शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

रत्नागिरी एपीएलधारक धान्यापासून वंंचित

By admin | Updated: August 25, 2014 22:52 IST

गणेशोत्सव तोंडावर : काळ्या बाजाराने धान्यखरेदीची वेळ

रत्नागिरी : गणेशोत्सवाला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, अजूनही एपीएल शिधापत्रिकाधारकांचे आॅगस्ट महिन्याचे धान्य आले नसल्याने त्यांना या सणासाठी काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील एपीएलधारकांची संख्या ९८,१९३ इतकी आहे. त्यांच्यासाठी दर महिन्याला ५६४ मेट्रिक टन गव्हाची आणि ४६१ मेट्रिक टन तांदळाची मागणी असते.केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांना मिळत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. मात्र, एपीएलधारकांना अनियमित धान्यपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेला प्रारंभ झाल्यानंतर एपीएलधारकांना तीन महिने धान्याची प्रतीक्षा करावी लागली होती. त्यानंतरही जुलै महिन्यापर्यंत धान्यपुरवठा करण्यात आला.मात्र, आता आॅगस्टच्या शेवटी गणेशोत्सवाला प्रारंभ होेत आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या प्राधान्य गटाला सप्टेंबरपर्यंतचा धान्यसाठा मंजूर करण्यात आला आहे. एपीएल शिधापत्रिकाधारकांसाठी अजूनही आॅगस्ट महिन्याचे नियतन मंत्रालयातच मंजूर होऊन आलेले नाही. गणेशोत्सवाला केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे सण कसा साजरा करणार, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, आतापर्यंत धान्यच उपलब्ध झाले नसल्याने एपीएलधारकांना काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होत आहे.ऐन गणेशोत्सवात अन्नधान्याच्या किमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना रास्त दराच्या दुकानाचा मोठा आधार ठरत होता. मात्र धान्यच न आल्याने या कार्डधारकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता उर्वरित एकदोन दिवसात तरी धान्य पदरात पडणार का? असा सवाल कार्डधारकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)े