शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जादा गाड्यांसाठी रत्नागिरी सज्ज

By admin | Updated: October 7, 2016 00:20 IST

मार्ग परिवहन महामंडळ : नऊ आगारातून १४१ गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : दीपावलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. दीपावलीनिमित्त नऊ आगारातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, मिरज, लातूर मार्गावर १४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रथम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांना दिवाळीची दोन आठवडे सुटी मिळते. या दिवसात पर्यटकांचीही संख्या वाढते. शिवाय सुटीला मुंबई अथवा अन्य शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच पर्यटन हंगामही आता सुरु होत असल्याने कोकणात पर्यटकांचीही वर्दळ वाढणार आहे.दापोली आगारातून कल्याण, ठाणे, मुंबई, भार्इंदर, बोरिवली मार्गावर बारा, तर खेड आगारातून ठाणे, मुंबई, लातूर मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून सर्वाधिक ३० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, चिंचवड, परळी, लातूर, तासगाव, मिरज, बोरिवली, मुंबई, ठाणे, गोंदवले मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातून अक्कलकोट, बोरिवली, भांडूप, विरार, स्वारगेट मार्गावर बारा गाड्या सोडण्यात येणार आहेत.देवरूख आगारातून स्वारगेट, अक्कलकोट, कोल्हापूर, स्वारगेट, कल्याण मार्गावर ९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून २० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आंबेजोगाई, इचलकरंजी, उस्मानाबाद, इस्लामपूर, मिरज, स्वारगेट, लातूर मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.लांजा आगारातून १२ गाड्यांचे नियोजन केले असून, तुळजापूर, बोरिवली, पुणे मार्गावर या जादा गाड्या धावणार आहेत. राजापूर आगारातून २४ गाड्या सोडण्यात येणार आहे.बोरिवली, तुळजापूर, लातूर, आंबेजोगाई, शिर्डी, सोलापूर मार्गावर गाड्या धावणार आहेत. मंडणगड आगारातून १४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नालासोपारा, मुंबई, कल्याण, स्वारगेट, कोल्हापूर, उस्मानाबाद मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे कोकणातील भाविक वारीला जात नाहीत. परंतु कार्तिकी एकादशीला कोकणातून काही ठिकाणांहून वारी निघते. शिवाय सुटीमुळे पंढरपूरला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अक्कलकोटला भाविक जात असल्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणात विदर्भातील मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून, थेट गाड्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आली दीपावली... : कोकणात येणार लाखो लोकदीपावलीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही रत्नागिरी एस. टी. विभाग दीपावलीसाठी सज्ज झाला आहे. यंदा विविध मार्गांवर एस. टी. १४१ जादा गाड्या सोडणार आहे.