शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

By admin | Updated: May 11, 2017 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : उन्हाळी सुटी पडल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच मुंबई व पुण्यातून मूळ कोकणवासीही त्यांच्या कुटुंबियांसह गावी आल्याने रेल्वे, एस. टी. बस यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने भरून वाहात आहे. पर्यटनस्थळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. या गर्दीने रत्नागिरी हाऊसफुल्ल झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचा हंगाम ऐन भरात आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे पर्यटक आता कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटनाबरोबरच फळांचा राजा हापूसचा स्वाद घेणेही यामुळे पर्यटकांना शक्य होत आहे. अनेक पर्यटक रत्नागिरी व जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमधून हापूसची खरेदी करून आपल्या गावी नेत आहेत. कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास गेल्या काही काळात वेगाने सुरू झाला आहे. तसेच स्थानिक लोकही पर्यटन व्यवसायाबाबत जागरुक झाले आहेत. या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगारासाठी मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढाही आता बराच कमी झाला आहे. जिल्ह्यात अनेक नावाजलेली पर्यटनस्थळे आहेत. त्यातच काही नवीन ठिकाणेही पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्टस, बॅकवॉटर सफारी, स्कुबा डायव्हिंगसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कोकणी, मालवणी रुचकर जेवण देणारी हॉटेल्सही उदयाला आली आहेत. लॉजिंगची सुविधाही घरोघरी न्याहरी निवासच्या माध्यमातून होऊ लागल्याने पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे आकर्षित झाले आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावस या नेहमीच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहेच, परंतु गणेशगुळे, आरे-वारे बीच, गुहागरचा बीच, हर्णै, परशुराम व अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.जिल्ह्यात येणारे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्यावर बेहद खूश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पर्यटकांची ही गर्दी येत्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटक व मुंबईकर यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोकणी मेवा, खाद्य पदार्थ, सुका मेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. येत्या शनिवारीही शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांची जिल्ह्यातील गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. पर्यटकांना चांगले मासे खाता यावेत, यासाठी हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. पर्यटकांची ये-जा वाढल्याने रस्त्याच्या कडेला हापूसची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहाळ्यांना पसंती : हापूस खरेदीत वाढजिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांनाही येथील कोकणी मेवा, ताजे मासे व त्याचे विविध प्रकार यांचा स्वाद घेण्यात अधिक आनंद असल्याचे दिसून येत आहे. शहाळ्याचे पाणी, कलिंगड व अननस विक्रीचे स्टॉल्स जागोजागी उभारण्यात आले आहेत.