शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सिंधुदुर्गात पावसाचा कहर

By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST

संततधार सुरूच : गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण

वेंगुर्ले, कणकवली : कोकणवासीयांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेश चतुर्थी सणासाठी सध्या सर्वत्र लगबग सुरू आहे. हारतुरे, रोषणाई, मिठाई, फटाके, फळे यांची दुकाने सजली आहेत. परंतु बुधवारी सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने शहरात सामानखरेदीसाठी गर्दी कमी होती. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये आणि शहरांमध्ये अशी स्थिती होती.माटवीसाठी लागणारे साहित्य, ग्रामीण भागातील भाजी आज सकाळपासून बाजारात विक्रीला आली होती. बाजारात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी चारचाकी वाहनांना बाजारपेठेतील रस्त्यावरून बंदी करण्यात आली आहे. भजनासाठी लागणाऱ्या वाद्याच्या कारागिरांना या महिन्यात चांगली मागणी असते. स्थानिकांबरोबरच सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर आदी भागातून हे कारागीर या महिन्यात कोकणात हजेरी लावतात. गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार गणेश मूर्तींवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याबाबत मूर्तिकारांतून नाराजी व्यक्त होत आहे. शहरात प्लास्टिक व कागदी हार, मिठाई, फटाके, अगरबत्ती, फळे, अगरबत्ती यांची दुकाने सजली आहेत. जनजीवन विस्कळीतसावंतवाडी : तालुक्याभरात आज बुधवारी दिवसभर पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत करुन टाकले. गणेश चतुर्थी असतानाही बाजारपेठ व रस्तेही मोकळेच दिसत होते. यामुळे गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम या संततधार पावसाने केले आहे.सावंतवाडी तालुक्यात दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे कोणतीही नुकसानी झालेली नाही. तालुक्यात दिवसभरात ४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण २६२0 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मात्र, गणेश उत्सवाकरिता आलेल्या चाकरमान्यांसह भक्तांना पुरते नकोसे करुन टाकले आहे. संततधार पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे. उद्या पावसाने विश्रांती घेण्याची गरज आहे. अन्यथा गणपतीला घरोघरी आणताना लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. (वार्ताहर)