शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

रत्नागिरी शहर एलईडी पथदीपांनी उजळणार !

By admin | Updated: September 5, 2014 23:26 IST

पालिकेच्या येत्या सभेत होणार निर्णय : नाशिकच्या कंपनीकडून मोफत प्रकल्प; वीजबिलात होणार ३० टक्के कपात

प्रकाश वराडकर - रत्नागिरी --शहरातील साडेचार हजार पथदीपांची जागा ३६ ते ४० वॅटचे एलईडी पथदीप घेणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर या एलईडी दीपांनी उजळून निघणार आहे. हे पथदीप मोफत देण्याची तयारी नाशिक येथील ‘करंट टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने दाखविली आहे. रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या कंपनीने या योजनेसाठी निवड केली आहे. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार आहे. पालिकेच्या येत्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे देखभाल केले जाणारे व महावितरणकडून देखभाल होणारे असे साडेचार हजार पथदीप आहेत. या सर्व पथदीपांची जागा हे एलईडी पथदीप घेणार आहेत. साधारणपणे ३६ ते ४० किंवा अन्यत्र आवश्यकतेनुसारच्या क्षमतेचे एलईडी बसविण्याची कंपनीची तयारी आहे. सध्या पालिकेला दर महिन्याला पथदीपांच्या विजेसाठी १२ लाखांचे बिल महावितरणला अदा करावे लागते. एलईडी पथदीप बसविल्यानंतर या वीजबिलात ३० टक्के कपात होणार आहे. हा पालिकेचा फायदाच असून, सात वर्षे ही कमी झालेली बिलाची रक्कम या कंपनीला द्यावी लागणार आहे. सात वर्षांत पथदीपांची देखभाल पूर्णत: कंपनी पाहणार आहे. या योजनेतील सर्व पथदीपांचा खर्च ही कंपनीच करणार आहे. प्रत्येक पथदीपासाठी किमान सहा ते आठ हजारांचा खर्च अपेक्षित असून, साडेचार हजार पथदीपांचा खर्च कंपनीच करणार असल्याने पालिकेसाठी हा प्रकल्प वरदायी ठरणार असल्याचे मयेकर म्हणाले. एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबविताना कंपनी त्याचा उभारणी खर्च स्वत:च उचलणार आहे, यामागे नेमके काय कारण आहे, असे विचारता मयेकर म्हणाले, एलईडी दिव्यांना पावसाच्या पाण्यामुळे समस्या येते, असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस असलेल्या कोकणातील रत्नागिरी शहरात हा प्रकल्प राबवून तो यशस्वी करून दाखविण्याचा कंपनीचा मानस आहे. याद्वारे राज्यातील व देशातील अन्य भागांना या प्रकल्पाचा आदर्श घालून देण्याचा कंपनीचा मानस आहे.