शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:25 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी पक्षात राजीनामा सत्र सुरू, जिल्हाध्यक्षांची उचलबांगडीभोसले-घारे यांच्यामुळे संघटनेत फूट : भास्कर परब

कुडाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचेसिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांच्या उचलबांगडीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती कुडाळ तालुकाध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. माजी मंत्री प्रवीण भोसले व सावंतवाडीच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत फूट पडत असल्याचा आरोपही त्यांनी या केला आहे.या पत्रकात परब यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गवस यांना प्रदेश राष्ट्रवादीने तडकाफडकी काढून टाकताना जिल्हा कार्यकारिणी किंवा अन्य जबाबदार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. पक्षाने सुरू केलेल्या या हुकूमशाहीविरोधात जिल्हा राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकारिणीने पदत्याग करून तसे राजीनामापत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, निरीक्षक विलास माने यांच्याकडे सोपविले आहे. आता जिल्ह्यातील उर्वरित ६०० बुथप्रमुख आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.पुण्याहून आलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षक अर्चना घारे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यातील संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भास्कर परब यांनी या पत्रकातून केला आहे. त्यांना सावंतवाडीचे माजी मंत्री प्रवीण भोसलेही सहकार्य करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवीण भोसले व अर्चना घारे यांच्यामुळे जिल्हा संघटनेत प्रचंड खळबळ माजून त्याची परिणिती जिल्हा कार्यकारिणीच्या राजीनाम्यात झाली आहे. सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे पाठविले आणि वरिष्ठांचे लक्ष वेधल्याचे त्यांनी यात म्हटले आहे.राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री भास्कर जाधव हे चार दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जिल्हा दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांनी येथील प्रत्येक मतदार संघात बैठका घेतल्या होत्या. त्यांच्या दौºयानंतर दोनच दिवसांत जिल्हाध्यक्षांची उचलबांगडी करण्यात आली असून, आता पुढील काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.राजकीय चर्चा; पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्षपुढील संघटनात्मक निर्णय येत्या आठ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकारिणी बैठकीत घेऊन ठरविण्यात येईल, असेही या पत्रकात म्हटले आहे. मात्र नेमके किती जणांनी राजीनामे दिले याचा उल्लेख परब यांनी पत्रकात केला नसल्याने पक्षावर दबाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्ग