शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

गुन्ह्यांची उकल करण्यात रत्नागिरी शेवटून दुसरा

By admin | Updated: October 16, 2015 22:38 IST

प्रशांत बुरडे : चोरीच्या टोळ्यांबाबतचे प्रकार फक्त अफवाच

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक गुन्ह्याचे प्रमाण पालघरमध्ये आहे. गुन्हे तपासणीचे ठाणे येथे ८६ टक्के, पालघर ६४ टक्के, रायगड ७४ टक्के, रत्नागिरी ६५ टक्के, तर सिंधुदूर्ग ८० टक्के प्रमाण आहे. त्यामुळे गुन्हे तपासणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कोकण परिक्षेत्रात चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील उपस्थित होते.गेल्या दोन महिन्यात रत्नागिरी जिल्ह््यातील विविध गावागावात फासेपारधी टोळ्या आल्या असून, रात्री ग्रामस्थ जागता पहारा ठेवत असल्याबाबत विचारले असता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी अफवा असल्याचे सांगितले. घटनेचा तपास केला असता यात काही सत्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात फासेपारध्यांचा उपद्रव सुरू आहे. मात्र, कोकणात हा उपद्रव नसल्याचे पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांनी सांगितले.सोशल मीडियावरून अशाप्रकारच्या अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे देवरूख व रत्नागिरी शहरातील प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली आहे. खूनाचा शोध घेणे सोपे असले तरी दरोडे, लूट याचा तपास लावणे तितकेच अवघड आहे. दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांकडून लवकरच ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बुरांडे यांनी दिली.शहरातील वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आराखडा पाठवण्यात आला आहे. आठवडा बाजार, महाविद्यालय परिसरातील प्रश्न मार्गी लागला आहे. हळूहळू शहरातील अन्य भागांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. वाहतूक अपघातामध्ये जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक चालकांचा वाहतूक परवाना रद्द करण्याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचीत करण्यात आल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तंटामुक्त अभियानाचा यावर्षीचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून, रखडलेल्या विजेत्यांचा सन्मान देखील लवकरच करण्यात येणार येईल. (प्रतिनिधी)नियमांचे पालन : वाहतुकीच्या प्रश्नासाठी तीन महत्वाच्या बाबीकोणताही शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडवत असताना तीन महत्त्वांच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहन चालवण्याचे नियम, त्याची केली जाणारी अंमलबजावणी, नियमांची अंमलबजावणी केली जात आहे का, सिग्नल यंत्रणा कार्यक्षम आहे का? तसेच वाहतूक पोलीसदेखील कार्यरत असणे तितकेच आवश्यक आहे. याशिवाय सिग्नल यंत्रणेचे होणारे पालन अथवा तोडण्याची मानसिकता आणि त्यावर होणारी कारवाई याबाबतही लक्ष देणे गरजेचे आहे.दोघांवर कारवाईरत्नागिरी जिल्ह्यात फासेपारधी टोळ््या आल्याचे वृत्त पसरले आहे. या केवळ अफवा असल्याचे प्रशांत बुरडे यांनी सांगितले. सोशल मीडियावरून अशाप्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.