शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

By admin | Updated: May 11, 2017 23:30 IST

रत्नागिरी जिल्हा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : उन्हाळी सुटी पडल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातच मुंबई व पुण्यातून मूळ कोकणवासीही त्यांच्या कुटुंबियांसह गावी आल्याने रेल्वे, एस. टी. बस यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, तर मुंबई-गोवा महामार्ग वाहनांच्या गर्दीने भरून वाहात आहे. पर्यटनस्थळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. या गर्दीने रत्नागिरी हाऊसफुल्ल झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचा हंगाम ऐन भरात आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस विक्रीसाठी आला आहे. त्यामुळे पर्यटक आता कोकणात मोठ्या संख्येने येत आहेत. पर्यटनाबरोबरच फळांचा राजा हापूसचा स्वाद घेणेही यामुळे पर्यटकांना शक्य होत आहे. अनेक पर्यटक रत्नागिरी व जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमधून हापूसची खरेदी करून आपल्या गावी नेत आहेत. कोकणातील पर्यटनस्थळांचा विकास गेल्या काही काळात वेगाने सुरू झाला आहे. तसेच स्थानिक लोकही पर्यटन व्यवसायाबाबत जागरुक झाले आहेत. या व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असल्याने रोजगारासाठी मुंबईकडे जाणारा तरुणांचा लोंढाही आता बराच कमी झाला आहे. जिल्ह्यात अनेक नावाजलेली पर्यटनस्थळे आहेत. त्यातच काही नवीन ठिकाणेही पर्यटनस्थळे म्हणून विकसित होत आहेत. रत्नागिरीसह जिल्ह्यात विविध ठिकाणी पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्टस, बॅकवॉटर सफारी, स्कुबा डायव्हिंगसारख्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अनेक ठिकाणी कोकणी, मालवणी रुचकर जेवण देणारी हॉटेल्सही उदयाला आली आहेत. लॉजिंगची सुविधाही घरोघरी न्याहरी निवासच्या माध्यमातून होऊ लागल्याने पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांकडे आकर्षित झाले आहेत. रत्नागिरीतील गणपतीपुळे, पावस या नेहमीच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहेच, परंतु गणेशगुळे, आरे-वारे बीच, गुहागरचा बीच, हर्णै, परशुराम व अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे.जिल्ह्यात येणारे पर्यटक येथील निसर्ग सौंदर्यावर बेहद खूश असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच पर्यटकांची ही गर्दी येत्या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. पर्यटक व मुंबईकर यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्येही गर्दी दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोकणी मेवा, खाद्य पदार्थ, सुका मेवा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. येत्या शनिवारीही शासकीय कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने शनिवार व रविवार या दोन दिवशी पर्यटकांची जिल्ह्यातील गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. पर्यटकांना चांगले मासे खाता यावेत, यासाठी हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. पर्यटकांची ये-जा वाढल्याने रस्त्याच्या कडेला हापूसची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहाळ्यांना पसंती : हापूस खरेदीत वाढजिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना व मुंबईकरांनाही येथील कोकणी मेवा, ताजे मासे व त्याचे विविध प्रकार यांचा स्वाद घेण्यात अधिक आनंद असल्याचे दिसून येत आहे. शहाळ्याचे पाणी, कलिंगड व अननस विक्रीचे स्टॉल्स जागोजागी उभारण्यात आले आहेत.