शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:56 IST

भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.

ठळक मुद्देराणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठारपक्षातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही

कणकवली : भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.जनसंघाच्या शिकवणीप्रमाणे जसे असतील तसे घ्या आणि त्यांना आपल्याला हवे तसे घडवा या धोरणाप्रमाणे जो कोण भाजपात प्रवेश करेल त्याचे स्वागत असेल. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही. सर्वांचा विचार करूनच पक्षहिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परूळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, डॉ. अरविंद कुडतरकर, संतोष पुजारे, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यानुसार जे काम करतील त्यांना सोबत घेऊन पुढील संघटनात्मक बांधणी होणार आहे. कोकणातील परिस्थिती पाहता राज्य कोअर कमिटी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेईल. राणेंच्या भाजपा प्रवेशाला संदेश पारकर यांनी विरोध केला असून राणेंचा पक्ष प्रवेश झाला तर ते सिंधुदुर्ग भाजपा हायजॅक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ह्यसंदेश पारकर यांचे भाजपातील वय काय?ह्ण भाजप हायजॅक करायला हा पक्ष लेचापेचा नाही, असे जठार यांनी सांगितले.नाणार प्रकल्प हा १ लाख कुटुंबीयांच्या घरात चूल पेटवण्यासाठी व्हावा अशी आमची इच्छा आहे. कोकणातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी ८ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहेत.

या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन आवश्यक आहे. ६० टक्के जमीन शासनाला मिळत असल्याने आणि हजारो प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून प्रकल्प करण्यासाठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत समर्थकांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ आहे.खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय भाजपाच्या दीड ते दोन लाख मतांमुळे झाला हे विसरू नये. प्रकल्पाला विरोध करून बेरोजगार तरुणांची विनाकारण एकप्रकारे हत्या करू नये. ह्यपाठीवर मारा , पण पोटावर कोणाच्या मारू नकाह्ण. कोकणातील तरुण तुम्हांला माफ करणार नाहीत. प्रकल्पाला विरोध करून तरुणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांच्या घरातील चुली पेटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.प्रकल्पामुळे येथे जर परप्रांतीय येतील असे तुम्हांला वाटत असेल तर त्यावर चर्चा करा. मुंबईत तुमची सत्ता आहे. मग आता परप्रांतीयांची मुंबई झाली आहे. त्याला कोण जबाबदार? असा टोलाही जठार यांनी लगावला.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग