शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

भरती बंदचा फटका...

By admin | Updated: July 24, 2015 00:39 IST

गंभीर प्रश्न : शिक्षक भरती रखडल्याने जामीनदारांची वानवा

आनंद त्रिपाठी - वाटूळ -महाराष्ट्र शासनाने मे २०१२ पासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणल्याने शैक्षणिक व प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिक्षक व सेवकांसाठी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढी कार्यरत असून, अनेक कर्मचाऱ्यांची नाळ या पतपेढीशी जोडली गेली आहे. शिक्षक भरती रखडल्याचा मोठा फटका आता पतपेढीच्या शिक्षक सेवक सभासदांनाही बसू लागला आहे.जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील एक हजाराच्या आसपास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, जवळपास एवढेच कर्मचारी ३ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. माध्यमिक पतपेढीमध्ये दोन शिक्षक वा सेवक जामीनदार म्हणून एका कर्जदाराला लागतात. परिणामी जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत ते शाळेमध्ये सहकाऱ्याला जामीनदार असतात. सेवानिवृत्तीपूर्वी त्यांच्या कर्जदाराला अन्य जामीनदार बदलून द्यावा लागतो. परंतु गेल्या ३ वर्षांपासून भरती प्रक्रियाच बंद असल्याने पतपेढीमध्ये नवीन सभासदांची संख्या वाढली नाही. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यात नवीन जामीनदार देण्यासाठी अनेक शाळांमध्ये सभासदच शिल्लक नसल्याने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पतपेढीची नाहरकत दाखला मिळाल्याशिवाय त्यांची पेन्शन केस पूर्णच होत नाही. पुढील महिन्यात होणाऱ्या पतपेढीच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी सभासदवर्गातून होत आहे. जिल्ह्यातील ३००पेक्षा अधिक माध्यमिक शाळांमधील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरणार कधी? हा प्रश्न भेडसावत असतानाच निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांची संख्या मोठी आहे. शिक्षक भरती रखडल्याचा परिणाम मोठा असून, तीन वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पतपेढीतून कर्ज घेणाऱ्यांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांऐवजी अन्य कर्मचाऱ्यांची शोधाशोध करावी लागत आहे. मात्र, हा सारा विषय चिंता वाढविणारा ठरला आहे.