शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राणेंचा प्रवेश स्वार्थासाठी! - संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 19:24 IST

भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.

ठळक मुद्देत्यांच्या प्रवेशाने भाजपचा फायदा नाही

कणकवली : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वत:च्या आणि आपल्या मुलांच्या स्वार्थासाठीच  भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपचा कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांचा कडाडून विरोध आहे. यासर्व बाबींचा विचार करून पक्षनेतृत्व त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांनी येथे केले. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल, सरचिटणीस परशुराम झगडे, महेश सावंत आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले,  भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध लोकांचा पक्ष आहे़ देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नीतेश राणे यांच्या समर्थकांनी माजी आमदार अप्पासाहेब गोगटे यांच्या कार्यालयावर व माजी आमदार अजित गोगटे यांच्या घरावर अंडी फेकली होती. अशी अनेक कृत्ये त्यांनी केली आहेत. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपात प्रवेश देणार नाहीत.  यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये चारवेळा पराभव झाल्याने राणेंचा जनाधार संपलेला आहे.  त्यामुळे कोणाचा तरी टेकू  मिळविण्यासाठी व मुलांच्या पुर्नवसनासाठी राणेंची धडपड सुरू आहे. २०१९ मध्ये कणकवलीत राहीलेले राणेंचे अस्तित्व विधानसभा निवडणुकीत संपेल. त्यांना पुन्हा आपला जनाधार पहायचा असेल तर  स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून स्वबळावर ही निवडणूक लढवावी.

नारायण राणे यांनी स्वत:च कणकवली मतदार संघातून  भाजपाचा उमेदवार म्हणून नीतेश राणे यांचे नाव जाहीर केले आहे. मात्र,  राणेंना उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला? विधानसभा निवडणुकीची उमेदवारी जिल्हा व राज्य भाजपा कोअर कमिटीत चर्चा करून  मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा जाहीर करतील. राणेंचा २०१४ मध्ये कुडाळ आणि मुंबईत असे दोन वेळा पराभव झाला.  राणेंच्या मुलाचा २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाला. राणेंचे चार पराभव झाले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे. यामुळेच राणेंना भाजपात घेऊन फायदा होणार नाही.  उलट राणेंना फायदा होईल.  राणे स्वत:च मी भाजपात प्रवेश करणार अशा बातम्या पसरवून निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी यावेळी केला.

ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा एकसंघ आहे. जिल्ह्यातील भाजपा वाढविण्यासाठी संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण,  विनोद तावडे, आमदार प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तसेच अन्य पदाधिकाºयांनी  फार मेहनत घेतली आहे. जिल्ह्यात भाजपा संघटना मजबूत आहे.

राणे १९९० मध्ये जिल्ह्यात आल्यानंतर मुंबईतील गुंड आणून दहशत पसरवायचे. कालांतराने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाच गुंड बनविल्याने अनेक जणांना कारावास झाला आहे. त्याला जबाबदार कोण? त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे हे सर्व पाहाता  भाजपात त्यांना प्रवेश मिळणार नाही. त्यांचा प्रवेश होणार असता तर यापूर्वीच झाला असता, असाटोलाही संदेश पारकर यांनी यावेळी लगावला.राणेंची सर्वच पक्षांवर टीका

नारायण राणे आतापर्यंत ज्या पक्षात गेले तेथील पक्ष नेतृत्वावर त्यांनी  टीका केली आहे. शिवसेना, काँग्रेस या पक्षात असताना त्यांनी टीका केली. तर भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार झाल्यावरही त्यांनी विश्वास यात्रा काढत भाजपवर टीका केली, असेही पारकर म्हणाले.

 

टॅग्स :konkanकोकणNarayan Raneनारायण राणे