शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडीभोसले-घारे यांच्यामुळे संघटनेत फूट : भास्कर परब

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचेसिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.या पत्रकात परब यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गवस यांना प्रदेश राष्ट्रवादीने तडकाफडकी काढून टाकताना जिल्हा कार्यकारिणी किंवा अन्य जबाबदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. पक्षाने सुरू केलेल्या या हुकूमशाहीविरोधात जिल्हा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकारिणीने पदत्याग करून तसे राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, निरीक्षक विलास माने यांच्याकडे सोपविले आहे. आता जिल्ह्यातील उर्वरित ६०० बुथप्रमुख आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.पुण्याहून आलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भास्कर परब यांनी या पत्रकातून केला आहे. त्यांना सावंतवाडीचे माजी मंत्री प्रवीण भोसलेही सहकार्य करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवीण भोसले व अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत प्रचंड खळबळ माजून त्याची परिणिती जिल्हा कार्यकारिणीच्या राजीनाम्यात झाली आहे. सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे पाठविले आणि वरिष्ठांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव हे चार दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील प्रत्येक मतदार संघात बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या दौºयानंतर दोनच दिवसांत जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता पुढील काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.राजकीय चर्चा; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्षपुढील संघटनात्मक निर्णय येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीत घेऊन ठरविण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. मात्र नेमके किती जणांनी राजीनामे दिले याचा उल्लेख परब यांनी पत्रकात केला नसल्याने पक्षावर दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग