शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरची वखार ही पराक्रमाची गाथा

By admin | Updated: November 10, 2014 23:59 IST

बाबासाहेब पुरंदरे : उलगडले शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू

राजापूर : छत्रपती शिवरायांच्या काळात इतिहासभूमी म्हणून राजापूरला फार मोलाचे स्थान आहे. याच भूमीत बाळाजी आवजी चित्रे यांच्यासारखा हिरा राजांना लाभला. अफझलखानावरील स्वारीशी याच राजापूरचा निकटचा संबंध होता, तर गोमंतक मोहिमेची तयारी इथेच पार पडली. अशा राजापुरातील ब्रिटिशांची जिंकलेली वखार ही छत्रपतींच्या पराक्रमाची गाथा होती. त्यामुळे जीर्णावस्थेतील वखार पाडणे ही मोठी चूक होती, अशी खंत ज्येष्ठ इतिहासकार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी राजापुरातील आयोजित कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.राजापुरातील मित्रमेळा आयोजित शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाला मोठी गर्दी उसळली होती. सायंकाळी ५ वाजता सुरु झालेला कार्यक्रम तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ चालला. जंजिऱ्याच्या सिध्दीने परदेशात गुलाम म्हणून विक्री करण्यासाठी पाठवलेल्या कुटुंबाचा लिलाव राजापुरात झाला होता. तो विसाजी शंकर तुंगारे यांनी घेतला होता. यामध्ये त्या तुंगारेंची बहीण व मुले यांचा समावेश होता. त्यातील एक मुलगा बाळाजी याने महाराजांना पाठवलेल्या पत्राचा आशय व त्याचे सुंदर हस्ताक्षर पाहून महाराज कसे प्रभावीत झाले आणि तो मुलगा पुढे बाळाजी आवजी चित्रे ऊर्फ चिटणीस कसा झाला याचा इतिहासच त्यांनी सादर केला. त्यानंतर अष्टप्रधान मंडळात बाळाजीला स्थान देताना छत्रपती राजे व बाळाजी यांच्यातील झालेले संभाषण विषद केले. इतिहास काळातील सापडलेले दस्तऐवज कसे होते, त्याचे दाखले शिवरायांनी दिले.राजापूरच्या खाडीत अफजलखानाची तैनात असलेली तीन जहाजे ताब्यात घेण्यासाठी महाराजांचा मावळा दादोजी कसा चालून आला, त्याच्या भीतीने दोन जहाजे खोल समुद्रात निसटण्यात यशस्वी ठरली, त्यांना पलायन करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली. त्या इतिहासाची एकेक पाने शिवरायांनी उलगडली. छत्रपती शिवाजी राजांनी कोकणचा प्रांत जिंकला होता. त्यामध्ये राजापूरच्या वखारीचादेखील समावेश होता. त्यामुळे ती ब्रिटिशांची असली तरी छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा होती. अशी वखार जिर्णावस्थेत असल्याचे कारण देऊन शासनाने जमीनदोस्त केली. याबद्दल खंत व्यक्त करत बाबासाहेब पुरंदरेंनी कडवट टीका केली. वखार पाडायला नको होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.स्वराज्याच्या लढ्यात राजापूरचे योगदान मोलाचे राहिले. प्रतापगडावर अफझलखानाचा वध केल्यानंतर महाराज स्वस्थ बसले नाहीत, तर त्यांनी गोमंतक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्याची तयारी राजापुरातच झाली होती. इथे राजांची फौज तैनात ठेवण्यात आली होती. अशा या राजापूरला हृदयस्पर्शी इतिहास आहे. अनेक वर्षांची शिव चरित्र्याची तपश्चर्या सर्वजण अनुभवत होते. या चरित्राचा बोध घ्या व आचरण करा. विझलेल्या निखाऱ्याप्रमाणे न राहता धगधगत्या राखेतील निखाऱ्याप्रमाणे जीवन जगा, तरच तुम्हाला शिवचरित्र खऱ्या अर्थाने कळले, असा त्याचा अर्थ होईल, असा उपदेश करुन पुरंदरेंनी आपले व्याख्यान संपवले. (प्रतिनिधी)पुरंदरे उवाचराजापूरच्याच भूमीत बाळाजी आवजी चित्रे यांच्यासारखा हिरा राजांना लाभला. जीर्णावस्थेतील वखार पाडणे ही मोठी चूक होती.इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी राजापूरची वखार महाराजांच्या आदेशानुसार लुटली गेली.राजापूरला हृदयस्पर्शी इतिहास.