शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘टाटा’च्या जागी नवीन प्रकल्प आणावा

By admin | Updated: March 30, 2016 23:52 IST

कर्मचाऱ्यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन : रेडी येथील टाटा मेटालिक्सने प्रकल्प केला बंद

कुडाळ : टाटा मेटालिक्स रेडी या बंद औद्योगिक प्रकल्पाच्या जागेत नवीन प्रकल्प आणण्याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना येथे टाटा मेटालिक्स रेडी कर्मचाऱ्यांच्यावतीने निवेदन दिले. निवेदनात म्हटले की, माजी अर्थमंत्री व रेल्वेमंत्री कै. मधु दंडवते यांच्या प्रयत्नाने जानेवारी १९९० मध्ये जिल्ह्यातील रेडी गावात उषा इस्पात नावाने पिग आयर्न प्रकल्प आणला गेला. हा सिंधुदुर्गातला पहिलाच मोठा प्रकल्प असल्याने, या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार मिळेल, आपल्या भागाचा विकास होईल या विचारांनी प्रेरित होऊन रेडी गावातील जमीनमालकांनी अल्प मोबदल्यात जमिनी कंपनीला प्रकल्पासाठी दिल्या. हा प्रकल्प सुरु झाल्यावर सुमारे स्थानिक १५०० जणांना कायमस्वरूपी तर सुमारे ५०० जणांना कंत्राटी स्वरूपाचे काम मिळाले. त्याचबरोबर मालवाहतूकदार, व्यापारी यांचाही फायदा झाला. साधारण १४ वर्षे अनेक समस्यांना तोंड देत हा प्रकल्प सुरु होता. मात्र, कर्जाची परतफेड वेळेवर होऊ न शकल्याने, कंपनीच्या गलथान व्यवस्थापनामुळे प्रकल्प अखेर बंद पडला. या बंद प्रकल्पाचा २००५ मध्ये लिलाव केला. लिलावात हा प्रकल्प खडगपूर येथील नामांकित कंपनी मे. टाटा मेटालिक्स लि. ने खरेदी केला. मात्र, काही कामगारांनाच पुन्हा नव्याने कमी पगारावर कामावर ठेवले. उषा कंपनीकडून काहीच नुकसानभरपाई न मिळाल्याने व सर्वांनाच काम न मिळाल्याने अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तरीही नवीन कंपनीच्या नावावर विश्वास ठेवून कामगारांनी तसेच स्थानिक नेत्यांनीही फारसा विरोध केला नाही. २००५ ते २०११ या कालावधीत टाटा कंपनीने हा प्रकल्प व्यवस्थित चालविला. या कंपनीला प्रामुख्याने कर्नाटक राज्याच्या खाणींमधून कच्च्या मालाचा पुरवठा होत होता. या खाणींवर घातलेल्या बंदीमुळे कच्च्या मालाचा होणारा तुटवडा, स्वत:च्या मालकीच्या खाणी सुरु करण्यासाठी न मिळालेली राज्य शासनाची परवानगी, तत्कालीन राज्य सरकारची उदासीनता आदी बाबींमुळे प्रकल्पाचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी झाले. अखेर मार्च २०१३ मध्ये कामगारांना नाममात्र नुकसानभरपाई देऊन प्रकल्प बंद केला. पुन्हा एकदा सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. सुदैवाने मोठ्या उद्योगांना लागणारी पुरेशी जमीन, मुबलक पाणी, वीज व कुशल कामगार वर्ग अनायसे रेडी येथे उपलब्ध आहे. रेडी येथे येण्यासाठी उद्योगपतींना उद्युक्त करण्याचे काम करावे, अशी मागणी या निवेदनातून सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन टाटा मेटलिक्स रेडीचे कर्मचारी प्रसाद सौदागर, अनंत कांबळी, वीरेंद्र परब, गुणेश पाटकर, गफार खानापुरे यांनी दिले. (प्रतिनिधी)कामगारवर्ग नैराश्याने ग्रस्तटाटा कंपनी रेडीतील हा प्रकल्प पुन्हा सुरु करेल ही शक्यताच जवळपास संपुष्टात आली आहे. अनेक कामगार विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत. नैराश्याने ग्रासलेला हा कामगार वर्ग महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त होईल अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.