शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

रत्नागिरी शहर एलईडी पथदीपांनी उजळणार !

By admin | Updated: September 5, 2014 23:26 IST

पालिकेच्या येत्या सभेत होणार निर्णय : नाशिकच्या कंपनीकडून मोफत प्रकल्प; वीजबिलात होणार ३० टक्के कपात

प्रकाश वराडकर - रत्नागिरी --शहरातील साडेचार हजार पथदीपांची जागा ३६ ते ४० वॅटचे एलईडी पथदीप घेणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहर या एलईडी दीपांनी उजळून निघणार आहे. हे पथदीप मोफत देण्याची तयारी नाशिक येथील ‘करंट टेक्नॉलॉजीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने दाखविली आहे. रत्नागिरीसह राज्यातील चार शहरांची या कंपनीने या योजनेसाठी निवड केली आहे. एलईडी बल्बमुळे पालिकेचे वीजबिलही कमी येणार आहे. पालिकेच्या येत्या सभेत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रत्नागिरी शहरात पालिकेतर्फे देखभाल केले जाणारे व महावितरणकडून देखभाल होणारे असे साडेचार हजार पथदीप आहेत. या सर्व पथदीपांची जागा हे एलईडी पथदीप घेणार आहेत. साधारणपणे ३६ ते ४० किंवा अन्यत्र आवश्यकतेनुसारच्या क्षमतेचे एलईडी बसविण्याची कंपनीची तयारी आहे. सध्या पालिकेला दर महिन्याला पथदीपांच्या विजेसाठी १२ लाखांचे बिल महावितरणला अदा करावे लागते. एलईडी पथदीप बसविल्यानंतर या वीजबिलात ३० टक्के कपात होणार आहे. हा पालिकेचा फायदाच असून, सात वर्षे ही कमी झालेली बिलाची रक्कम या कंपनीला द्यावी लागणार आहे. सात वर्षांत पथदीपांची देखभाल पूर्णत: कंपनी पाहणार आहे. या योजनेतील सर्व पथदीपांचा खर्च ही कंपनीच करणार आहे. प्रत्येक पथदीपासाठी किमान सहा ते आठ हजारांचा खर्च अपेक्षित असून, साडेचार हजार पथदीपांचा खर्च कंपनीच करणार असल्याने पालिकेसाठी हा प्रकल्प वरदायी ठरणार असल्याचे मयेकर म्हणाले. एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबविताना कंपनी त्याचा उभारणी खर्च स्वत:च उचलणार आहे, यामागे नेमके काय कारण आहे, असे विचारता मयेकर म्हणाले, एलईडी दिव्यांना पावसाच्या पाण्यामुळे समस्या येते, असा सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे सर्वाधिक पाऊस असलेल्या कोकणातील रत्नागिरी शहरात हा प्रकल्प राबवून तो यशस्वी करून दाखविण्याचा कंपनीचा मानस आहे. याद्वारे राज्यातील व देशातील अन्य भागांना या प्रकल्पाचा आदर्श घालून देण्याचा कंपनीचा मानस आहे.