शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
3
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
4
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
5
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
6
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
7
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
8
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
9
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
10
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
11
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
12
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
13
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
14
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
15
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
16
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
17
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
18
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
19
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
20
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश

राणेंची मते कायम : विरोधातील वाढली

By admin | Updated: May 18, 2014 00:30 IST

मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

 मिलिंद पारकर ल्ल कणकवली लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. गेल्या निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मिळालेले २६ हजाराचे मताधिक्य यावेळी गायब झाल्याचे आकडेवारीतून दिसत असले तरीही सहा मतदारसंघापैकी कणकवली विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसच्या उमेदवाराची मतपेटी कायम राहिली आहे. राणेंची मते कायम राहिली मात्र, त्यांच्या विरोधातील मते वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. २००९ च्या निवडणुकीत नीलेश राणे यांचा ४६ हजार मतांनी विजय झाला होता. त्यात कणकवली विधानसभा क्षेत्राचा तब्बल २६ हजार मतांचा वाटा होता. हे मताधिक्य आताच्या निवडणुकीत गायब झाल्यासारखे दिसत आहे. त्याचवेळी एकूण वाढलेल्या मतदानाचाही विचार करण्याची गरज आहे. हे वाढलेले मतदान राऊत यांच्या पारड्यात गेले आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रात राऊत यांना ७२६४१ तर राणे यांना ७१२६४ एवढी मते मिळाली. म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा पंचवीस हजारांचे मताधिक्य घटले आहे. बालेकिल्ल्यानेच कॉँग्रेसला दणका दिल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. दुसर्‍या बाजूने पाहिल्यास कणकवली विधानसभा क्षेत्रातच कॉँग्रेसच्या १३७७ मतांची घट झाली आहे. वास्तविक गेल्या निवडणुकीत नीलेश राणे यांना कणकवली विधानसभा क्षेत्रात ७०००१ मते मिळाली होती. त्यात वाढ होऊन या निवडणुकीत त्यांना ७१२६४ मते मिळाली आहेत. त्यामुळे नीलेश राणे यांना त्यांचे हक्काचे मतदान झालेले आहे. हजारभर मते जास्तच पडली आहेत. मात्र, त्यांच्यासमोर उभे ठाकलेल्या विनायक राऊत यांना वाढलेल्या मतदानाचा फायदा झाला आहे. मागील निवडणुकीत सुरेश प्रभू यांना या क्षेत्रात ४३,९३३ मते होती. यावेळी राऊत यांना ७२६४१ मते पडली. म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा २८,७०८ मते शिवसेनेच्या उमेदवाराला जास्त पडली. जे जास्तीचे मतदान झाले ते सर्व शिवसेनेच्या पारड्यात गेले आहे. वाढलेल्या मतदानाने कॉँग्रेसचे मनसुबे धुळीस मिळवल्याचे दिसत आहे. सुरेश प्रभ हे स्वच्छ प्रतिमेचे हुशार व्यक्तिमत्त्व होते. मात्र, त्यांनी २००९च्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात जास्त संपर्क ठेवला नाही. राऊत यांनी यावेळी ही चूक केलेली नाही. त्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार करत वाडीवस्तीवर जाऊन मतदारांना भेटी दिल्या. त्यावेळी भाजपाने आमदार जठार आणि जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली सुसूत्रपणे प्रचार राबविला. कणकवलीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि आमदार प्रमोद जठार तेवढेच कारणीभूत ठरले आहे. जठार यांनी आपल्या आगामी विधानसभेचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत उघडलेल्या जोरदार आघाडीने नाराज मतदारांना बाहेर काढण्यासाठी उद्युक्त केले. त्याचवेळी कॉँग्रेसचा गाफीलपणा नडला का याचाही विचार झाला पाहिजे. या निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढली. वाढलेल्या मतदानात युवा वर्गाचाही मोठा सहभाग आहे. कॉँग्रेसचा आपला टक्का कायम राहिला. मात्र, नाराज मतदार बाहेर पडला तर काय होईल, याकडे कॉँग्रेसचे दुर्लक्ष झाले. नमो फॅक्टरसह वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मारलेली मुसंडी, आमदार जठार यांनी गेल्या पाच वर्षांत केलेला दबदबा, त्याचबरोबर कॉँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची दंडेलशाही, ठेकेदारीतील एकाधिकारशाहीतून निर्माण झालेला अंतर्गत कलह अशी कारणे या विरोधात वाढलेल्या मतांमागे असू शकतात.