शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:56 IST

भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.

ठळक मुद्देराणेंचा भाजपा प्रवेश कोअर कमिटीचा निर्णय :प्रमोद जठारपक्षातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही

कणकवली : भारतीय जनता पार्टीत नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत राज्य कोअर कमिटीत निर्णय होईल. प्रदेशकडून जो निर्णय घेतला जाईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हाध्यक्ष म्हणून मी करणार आहे. कोकणात २०२४ पर्यंत शत-प्रतिशत भाजपा करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.जनसंघाच्या शिकवणीप्रमाणे जसे असतील तसे घ्या आणि त्यांना आपल्याला हवे तसे घडवा या धोरणाप्रमाणे जो कोण भाजपात प्रवेश करेल त्याचे स्वागत असेल. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी विचलित होण्याची गरज नाही. सर्वांचा विचार करूनच पक्षहिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले.कणकवली येथील भाजपा संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परूळेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेट्ये, डॉ. अरविंद कुडतरकर, संतोष पुजारे, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीच्या अजेंड्यानुसार जे काम करतील त्यांना सोबत घेऊन पुढील संघटनात्मक बांधणी होणार आहे. कोकणातील परिस्थिती पाहता राज्य कोअर कमिटी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेईल. राणेंच्या भाजपा प्रवेशाला संदेश पारकर यांनी विरोध केला असून राणेंचा पक्ष प्रवेश झाला तर ते सिंधुदुर्ग भाजपा हायजॅक करतील अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ह्यसंदेश पारकर यांचे भाजपातील वय काय?ह्ण भाजप हायजॅक करायला हा पक्ष लेचापेचा नाही, असे जठार यांनी सांगितले.नाणार प्रकल्प हा १ लाख कुटुंबीयांच्या घरात चूल पेटवण्यासाठी व्हावा अशी आमची इच्छा आहे. कोकणातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. नाणार प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी ८ हजार एकर जमिनीची संमतीपत्रे मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहेत.

या प्रकल्पासाठी १३ हजार एकर जमीन आवश्यक आहे. ६० टक्के जमीन शासनाला मिळत असल्याने आणि हजारो प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून प्रकल्प करण्यासाठी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पाबाबत समर्थकांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले़ आहे.खासदार विनायक राऊत यांनी आपला विजय भाजपाच्या दीड ते दोन लाख मतांमुळे झाला हे विसरू नये. प्रकल्पाला विरोध करून बेरोजगार तरुणांची विनाकारण एकप्रकारे हत्या करू नये. ह्यपाठीवर मारा , पण पोटावर कोणाच्या मारू नकाह्ण. कोकणातील तरुण तुम्हांला माफ करणार नाहीत. प्रकल्पाला विरोध करून तरुणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांच्या घरातील चुली पेटविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा.प्रकल्पामुळे येथे जर परप्रांतीय येतील असे तुम्हांला वाटत असेल तर त्यावर चर्चा करा. मुंबईत तुमची सत्ता आहे. मग आता परप्रांतीयांची मुंबई झाली आहे. त्याला कोण जबाबदार? असा टोलाही जठार यांनी लगावला.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग