शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

By admin | Updated: May 11, 2017 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : उन्हाळी सुटी पडल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच मुंबई व पुण्यातून मूळ कोकणवासीही त्यांच्या कुटुंबियांसह गावी आल्याने रेल्वे, एस. टी. बस यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने भरून वाहात आहे. पर्यटनस्थळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. या गर्दीने रत्नागिरी हाऊसफुल्ल झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचा हंगाम ऐन भरात आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे पर्यटक आता कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटनाबरोबरच फळांचा राजा हापूसचा स्वाद घेणेही यामुळे पर्यटकांना शक्य होत आहे. अनेक पर्यटक रत्नागिरी व जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमधून हापूसची खरेदी करून आपल्या गावी नेत आहेत. कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास गेल्या काही काळात वेगाने सुरू झाला आहे. तसेच स्थानिक लोकही पर्यटन व्यवसायाबाबत जागरुक झाले आहेत. या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगारासाठी मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढाही आता बराच कमी झाला आहे. जिल्ह्यात अनेक नावाजलेली पर्यटनस्थळे आहेत. त्यातच काही नवीन ठिकाणेही पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्टस, बॅकवॉटर सफारी, स्कुबा डायव्हिंगसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कोकणी, मालवणी रुचकर जेवण देणारी हॉटेल्सही उदयाला आली आहेत. लॉजिंगची सुविधाही घरोघरी न्याहरी निवासच्या माध्यमातून होऊ लागल्याने पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे आकर्षित झाले आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावस या नेहमीच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहेच, परंतु गणेशगुळे, आरे-वारे बीच, गुहागरचा बीच, हर्णै, परशुराम व अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.जिल्ह्यात येणारे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्यावर बेहद खूश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पर्यटकांची ही गर्दी येत्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटक व मुंबईकर यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोकणी मेवा, खाद्य पदार्थ, सुका मेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. येत्या शनिवारीही शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांची जिल्ह्यातील गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. पर्यटकांना चांगले मासे खाता यावेत, यासाठी हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. पर्यटकांची ये-जा वाढल्याने रस्त्याच्या कडेला हापूसची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहाळ्यांना पसंती : हापूस खरेदीत वाढजिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांनाही येथील कोकणी मेवा, ताजे मासे व त्याचे विविध प्रकार यांचा स्वाद घेण्यात अधिक आनंद असल्याचे दिसून येत आहे. शहाळ्याचे पाणी, कलिंगड व अननस विक्रीचे स्टॉल्स जागोजागी उभारण्यात आले आहेत.