शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘टाटा’च्या जागी नवीन प्रकल्प आणावा

By admin | Updated: March 30, 2016 23:52 IST

कर्मचाऱ्यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन : रेडी येथील टाटा मेटालिक्सने प्रकल्प केला बंद

कुडाळ : टाटा मेटालिक्स रेडी या बंद औद्योगिक प्रकल्पाच्या जागेत नवीन प्रकल्प आणण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना येथे टाटा मेटालिक्स रेडी कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, माजी अर्थमंत्री व रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने जानेवारी १९९० मध्ये जिल्ह्यातील रेडी गावात उषा इस्पात नावाने पिग आयर्न प्रकल्प आणला गेला. हा सिंधुदुर्गातला पहिलाच मोठा प्रकल्प असल्याने, या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळेल, आपल्या भागाचा विकास होईल या विचारांनी प्रेरित होऊन रेडी गावातील जमीनमालकांनी अल्प मोबदल्यात जमिनी कंपनीला प्रकल्पासाठी दिल्या. हा प्रकल्प सुरु झाल्यावर सुमारे स्थानिक १५०० जणांना कायमस्वरूपी तर सुमारे ५०० जणांना कंत्राटी स्वरूपाचे काम मिळाले. त्याचबरोबर मालवाहतूकदार, व्यापारी यांचाही फायदा झाला. साधारण १४ वर्षे अनेक समस्यांना तोंड देत हा प्रकल्प सुरु होता. मात्र, कर्जाची परतफेड वेळेवर होऊ न शकल्याने, कंपनीच्या गलथान व्यवस्थापनामुळे प्रकल्प अखेर बंद पडला. या बंद प्रकल्पाचा २००५ मध्ये लिलाव केला. लिलावात हा प्रकल्प खडगपूर येथील नामांकित कंपनी मे. टाटा मेटालिक्स लि. ने खरेदी केला. मात्र, काही कामगारांनाच पुन्हा नव्याने कमी पगारावर कामावर ठेवले. उषा कंपनीकडून काहीच नुकसानभरपाई न मिळाल्याने व सर्वांनाच काम न मिळाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तरीही नवीन कंपनीच्या नावावर विश्वास ठेवून कामगारांनी तसेच स्थानिक नेत्यांनीही फारसा विरोध केला नाही. २००५ ते २०११ या कालावधीत टाटा कंपनीने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला. या कंपनीला प्रामुख्याने कर्नाटक राज्याच्या खाणींमधून कच्च्या मालाचा पुरवठा होत होता. या खाणींवर घातलेल्या बंदीमुळे कच्च्या मालाचा होणारा तुटवडा, स्वत:च्या मालकीच्या खाणी सुरु करण्यासाठी न मिळालेली राज्य शासनाची परवानगी, तत्कालीन राज्य सरकारची उदासीनता आदी बाबींमुळे प्रकल्पाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी झाले. अखेर मार्च २०१३ मध्ये कामगारांना नाममात्र नुकसानभरपाई देऊन प्रकल्प बंद केला. पुन्हा एकदा सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. सुदैवाने मोठ्या उद्योगांना लागणारी पुरेशी जमीन, मुबलक पाणी, वीज व कुशल कामगार वर्ग अनायसे रेडी येथे उपलब्ध आहे. रेडी येथे येण्यासाठी उद्योगपतींना उद्युक्त करण्याचे काम करावे, अशी मागणी या निवेदनातून सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन टाटा मेटलिक्स रेडीचे कर्मचारी प्रसाद सौदागर, अनंत कांबळी, वीरेंद्र परब, गुणेश पाटकर, गफार खानापुरे यांनी दिले. (प्रतिनिधी)कामगारवर्ग नैराश्याने ग्रस्तटाटा कंपनी रेडीतील हा प्रकल्प पुन्हा सुरु करेल ही शक्यताच जवळपास संपुष्टात आली आहे. अनेक कामगार विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत. नैराश्याने ग्रासलेला हा कामगार वर्ग महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.