शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

संधी देऊनही राणेंनी विकास केला नाहीप्रमोद जठार :

By admin | Updated: August 17, 2014 22:33 IST

शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ मेळाव्यात टीका

शिरगांव : जनतेने २५ वर्षे संधी देऊनही पालकमंत्री नारायण राणे यांनी जिल्ह्याचा विकास केला नाही. आता त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा करायच्या, अशी टीका आमदार प्रमोद जठार यांनी शिरगांव येथील मेळाव्यात केली.शिरगांव आंबेखोल येथे शिरगांव जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा १६ आॅगस्ट रोजी झाला. यावेळी आमदार जठार बोलत होते. ते म्हणाले, कचऱ्याचे साम्राज्य सर्वांनी पाहिले, मात्र साम्राज्याचा झालेला कचरा जिल्हावासियांनी पाहिला आहे. नारायण राणेंवर जनतेने प्रेम केले. २०-२५ वर्षे संधी दिली. विविध मंत्रीपदे, खासदारकी मिळाली, पण विकास करू शकले नाहीत. विकासात ते नापास झालेत. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत भगवा फडकणार याची सर्वप्रथम चाहूल नारायण राणेंनाच लागली. याची कबुली त्यांनी आपल्या राजीनामानाट्यात बोलूनही दाखवली, अशी टीका जठार यांनी यावेळी केली. आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, इकोसेन्सिटिव्ह काँग्रेसने लादली. चिरे म्हणजे बॉक्साईट नव्हे, हे पटवून दिले. सत्तेत असताना अधिस्थगन उठवू न शकलेले पालकमंत्री आता पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचे सांगत आहेत. नारायण राणे यांना शिवसेनाप्रमुखांनी मुख्यमंत्री करुन नराचा नारायण केला. लोकसभेतील निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने ते सर्वांवर टीका करत आहेत.नेत्याला जनतेचा कळवळा असायला हवा. सत्ता ही रोजी रोटीसाठी नाही. जनतेला सर्व खरं खोट कळते. त्याचेच उत्तर निकालात मिळते, अशीही टीका जठार यांनी यावेळी केली.शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर, देवगड तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले, उपाध्यक्ष राजेंद्र शेटये, सरचिटणीस संजय बांबुळकर, जिल्हा परिषद गटप्रमुख संतोषकुमार फाटक, माजी तालुका सरचिटणीस मंगेश लोके, राजाराम राणे, ग्रामपंचायत सदस्या अपूर्वा तावडे, दिगंबर तावडे, अमोल लोके, सयाजी पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)