शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोर उमेदवार आधीच भूमिगत?

By admin | Updated: February 12, 2017 22:35 IST

बंडाचा झेंडा फडकणार की उतरणार? : आज ठरणार निवडणूक रिंगणातून माघारीच्या आलेखाची उंची

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळी शिवसेनेमध्ये ‘न भुतो न भविष्यती’ अशी बंडखोरी झाली आहे. १३ फेब्रुवारीला बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत, म्हणून पक्ष नेत्यांकडून विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. आपल्यावरील दबाव व अर्ज माघार टाळण्यासाठी काही बंडखोर भूमिगत झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बंडाचा झेंडा फडकणार की खाली उतरवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यावरच माघारीच्या आलेखाची उंची ठरणार आहे. जिल्ह्यात शिवसेनेत उमेदवारीसाठी असंख्य कार्यकर्ते इच्छुक होते. मात्र, त्या सर्वांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य नव्हते. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनेक विद्यमान सदस्यांनाही यावेळी उमेदवारी मिळालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्ता म्हणून काम करूनही त्याची पक्षाने दखल घेतली नाही, असेही अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात शिवसेनेतील इच्छुकांनीच मोठ्या प्रमाणात बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील इच्छुकांचे बंड हे केवळ अपक्ष उमेदवारी भरण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर या बंडखोरांना भाजपने आपल्या गोटात घेऊन उमेदवारीही बहाल केली आहे. त्यामुळे भाजपला आयते उमेदवार मिळालेच त्याचबरोबर जिल्ह्याच्या विविध भागात बंडखोर उमेदवारांसह सेना कार्यकर्ते भाजपमध्ये आल्याने पक्षाचे बळही आपोआपच वाढले आहे. या बंडखोरीचे रुपांतर पक्षांतरामध्ये झाले आहे. ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्याचे वाटत होते तरीही दुसऱ्या पक्षात जायचे नव्हते किंवा ज्यांना भाजपमधून वा अन्य पक्षातून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी थेट बंडखोरी करीत सेनेच्याच उमेदवारांविरोधात निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. रत्नागिरी तालुक्यातील बंडखोरी ही नवीन-जुना या वादातून झाली आहे. सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती नीलेश लाड यांनी नाचणे जिल्हा परिषद गटातून अपक्ष तर नाचणे गणातून भाजपतर्फे अर्ज दाखल केला आहे. हरचेरी गटामध्ये सेनेच्या विनया गावडे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड करीत कॉँग्रेसमधून उमेदवारी दाखल केली आहे. गोळप गटातही सेनेमध्ये बंडखोरी झाली आहे. कर्ला गणात सेनेचे नदीम सोलकर यांनी बंड केले. त्यांनी ५ फेब्रुवारीला सेनेचा राजीनामा तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्याकडे सोपवला आहे. सोलकर यांनी स्थानिक पातळीवर मतांचे विभाजन टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत आता सेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दक्षिण रत्नागिरीतील लांजा, राजापूर व संगमेश्वरमध्येही सेनेत बंडखोरी झाली असून, तेथील काही बंडखोर ‘नॉट रिचेबल’ आहेत. संगमेश्वरमधील सेनेचे राजेश मुकादम यांनी बंडखोरी केली असून, ते सेनेच्या उमेदवार रचना महाडिक यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मुकादम हे माघार घेण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दक्षिण रत्नागिरीपेक्षाही उत्तर रत्नागिरीत यावेळी शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी व गीते-कदम गटात जोरदार चकमकी झडत असून, बंडखोरी केलेल्या अनेक इच्छुकांनी भाजपमधून अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल झाले आहेत. बंडखोरांची समजूत काढण्याचे नेत्यांचे प्रयत्न असफल ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे १३ फेब्रुवारीला बंडखोर निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची शक्यता धूसर झाली आहे. दुसरीकडे चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी बंड करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपची राजकीय ताकद वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या ५५ तर ९ पंचायत समितींच्या ११० अशा एकूण १६५ जागांसाठी येत्या २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे.