शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

रत्नागिरी आयटीआयचे विद्यार्थी ‘गॅस’वर

By admin | Updated: October 9, 2015 22:08 IST

निकालाची प्रतीक्षा : यंदा नोकरी मिळण्याची आशा धुसर

रत्नागिरी : आॅक्टोबरची दहा तारीख उलटून गेली तरी आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांची पुणे आणि मुंबईतील सहा कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थी म्हणून निवड झाली आहे. मात्र, त्यासाठी १४ आॅक्टोबरपूर्वी गुणपत्रक आवश्यक असल्याने आता या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रस्तरावरील एक व दोन वर्षे कालावधीचे जवळपास २५ अभ्यासक्रम शिकवले जातात. गेल्या वर्षीपासून अभ्यासक्रम पद्धत बदलली असून, वार्षिक ऐवजी आता सत्र पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षापासूनच निकाल उशिरा लागू लागले आहेत. यावर्षीही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षा आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात झाल्या. मात्र, नव्या ‘ओएमआर’ पद्धतीत पेपरही स्पर्धात्मक परीक्षेच्या पद्धतीने तपासले जाऊ लागले आहेत. त्यामुळे निकाल अनियमित झाले आहेत. सर्वच आयटीआयचे दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणारे निकाल, आॅक्टोबरची १० तारीख उजाडली तरी अद्याप जाहीर झालेले नाहीत. परीक्षेच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.त्यातच शेवटच्या सत्रात असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रशिक्षणार्थींची निवड करण्यासाठी विविध कंपन्या परीक्षेपूर्वीच मेळावे घेतात. यात निवड झालेल्यांना १६ आॅक्टोबरपासून ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून हजर करून घेतात. यावर्षी या आयटीआयमधील ११० विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे, तर ५० विद्यार्थ्यांना येथील कंपन्यांत सामावून घेण्यात आले आहे. तसेच पुणे, मुंबई येथे झालेल्या भरतीतही परस्पर विद्यार्थ्यांनी मुलाखत दिली असून, त्यांची निवड झाली आहे. मात्र, आता निकालपत्र हाती मिळाल्याशिवाय हे विद्यार्थी हजर होऊ शकत नाहीत. या विद्यार्थ्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत आपल्या गुणपत्रकासह कंपनीत हजर व्हायचे आहे. मात्र, अद्याप त्यांचे निकालच लागलेले नाहीत, तर गुणपत्रक कसे सादर करणार, अशी चिंता या विद्यार्थ्यांसह पालकांनाही भेडसावू लागली आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करीत आहेत. (प्रतिनिधी)स्वरूप बदलले : पेपर काळजीपूर्वक तपासले जात असल्याने विलंबगेल्या वर्षीपासून स्पर्धात्मक परीक्षांप्रमाणे आयटीआयच्या पेपरचे स्वरूप करण्यात आले आहे. त्यामुळे पेपर तपासण्याची पद्धत सोपी असली तरी विद्यार्थ्याने स्वत:चे नाव लिहिताना क्षुल्लकशी चूक केली तरी त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे पेपर काळजीपूर्वक तपासले जात असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी कंपन्यांना मुदत वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. - एस. टी. बाबर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीनिकालाचा पत्ताच नाहीरत्नागिरीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व अभ्यासक्रमांचे मिळून एकूण ७०० विद्यार्थी आहेत. तसेच पाली, करंजारी येथील आयटीआयचे २०० विद्यार्थी अशा एकूण ९०० विद्यार्थ्यांनी रत्नागिरी आयटीआय केंद्रावर परीक्षा दिली आहे.