शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

सद्गुरु चरणातून खरी सुखप्राप्ती : फरिदाबादी

By admin | Updated: September 7, 2014 23:55 IST

आध्यात्मिक फेरी : निरंकारी मिशनचा उपक्रम

चिपळूण : आज जगातील प्रत्येक मनुष्य सुखी बनू इच्छितो. परंतु, सद्गुरुला शरण गेल्याशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने सुखी बनू शकत नाही. सुख आणि दु:खाची खरी परिभाषा सद्गुरु शिकवितो. जग ज्या गोष्टीला सुख आणि दु:ख मानते ते सुख अंतिम श्वासाला संपवून जाते. सद्गुरु आत्मा, परमात्माची भेट घालून जन्म मरणाच्या चक्रातून आत्म्याची सुटका करतो आणि खरे सुख प्रदान करतो, असे प्रतिपादन निरंकारी मिशनचे केंद्रीय प्रचारक चन्नी फरीदाबादी यांनी येथे केले.जगाच भलं व्हावं म्हणून संत महापुरुषांनी युगायुगाला मानवासाठी दिव्य संदेश दिले. याच हेतूने प्रेरित होऊन संत निरंकारी मिशन, चिपळूण, खेड, गुहागर या शाखेतर्फे चिपळूण शहरातून अध्यात्मिक जागृती फेरी काढण्यात आली. यानंतर राधाताई लाड सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चन्नी बोलत होते. सद्गुरु देशाचे दर्शन करुन देवाला पाहणारी दृष्टी आपल्या मूळ दृष्टीत टाकतो. वास्तविक निराकार ईश्वराच्या भेटीने मुक्ती प्राप्त होते. परंतु, ईश्वराचे दर्शन करविणाऱ्या सद्गुरुला धर्म ग्रंथाने देवापेक्षा महान म्हटले आहे. जसे तहान लागलेली व्यक्ती पाण्याचे उपकार मानत नाही तर तहान भागवणाऱ्याचे उपकार मानते. ईश्वराने लाखो, करोडोचे शरीर आपल्याला दिले आहे. ज्याचे शरीर चांगले आहे, त्याच्याजवळ सर्व दौलत आहे. परंतु, अशा मानवाचे मन प्रभूच्या स्मरणात लागत नाही आणि हेच मोठे नवल आहे, अशी भावनाही चन्नी यांनी व्यक्त केली. यावेळी क्षेत्रीय प्रबंधक गंगाधर विचारे यांनीही मनोगत व्यक्त केले. चेन्नी कमलेश यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन विजय विचारे यांनी केले. (वार्ताहर)अध्यात्मिक जागृतीद्वारे मिशनचा संदेश, सिद्धांत, समाजकारी आणि भक्ती विचारधारा बॅनर्स, गीते व माहिती चिपळूणवासीयांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फेरीतील शिस्त, परिधान केलेले अ‍ॅप्रन बॅनर्स, सेवादल वर्दीतील निरंकारी भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये छोट्या बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत निरंकारी भक्त सहभागी झाले होते.