शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

सव्वा कोटीच्या रस्त्यावर ९० लाखांची दुरुस्ती,बांधकाम विभागाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 14:20 IST

चार वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोलगाव फाटा ते कुणकेरी रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा ९० लाख रुपये खर्च घातले जात आहेत. बांधकाम विभागाला कोण वाली नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपये दुरुस्तीच्या नावाखाली खर्ची घालण्याचे काम सध्या सुरू आहे. या दुरुस्तीच्या कामाला कुणकेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.

ठळक मुद्देचार वर्षांपूर्वी करण्यात आला होता कोलगाव फाटा-कुणकेरी रस्तादर्जाहीन काम कुणकेरी ग्रामस्थांनी पाडले बंद

सावंतवाडी : चार वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोलगाव फाटा ते कुणकेरी रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा ९० लाख रुपये खर्च घातले जात आहेत. बांधकाम विभागाला कोण वाली नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपये दुरुस्तीच्या नावाखाली खर्ची घालण्याचे काम सध्या सुरू आहे. या दुरुस्तीच्या कामाला कुणकेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.

रस्त्यावर ग्रामस्थांना फक्त खडी दिसत होती. डांबर दिसतच नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी याबाबतचे निवेदन बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले खरे, पण ठेकेदार व अधिकारी यांच्यात संगनमत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची, हा प्रश्नच आहे.कोलगाव फाटा ते कुणकेरी आरोग्य केंद्र हा रस्ता २०१३-१४ मध्ये म्हणजेच चार वर्षांपूर्वी जिल्हा विकास आराखड्यातून करण्यात आला होता. त्यावेळी या रस्त्यावर बांधकाम विभागाने १ कोटी १२ लाख ७० हजार रुपये खर्ची घातले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षांतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. त्यामुळे ग्रामस्थांना या खड्ड्यांची डोकेदुखी होऊ लागल्याने रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली होती.

त्यामुळे नवीन आराखड्यात हा रस्ता बसवून त्याची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सरकारची अवस्था डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखी झाल्याने बांधकाममध्ये अधिकारी करतील तीच पूर्व दिशा असे असून त्याचा प्रत्यय या रस्त्याच्या कामात आला आहे.चार वर्षांपूर्वी जो रस्ता बांधकाम विभागाने १ कोटी १२ लाखात केला. त्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चक्क ९० लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशीच काहीशी अवस्था बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. मूळ किमतीच्या रस्त्याच्या तुलनेत दुरुस्तीचा खर्च अधिकचा वाटू लागला आहे.

बांधकाम विभागाने त्यावर आणखी काही पैसे खर्च केले असते तर रस्ता पुन्हा करून झाला असता. पण बांधकाम अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या कामातच स्वारस्य असले तर मग कोण सामान्य माणसाच्या पैशाचा विचार करणार? याकडे ना राजकीय नेत्यांचे लक्ष ना सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, अशी काहीशी अवस्था दिसून येत आहे.

या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एक-दोन वर्षांत सव्वा कोटीचे दीड कोटी करून अधिकारी पुन्हा रस्ता करण्याचा घाट घालणारच आहेत. पण ही दुरुस्ती तरी योग्यप्रकारे व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. रस्त्यावर फक्त खडीच दिसून येत होती. त्यावर डांबर ग्रामस्थांना दिसले नसल्याने अखेर ग्रामस्थांनी दर्जाहीन काम असल्याने ते बंद पाडलेच.या रस्त्यावर ज्या प्रमाणात डांबर पाहिजे तसे घातले गेले नाही तसेच रस्ता टिकावा म्हणून जो प्रयत्न करायला पाहिजे तो केला जात नाही, असा आरोप करीत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर योग्य काम झाले नाही तर काम होऊ देणार नाही असा इशारा नितीन सावंत, अमीर नाईक, कृष्णकांत सावंत, आनंद गावडे, नामदेव नाईक, प्रमोद परब, रविकिरण तेंडोलकर, राजन गावडे, अभि सावंत यानी दिला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकsindhudurgसिंधुदुर्ग