शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची मते कायम : विरोधातील वाढली

By admin | Updated: May 18, 2014 00:30 IST

मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

 मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मिळालेले २६ हजाराचे मताधिक्य यावेळी गायब झाल्याचे आकडेवारीतून दिसत असले तरीही सहा मतदारसंघापैकी कणकवली विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसच्या उमेदवाराची मतपेटी कायम राहिली आहे. राणेंची मते कायम राहिली मात्र, त्यांच्या विरोधातील मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. २००९ च्या निवडणुकीत नीलेश राणे यांचा ४६ हजार मतांनी विजय झाला होता. त्यात कणकवली विधानसभा क्षेत्राचा तब्बल २६ हजार मतांचा वाटा होता. हे मताधिक्य आताच्या निवडणुकीत गायब झाल्यासारखे दिसत आहे. त्याचवेळी एकूण वाढलेल्या मतदानाचाही विचार करण्याची गरज आहे. हे वाढलेले मतदान राऊत यांच्या पारड्यात गेले आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रात राऊत यांना ७२६४१ तर राणे यांना ७१२६४ एवढी मते मिळाली. म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा पंचवीस हजारांचे मताधिक्य घटले आहे. बालेकिल्ल्यानेच कॉँग्रेसला दणका दिल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. दुसर्‍या बाजूने पाहिल्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातच कॉँग्रेसच्या १३७७ मतांची घट झाली आहे. वास्तविक गेल्या निवडणुकीत नीलेश राणे यांना कणकवली विधानसभा क्षेत्रात ७०००१ मते मिळाली होती. त्यात वाढ होऊन या निवडणुकीत त्यांना ७१२६४ मते मिळाली आहेत. त्यामुळे नीलेश राणे यांना त्यांचे हक्काचे मतदान झालेले आहे. हजारभर मते जास्तच पडली आहेत. मात्र, त्यांच्यासमोर उभे ठाकलेल्या विनायक राऊत यांना वाढलेल्या मतदानाचा फायदा झाला आहे. मागील निवडणुकीत सुरेश प्रभू यांना या क्षेत्रात ४३,९३३ मते होती. यावेळी राऊत यांना ७२६४१ मते पडली. म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा २८,७०८ मते शिवसेनेच्या उमेदवाराला जास्त पडली. जे जास्तीचे मतदान झाले ते सर्व शिवसेनेच्या पारड्यात गेले आहे. वाढलेल्या मतदानाने कॉँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळवल्याचे दिसत आहे. सुरेश प्रभ हे स्वच्छ प्रतिमेचे हुशार व्यक्तिमत्त्व होते. मात्र, त्यांनी २००९च्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात जास्त संपर्क ठेवला नाही. राऊत यांनी यावेळी ही चूक केलेली नाही. त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करत वाडीवस्तीवर जाऊन मतदारांना भेटी दिल्या. त्यावेळी भाजपाने आमदार जठार आणि जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली सुसूत्रपणे प्रचार राबविला. कणकवलीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि आमदार प्रमोद जठार तेवढेच कारणीभूत ठरले आहे. जठार यांनी आपल्या आगामी विधानसभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत उघडलेल्या जोरदार आघाडीने नाराज मतदारांना बाहेर काढण्यासाठी उद्युक्त केले. त्याचवेळी कॉँग्रेसचा गाफीलपणा नडला का याचाही विचार झाला पाहिजे. या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढली. वाढलेल्या मतदानात युवा वर्गाचाही मोठा सहभाग आहे. कॉँग्रेसचा आपला टक्का कायम राहिला. मात्र, नाराज मतदार बाहेर पडला तर काय होईल, याकडे कॉँग्रेसचे दुर्लक्ष झाले. नमो फॅक्टरसह वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मारलेली मुसंडी, आमदार जठार यांनी गेल्या पाच वर्षांत केलेला दबदबा, त्याचबरोबर कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची दंडेलशाही, ठेकेदारीतील एकाधिकारशाहीतून निर्माण झालेला अंतर्गत कलह अशी कारणे या विरोधात वाढलेल्या मतांमागे असू शकतात.