शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जादा गाड्यांसाठी रत्नागिरी सज्ज

By admin | Updated: October 7, 2016 00:20 IST

मार्ग परिवहन महामंडळ : नऊ आगारातून १४१ गाड्यांचे नियोजन

रत्नागिरी : दीपावलीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. दीपावलीनिमित्त नऊ आगारातून मुंबई, पुणे, अक्कलकोट, मिरज, लातूर मार्गावर १४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.प्रथम शैक्षणिक सत्र संपल्यानंतर शाळांना दिवाळीची दोन आठवडे सुटी मिळते. या दिवसात पर्यटकांचीही संख्या वाढते. शिवाय सुटीला मुंबई अथवा अन्य शहरात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यातच पर्यटन हंगामही आता सुरु होत असल्याने कोकणात पर्यटकांचीही वर्दळ वाढणार आहे.दापोली आगारातून कल्याण, ठाणे, मुंबई, भार्इंदर, बोरिवली मार्गावर बारा, तर खेड आगारातून ठाणे, मुंबई, लातूर मार्गावर आठ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. चिपळूण आगारातून सर्वाधिक ३० जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट, चिंचवड, परळी, लातूर, तासगाव, मिरज, बोरिवली, मुंबई, ठाणे, गोंदवले मार्गावर या गाड्या सोडण्यात येणार आहेत. गुहागर आगारातून अक्कलकोट, बोरिवली, भांडूप, विरार, स्वारगेट मार्गावर बारा गाड्या सोडण्यात येणार आहेत.देवरूख आगारातून स्वारगेट, अक्कलकोट, कोल्हापूर, स्वारगेट, कल्याण मार्गावर ९ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी आगारातून २० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आंबेजोगाई, इचलकरंजी, उस्मानाबाद, इस्लामपूर, मिरज, स्वारगेट, लातूर मार्गावर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.लांजा आगारातून १२ गाड्यांचे नियोजन केले असून, तुळजापूर, बोरिवली, पुणे मार्गावर या जादा गाड्या धावणार आहेत. राजापूर आगारातून २४ गाड्या सोडण्यात येणार आहे.बोरिवली, तुळजापूर, लातूर, आंबेजोगाई, शिर्डी, सोलापूर मार्गावर गाड्या धावणार आहेत. मंडणगड आगारातून १४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, नालासोपारा, मुंबई, कल्याण, स्वारगेट, कोल्हापूर, उस्मानाबाद मार्गावर गाड्या सोडण्यात येणार आहेत.आषाढी एकादशीला शेतीच्या कामामुळे कोकणातील भाविक वारीला जात नाहीत. परंतु कार्तिकी एकादशीला कोकणातून काही ठिकाणांहून वारी निघते. शिवाय सुटीमुळे पंढरपूरला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. अक्कलकोटला भाविक जात असल्यामुळे जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकणात विदर्भातील मोठा कर्मचारीवर्ग कार्यरत आहे. सुटीत गावाकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून, थेट गाड्यांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)आली दीपावली... : कोकणात येणार लाखो लोकदीपावलीसाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकर कोकणात येतात. त्यामुळे मुंबई ते रत्नागिरी मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही रत्नागिरी एस. टी. विभाग दीपावलीसाठी सज्ज झाला आहे. यंदा विविध मार्गांवर एस. टी. १४१ जादा गाड्या सोडणार आहे.