शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रामाला विसरणारे तुम्हाला काय लक्षात ठेवणार :राणे

By admin | Updated: October 7, 2014 23:36 IST

भाजपवर हल्लाबोल : वैभववाडीत काँग्रेसची प्रचारसभe

वैभववाडी : प्रभू रामाला विसरणारे भाजपवाले तुम्हाला काय लक्षात ठेवणार? असा प्रश्न करीत महाराष्ट्रावर केंद्रातील मोदी सरकार सूड उगवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी येथे केला. राज्यात भाजप कधीच सत्तेवर येणार नाही, असेही ते म्हणाले.येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाच्या मंडपात काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ आज, मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, दिगंबर पाटील, सभापती वैशाली रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, स्नेहलता चोरगे, भालचंद्र साठे, विकास काटे, बंड्या मांजरेकर, बाळा हरयाण, बाप्पी मांजरेकर, संदीप कदम, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी जाहिरात करणारे मोदी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणे सोडाच; परंतु चार महिने नियंत्रणातही ठेवू शकले नाहीत. उलट सरकारच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये इजिप्तचा कांदा त्यांनी आणून ठेवलाय आणि त्याचा व्यापारीही गुजरातचा आहे. गेल्या निवडणुकीत जाहिरातींवर खर्च केलेला पैसा कुठला? हा भ्रष्टाचाराचा नव्हे का? आठ दिवस मोदी महाराष्ट्रात फिरत आहेत; परंतु माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. खोट्या जाहिराती दाखवून  जनतेला फसवणे भाजपचा पिंड आहे. मोदींएवढा स्वस्त पंतप्रधान जगात कुठेही सापडणार नाही, अशी खिल्ली उडवत मोदी कासार्डेत येतील, माझ्यावर टीका करून जातील; परंतु त्यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे नंतर मी काय करतो ते बघाच, असा अप्रत्यक्ष इशारा राणेंनी दिला. भूलथापांना बळी पडू नकाराणेंनी विजय सावंत व अतुल रावराणे यांच्यावरही सडकून टीका केली. अंबरनाथच्या अतुलला कधी कोणी पाहिले आहे का? असा सवाल करीत विजय सावंत हा विक्षिप्त माणूस आहे. कारखाना काढण्याची त्याची क्षमताच नाही. निवडणुकीनंतर येथील सर्व गुंडाळून मुंबईला पळून जाईल. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांना तालुक्यातून एकही मत पडता कामा नये आणि गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले. (प्रतिनिधी)