शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रामाला विसरणारे तुम्हाला काय लक्षात ठेवणार :राणे

By admin | Updated: October 7, 2014 23:36 IST

भाजपवर हल्लाबोल : वैभववाडीत काँग्रेसची प्रचारसभe

वैभववाडी : प्रभू रामाला विसरणारे भाजपवाले तुम्हाला काय लक्षात ठेवणार? असा प्रश्न करीत महाराष्ट्रावर केंद्रातील मोदी सरकार सूड उगवत आहे, असा आरोप काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नारायण राणे यांनी येथे केला. राज्यात भाजप कधीच सत्तेवर येणार नाही, असेही ते म्हणाले.येथील सार्वजनिक दुर्गामाता उत्सव मंडळाच्या मंडपात काँग्रेसचे कणकवली मतदारसंघातील उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ आज, मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, दिगंबर पाटील, सभापती वैशाली रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, दिलीप रावराणे, स्नेहलता चोरगे, भालचंद्र साठे, विकास काटे, बंड्या मांजरेकर, बाळा हरयाण, बाप्पी मांजरेकर, संदीप कदम, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी जाहिरात करणारे मोदी सत्तेवर आल्यावर महागाई कमी करणे सोडाच; परंतु चार महिने नियंत्रणातही ठेवू शकले नाहीत. उलट सरकारच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये इजिप्तचा कांदा त्यांनी आणून ठेवलाय आणि त्याचा व्यापारीही गुजरातचा आहे. गेल्या निवडणुकीत जाहिरातींवर खर्च केलेला पैसा कुठला? हा भ्रष्टाचाराचा नव्हे का? आठ दिवस मोदी महाराष्ट्रात फिरत आहेत; परंतु माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्याची धमक त्यांच्यात नाही. खोट्या जाहिराती दाखवून  जनतेला फसवणे भाजपचा पिंड आहे. मोदींएवढा स्वस्त पंतप्रधान जगात कुठेही सापडणार नाही, अशी खिल्ली उडवत मोदी कासार्डेत येतील, माझ्यावर टीका करून जातील; परंतु त्यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. त्यामुळे नंतर मी काय करतो ते बघाच, असा अप्रत्यक्ष इशारा राणेंनी दिला. भूलथापांना बळी पडू नकाराणेंनी विजय सावंत व अतुल रावराणे यांच्यावरही सडकून टीका केली. अंबरनाथच्या अतुलला कधी कोणी पाहिले आहे का? असा सवाल करीत विजय सावंत हा विक्षिप्त माणूस आहे. कारखाना काढण्याची त्याची क्षमताच नाही. निवडणुकीनंतर येथील सर्व गुंडाळून मुंबईला पळून जाईल. त्यामुळे त्याच्या भूलथापांना बळी पडू नका. विरोधकांना तालुक्यातून एकही मत पडता कामा नये आणि गद्दारी अजिबात खपवून घेणार नाही, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले. (प्रतिनिधी)