शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

भरती बंदचा फटका...

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

गंभीर प्रश्न : शिक्षक भरती रखडल्याने जामीनदारांची वानवा

आनंद त्रिपाठी - वाटूळ -महाराष्ट्र शासनाने मे २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणल्याने शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षक व सेवकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढी कार्यरत असून, अनेक कर्मचाऱ्यांची नाळ या पतपेढीशी जोडली गेली आहे. शिक्षक भरती रखडल्याचा मोठा फटका आता पतपेढीच्या शिक्षक सेवक सभासदांनाही बसू लागला आहे.जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील एक हजाराच्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, जवळपास एवढेच कर्मचारी ३ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक पतपेढीमध्ये दोन शिक्षक वा सेवक जामीनदार म्हणून एका कर्जदाराला लागतात. परिणामी जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते शाळेमध्ये सहकाऱ्याला जामीनदार असतात. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या कर्जदाराला अन्य जामीनदार बदलून द्यावा लागतो. परंतु गेल्या ३ वर्षांपासून भरती प्रक्रियाच बंद असल्याने पतपेढीमध्ये नवीन सभासदांची संख्या वाढली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात नवीन जामीनदार देण्यासाठी अनेक शाळांमध्ये सभासदच शिल्लक नसल्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पतपेढीची नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय त्यांची पेन्शन केस पूर्णच होत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सभासदवर्गातून होत आहे. जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरणार कधी? हा प्रश्न भेडसावत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची संख्या मोठी आहे. शिक्षक भरती रखडल्याचा परिणाम मोठा असून, तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पतपेढीतून कर्ज घेणाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, हा सारा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.