शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

जादा गाड्यांसाठी रत्नागिरी सज्ज

By admin | Updated: October 7, 2016 00:20 IST

मार्ग परिवहन महामंडळ : नऊ आगारातून १४१ गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : दीपावलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. दीपावलीनिमित्त नऊ आगारातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, मिरज, लातूर मार्गावर १४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रथम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांना दिवाळीची दोन आठवडे सुटी मिळते. या दिवसात पर्यटकांचीही संख्या वाढते. शिवाय सुटीला मुंबई अथवा अन्य शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच पर्यटन हंगामही आता सुरु होत असल्याने कोकणात पर्यटकांचीही वर्दळ वाढणार आहे.दापोली आगारातून कल्याण, ठाणे, मुंबई, भार्इंदर, बोरिवली मार्गावर बारा, तर खेड आगारातून ठाणे, मुंबई, लातूर मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून सर्वाधिक ३० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, चिंचवड, परळी, लातूर, तासगाव, मिरज, बोरिवली, मुंबई, ठाणे, गोंदवले मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातून अक्कलकोट, बोरिवली, भांडूप, विरार, स्वारगेट मार्गावर बारा गाड्या सोडण्यात येणार आहेत.देवरूख आगारातून स्वारगेट, अक्कलकोट, कोल्हापूर, स्वारगेट, कल्याण मार्गावर ९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून २० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आंबेजोगाई, इचलकरंजी, उस्मानाबाद, इस्लामपूर, मिरज, स्वारगेट, लातूर मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.लांजा आगारातून १२ गाड्यांचे नियोजन केले असून, तुळजापूर, बोरिवली, पुणे मार्गावर या जादा गाड्या धावणार आहेत. राजापूर आगारातून २४ गाड्या सोडण्यात येणार आहे.बोरिवली, तुळजापूर, लातूर, आंबेजोगाई, शिर्डी, सोलापूर मार्गावर गाड्या धावणार आहेत. मंडणगड आगारातून १४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नालासोपारा, मुंबई, कल्याण, स्वारगेट, कोल्हापूर, उस्मानाबाद मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे कोकणातील भाविक वारीला जात नाहीत. परंतु कार्तिकी एकादशीला कोकणातून काही ठिकाणांहून वारी निघते. शिवाय सुटीमुळे पंढरपूरला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अक्कलकोटला भाविक जात असल्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणात विदर्भातील मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून, थेट गाड्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आली दीपावली... : कोकणात येणार लाखो लोकदीपावलीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही रत्नागिरी एस. टी. विभाग दीपावलीसाठी सज्ज झाला आहे. यंदा विविध मार्गांवर एस. टी. १४१ जादा गाड्या सोडणार आहे.