शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

रामाला विसरणारे तुम्हाला काय लक्षात ठेवणार :राणे

By admin | Updated: October 7, 2014 23:36 IST

भाजपवर हल्लाबोल : वैभववाडीत काँग्रेसची प्रचारसभe

वैभववाडी : प्रभू रामाला विसरणारे भाजपवाले तुम्हाला काय लक्षात ठेवणार? असा प्रश्न करीत महाराष्ट्रावर केंद्रातील मोदी सरकार सूड उगवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी येथे केला. राज्यात भाजप कधीच सत्तेवर येणार नाही, असेही ते म्हणाले.येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाच्या मंडपात काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ आज, मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, दिगंबर पाटील, सभापती वैशाली रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, स्नेहलता चोरगे, भालचंद्र साठे, विकास काटे, बंड्या मांजरेकर, बाळा हरयाण, बाप्पी मांजरेकर, संदीप कदम, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी जाहिरात करणारे मोदी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणे सोडाच; परंतु चार महिने नियंत्रणातही ठेवू शकले नाहीत. उलट सरकारच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये इजिप्तचा कांदा त्यांनी आणून ठेवलाय आणि त्याचा व्यापारीही गुजरातचा आहे. गेल्या निवडणुकीत जाहिरातींवर खर्च केलेला पैसा कुठला? हा भ्रष्टाचाराचा नव्हे का? आठ दिवस मोदी महाराष्ट्रात फिरत आहेत; परंतु माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. खोट्या जाहिराती दाखवून  जनतेला फसवणे भाजपचा पिंड आहे. मोदींएवढा स्वस्त पंतप्रधान जगात कुठेही सापडणार नाही, अशी खिल्ली उडवत मोदी कासार्डेत येतील, माझ्यावर टीका करून जातील; परंतु त्यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे नंतर मी काय करतो ते बघाच, असा अप्रत्यक्ष इशारा राणेंनी दिला. भूलथापांना बळी पडू नकाराणेंनी विजय सावंत व अतुल रावराणे यांच्यावरही सडकून टीका केली. अंबरनाथच्या अतुलला कधी कोणी पाहिले आहे का? असा सवाल करीत विजय सावंत हा विक्षिप्त माणूस आहे. कारखाना काढण्याची त्याची क्षमताच नाही. निवडणुकीनंतर येथील सर्व गुंडाळून मुंबईला पळून जाईल. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांना तालुक्यातून एकही मत पडता कामा नये आणि गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले. (प्रतिनिधी)