शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

वृक्षतोडीमुळे कोकणची अधोगती

By admin | Updated: February 20, 2015 23:14 IST

महेंद्र नाटेकर : वृक्षमित्र संघाच्या सभेत मार्गदर्शन

कणकवली : भारत स्वतंत्र झाला त्यावेळी कोकणात हिरवीगार वनश्री होती. घनदाट जंगल होते. खळाळणारे ओढे होते. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत होते. खऱ्या अर्थाने कोकण हे महाराष्ट्राचे नंदनवन होते. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र वन अधिकारी, लाकूड व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळे वृक्षांची कत्तल होत आहे. यामुळे कोकणच्या विकासाची अधोगती होत आहे, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. ते कणकवली येथे बुधवारी आयोजित केलेल्या वृक्षमित्र संघाच्या आमसभेत बोलत होते.आमसभेला यावेळी शांताराम नारकर, लाडोबा तावडे, बाबूराव आचरेकर, नंदकुमार आरोलकर, सदाशिव हडकर, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणामध्ये प्रचंड वृक्षतोड झाली ती लोकांच्या स्थानिक गरजांसाठी झाली नसून, परजिल्ह्यांतील लाकूड व्यापाऱ्यांनी स्वत:च्या, अधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी केली. रक्षकच भक्षक झाल्याने कोकणची अधोगती झाली, असे सांगून प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, ही भयाण परिस्थिती असह्य होऊन काही वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षतोडीच्या विरुद्ध दंड थोपटले. वृक्षतोड थांबून वृक्षारोपण व संवर्धन व्हावे, यासाठी वृक्षमित्र संघाची निर्मिती केली. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक आप्पासाहेब पाटील व वनीकरणाचे भांगले यांच्या सहकार्याने शेकडो शालेय रोपवाटिका, किसान रोपवाटिका निर्माण केल्या. वनौषधी संस्थेचीही स्थापना केली. खेडोपाडी जाऊन जनजागृती केली, असेही प्रा. नाटेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनआजही जनजागृतीची गरज असल्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, तसेच खुल्या गटासाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजिन वृक्षमित्र संघातर्फे करण्यात आले आहे. २0 मार्चपर्यंत या स्पर्धेत इच्छुकांनी आपले साहित्य प्रा. महेंद्र नाटेकर, कलमठ, ता. कणकवली या ठिकाणी पाठवावे, असे आवाहन वृक्षमित्र संघाने केले आहे.