शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीमुळे कोकणची अधोगती

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

महेंद्र नाटेकर : वृक्षमित्र संघाच्या सभेत मार्गदर्शन

कणकवली : भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कोकणात हिरवीगार वनश्री होती. घनदाट जंगल होते. खळाळणारे ओढे होते. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. खऱ्या अर्थाने कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वन अधिकारी, लाकूड व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे वृक्षांची कत्तल होत आहे. यामुळे कोकणच्या विकासाची अधोगती होत आहे, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. ते कणकवली येथे बुधवारी आयोजित केलेल्या वृक्षमित्र संघाच्या आमसभेत बोलत होते.आमसभेला यावेळी शांताराम नारकर, लाडोबा तावडे, बाबूराव आचरेकर, नंदकुमार आरोलकर, सदाशिव हडकर, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणामध्ये प्रचंड वृक्षतोड झाली ती लोकांच्या स्थानिक गरजांसाठी झाली नसून, परजिल्ह्यांतील लाकूड व्यापाऱ्यांनी स्वत:च्या, अधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी केली. रक्षकच भक्षक झाल्याने कोकणची अधोगती झाली, असे सांगून प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, ही भयाण परिस्थिती असह्य होऊन काही वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीच्या विरुद्ध दंड थोपटले. वृक्षतोड थांबून वृक्षारोपण व संवर्धन व्हावे, यासाठी वृक्षमित्र संघाची निर्मिती केली. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक आप्पासाहेब पाटील व वनीकरणाचे भांगले यांच्या सहकार्याने शेकडो शालेय रोपवाटिका, किसान रोपवाटिका निर्माण केल्या. वनौषधी संस्थेचीही स्थापना केली. खेडोपाडी जाऊन जनजागृती केली, असेही प्रा. नाटेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनआजही जनजागृतीची गरज असल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तसेच खुल्या गटासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजिन वृक्षमित्र संघातर्फे करण्यात आले आहे. २0 मार्चपर्यंत या स्पर्धेत इच्छुकांनी आपले साहित्य प्रा. महेंद्र नाटेकर, कलमठ, ता. कणकवली या ठिकाणी पाठवावे, असे आवाहन वृक्षमित्र संघाने केले आहे.