शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

सावंतवाडी दोडामार्गमधील उर्वरित १० गावे इको सेन्सिटिव्ह यादीत - स्टॅलिन दयानंद

By अनंत खं.जाधव | Updated: April 16, 2024 16:45 IST

२५ गावाबाबत निर्णय जाहीर, ३२ मायनिंग प्रकल्प बंद होणार: शेतकऱ्यांकडून सत्कार

सावंतवाडी : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे “इको सेन्सेटिव्ह झोन” म्हणून जाहीर करण्यात आली आहेत आता उर्वरित १० गावे ही इनोव्हेटिव्ह म्हणून जाहीर करा त्यामुळे ३२ हून अधिक मायनिंग प्रकल्प बंद होणार आहेत.असा विश्वास वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला.आपण अर्धी लढाई जिंकली आहे. पण न्यायालयाच्या निर्णया ची सरकारकडून योग्य ती अमलबजावणी होत नसल्यानेच   शेकडो एकर जमिनीत वृक्षतोड सुरू असा दावा ही दयानंद यांनी केला. १४ वर्षांच्या लढाईला यश मिळाल्याने तसेच सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 गावे सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत स्टॅलिन दयानंद यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप सावंत, नंदकुमार पवार अस्मीता एम के यांच्यासह दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.दयानंद म्हणाले, जो काही विजय मिळाला आहे तो ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मिळाला आहे. त्यामुळे यापुढे ही अशाच प्रकारे एकत्र राहणे गरजेचे आहे. जमिनी न विकता या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा जेणे करुन मायनिंगसाठी जमिनी विकून पैसा मिळणार नाही तितका पैसा पर्यटनातून मिळू शकतो, असा त्यांनी दावा केला. त्याच बरोबर आमची लढाई यापुढे सुध्दा चालू राहणार आहे. आत्ता आम्ही जिल्हाधिकारी आणि वनअधिकार्‍यांच्या विरोधात आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत.सावंत म्हणाले, या ठिकाणी वनविभाग आणि जिल्हा प्रशासन जिल्ह्यात असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत सतर्क नाही. वाघाच्या नोंदी असलेले अनेक वर्षाचे रेकॉर्ड वनविभागाच्या कस्टडी मधून चोरीला गेले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपुर्वक झाला की केला गेला? याची माहिती घेणे महत्वाचे ठरणार आहे.परुळेकर म्हणाले, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, या ३ राज्यात तब्बल ५० वाघ असल्याचा दावा याबाबत अभ्यास करणार्‍या सामाजिक संस्थांनी केला आहे असे असताना शासनाकडुन ही माहिती लपविली जाते हे दुदैवे आहे, असा आरोप त्यांनी केला. अर्धी लढाई आम्ही जिंकलो आहोत. त्यामुळे येणार्‍या काळात येथील जमिनी विकल्या जाणार नाहीत. त्याच बरोबर प्रदुषणकारी प्रकल्प येणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट महत्वाचीसावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामस्थ हे पद्रूषण कारी प्रकल्पाच्या विरोधात आहेत या ग्रामस्थांकडून मोठी साथ मिळाली त्यामुळे यावर अभ्यास करून अनेक मुद्दे न्यायालयात ठळक पणे मांडता आले त्याचेच हे यश असल्याचे स्टॅलिन दयानंद म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग