शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाचा कहर

By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST

संततधार सुरूच : गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण

वेंगुर्ले, कणकवली : कोकणवासीयांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी सणासाठी सध्या सर्वत्र लगबग सुरू आहे. हारतुरे, रोषणाई, मिठाई, फटाके, फळे यांची दुकाने सजली आहेत. परंतु बुधवारी सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने शहरात सामानखरेदीसाठी गर्दी कमी होती. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये आणि शहरांमध्ये अशी स्थिती होती.माटवीसाठी लागणारे साहित्य, ग्रामीण भागातील भाजी आज सकाळपासून बाजारात विक्रीला आली होती. बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी वाहनांना बाजारपेठेतील रस्त्यावरून बंदी करण्यात आली आहे. भजनासाठी लागणाऱ्या वाद्याच्या कारागिरांना या महिन्यात चांगली मागणी असते. स्थानिकांबरोबरच सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर आदी भागातून हे कारागीर या महिन्यात कोकणात हजेरी लावतात. गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत मूर्तिकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरात प्लास्टिक व कागदी हार, मिठाई, फटाके, अगरबत्ती, फळे, अगरबत्ती यांची दुकाने सजली आहेत. जनजीवन विस्कळीतसावंतवाडी : तालुक्याभरात आज बुधवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले. गणेश चतुर्थी असतानाही बाजारपेठ व रस्तेही मोकळेच दिसत होते. यामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम या संततधार पावसाने केले आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही नुकसानी झालेली नाही. तालुक्यात दिवसभरात ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण २६२0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, गणेश उत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांसह भक्तांना पुरते नकोसे करुन टाकले आहे. संततधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. उद्या पावसाने विश्रांती घेण्याची गरज आहे. अन्यथा गणपतीला घरोघरी आणताना लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. (वार्ताहर)