शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

न्याय मिळण्यासाठी दूरसंचार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:18 IST

भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देन्याय मिळण्यासाठी दूरसंचार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनथकीत वेतन मिळावे अशी मागणी

ओरोस : भारत संचार निगम लिमिटेडच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले नऊ महिने पगार न दिल्यामुळे त्यांच्यावर अन्नांन दशा झाली आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून दयावा अशी मागणी आज बीएसएनएल च्या जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कंत्राटी कामगारांना गेले नऊ महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना घर चालवणे कठीण झाले आहे. अनेकांच्या घरातील दाग दागिने विकून प्रपंच सुरू ठेवावा लागला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खेलखंडोबा झाला आहे.शासनाने नियुक्त केलेला ठेकेदार या कामगारांना पगार तर दूरच उलट त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी देत आहे. तसेच कामगारांमध्ये 70 टक्के कपात करण्याची तयारीही सुरू केली आहे.

गेली वीस वीस वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे आता वय सुद्धा वाढल्यामुळे त्यांना इतर कुठेही नोकरी मिळण्याची संधी निघून गेली आहे. या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा व त्यांचे थकीत वेतन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलsindhudurgसिंधुदुर्ग