शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अध्यक्षपदी रेश्मा सावंत

By admin | Updated: March 21, 2017 23:08 IST

जिल्हा परिषद : उपाध्यक्षपदी रणजित देसाई; काँग्रेसकडून शिवसेना-भाजप युतीचा पराभव; सावंतवाडी तालुक्याला ११ वर्षांनंतर अध्यक्षपदाची संधी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रेश्मा रविकांत सावंत यांची अध्यक्षपदी, तर रणजित दत्तात्रय देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हात उंचावून घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत सावंत यांना २८, तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या वर्षा पवार यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई यांना २८, तर भाजपच्या सुधीर नकाशे यांना २२ मते मिळाली. राज्यात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना अनेक ठिकाणी शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे उदाहरण समोर असतानाच सिंधुदुर्गात मात्र सेना व भाजप युती कायम राहिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांनी काँग्रेसला मतदान केले. या खास सभेसाठी ५० सदस्यांनी सभागृहात उपस्थिती दर्शविली होती.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी दुपारी तीन वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी सकाळी शिवसेना व भाजप युतीने नामनिर्देशनपत्र दाखल करीत खाते उघडले. यावेळी अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वर्षा उदय पवार व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या सुधीर गणपत नकाशे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी आमदार वैभव नाईक, अभय शिरसाट, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, गटनेते नागेंद्र परब, सेना, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदासाठी रेश्मा सावंत व उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई यांचे नामनिर्देशनपत्र पीठासन अधिकारी रवींद्र सावळकर यांच्याकडे सादर केले. यावेळी आमदार नीतेश राणे, गटनेते सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत, संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत दुपारी ३.३० पर्यंत होती. मात्र, यावेळी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासन अधिकारी रवींद्र सावळकर यांनी ३.३० नंतर हात उंचावून मतदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मतदान कौल नोंदवून घेत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार अध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसच्या रेश्मा सावंत यांना २८ मते, तर शिवसेनेच्या वर्षा पवार यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसचे रणजित देसाई यांना २८, तर भाजपचे सुधीर नकाशे यांना २२ मते मिळाली. त्यानुसार पीठासन अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताना अध्यक्षपदी रेश्मा सावंत व उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांचे सेना व भाजपच्या अमरसेन सावंत, नागेंद्र परब, वर्षा पवार, संजय पडते, राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)