शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

भरती बंदचा फटका...

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

गंभीर प्रश्न : शिक्षक भरती रखडल्याने जामीनदारांची वानवा

आनंद त्रिपाठी - वाटूळ -महाराष्ट्र शासनाने मे २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणल्याने शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षक व सेवकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढी कार्यरत असून, अनेक कर्मचाऱ्यांची नाळ या पतपेढीशी जोडली गेली आहे. शिक्षक भरती रखडल्याचा मोठा फटका आता पतपेढीच्या शिक्षक सेवक सभासदांनाही बसू लागला आहे.जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील एक हजाराच्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, जवळपास एवढेच कर्मचारी ३ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक पतपेढीमध्ये दोन शिक्षक वा सेवक जामीनदार म्हणून एका कर्जदाराला लागतात. परिणामी जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते शाळेमध्ये सहकाऱ्याला जामीनदार असतात. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या कर्जदाराला अन्य जामीनदार बदलून द्यावा लागतो. परंतु गेल्या ३ वर्षांपासून भरती प्रक्रियाच बंद असल्याने पतपेढीमध्ये नवीन सभासदांची संख्या वाढली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात नवीन जामीनदार देण्यासाठी अनेक शाळांमध्ये सभासदच शिल्लक नसल्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पतपेढीची नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय त्यांची पेन्शन केस पूर्णच होत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सभासदवर्गातून होत आहे. जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरणार कधी? हा प्रश्न भेडसावत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची संख्या मोठी आहे. शिक्षक भरती रखडल्याचा परिणाम मोठा असून, तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पतपेढीतून कर्ज घेणाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, हा सारा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.