सुधारून पुन्हा येत्या दोन महिन्यात काँग्रेस पक्ष बळकट करू, असा निर्धार आजच्या काँग्रेस चिंतन बैठकीत करण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्यादृष्टीने नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीमध्ये रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारीणीची चिंतन बैठक आज सिंधुदुर्गनगरी येथे झाली. या बैठकीत माजी आमदार राजन तेली, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अशोक सावंत, विकास सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दत्ता सामंत, अ‍ॅड. संग्राम देसाई, जयेंद्र परूळेकर, मिलिंद कुलकर्णी, प्रज्ञा परब आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी, कार्यकारीणी सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी माहिती देताना जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात पालकमंत्री नारायण राणे यांच्या व नीलेश राणे यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत आम्हाला अपयश आले. आम्ही कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण आम्ही करणारच आहोत. या निवडणुकीतील अपयश सहजासहजी पचविता येणारे नाही. मोदींच्या लाटेची त्सुनामी आली हे खरे असले तरी काही आमच्या चुका झाल्या हे नाकारता येणार नाही. त्या चुकांची दुरूस्ती करण्यासाठी आज चिंतन बैठक झाली. नीलेश राणेंच्या पराभवामुळे राणे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटणार आहे. राणे कुटुंबियांमुळे जिल्ह्याचा विकास झाला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकटी आली. त्यांनी या जिल्ह्यासाठी कार्यरत रहावे यासाठी त्यांचा राजीनामा मागे घेण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला तर पुन्हा राज्यात काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, असा एकमुखी ठराव या बैठकीत घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार विजय सावंत यांनी पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे सापडले आहेत. त्याच्याविरोधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही यावेळी सावंत यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी यामागची कारणे शोधून पुन्हा जोमाने काम करू. ‘जनता हीच लोकशाहीचे दैवत आहे’ तेव्हा पुन्हा एकदा जनतेला विश्वासात घेऊन संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करू. कार्यकर्त्यांमुळे मतदार दुखावणार नाहीत याची दक्षता घेतानाच प्रत्येक मतदारसंघात जाऊन जनतेचा विश्वास संपादन करून यापुढे काँग्रेस संघटना वाढवू आणि येणार्‍या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पुन्हा राणे फॅक्टरच दिसून येईल. कोणत्याही चुकांचे एका दिवसात चिंतन पूर्ण होत नाही. यापुढे ते सुरूच राहील. २२ मे रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले. तर २६ ते २८ मे या दरम्यान जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बैठका घेऊन जनतेशी चर्चा करणार. चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)