शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

वृक्षतोडीमुळे कोकणची अधोगती

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

महेंद्र नाटेकर : वृक्षमित्र संघाच्या सभेत मार्गदर्शन

कणकवली : भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कोकणात हिरवीगार वनश्री होती. घनदाट जंगल होते. खळाळणारे ओढे होते. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. खऱ्या अर्थाने कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वन अधिकारी, लाकूड व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे वृक्षांची कत्तल होत आहे. यामुळे कोकणच्या विकासाची अधोगती होत आहे, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. ते कणकवली येथे बुधवारी आयोजित केलेल्या वृक्षमित्र संघाच्या आमसभेत बोलत होते.आमसभेला यावेळी शांताराम नारकर, लाडोबा तावडे, बाबूराव आचरेकर, नंदकुमार आरोलकर, सदाशिव हडकर, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणामध्ये प्रचंड वृक्षतोड झाली ती लोकांच्या स्थानिक गरजांसाठी झाली नसून, परजिल्ह्यांतील लाकूड व्यापाऱ्यांनी स्वत:च्या, अधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी केली. रक्षकच भक्षक झाल्याने कोकणची अधोगती झाली, असे सांगून प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, ही भयाण परिस्थिती असह्य होऊन काही वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीच्या विरुद्ध दंड थोपटले. वृक्षतोड थांबून वृक्षारोपण व संवर्धन व्हावे, यासाठी वृक्षमित्र संघाची निर्मिती केली. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक आप्पासाहेब पाटील व वनीकरणाचे भांगले यांच्या सहकार्याने शेकडो शालेय रोपवाटिका, किसान रोपवाटिका निर्माण केल्या. वनौषधी संस्थेचीही स्थापना केली. खेडोपाडी जाऊन जनजागृती केली, असेही प्रा. नाटेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनआजही जनजागृतीची गरज असल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तसेच खुल्या गटासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजिन वृक्षमित्र संघातर्फे करण्यात आले आहे. २0 मार्चपर्यंत या स्पर्धेत इच्छुकांनी आपले साहित्य प्रा. महेंद्र नाटेकर, कलमठ, ता. कणकवली या ठिकाणी पाठवावे, असे आवाहन वृक्षमित्र संघाने केले आहे.