शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार

By admin | Updated: August 2, 2016 01:29 IST

दोन विद्यार्थी पुरात बुडाले : भुईबावडात दरड कोसळली, बांदा परिसराला वेढा

सिंधुदुर्ग : वेधशाळेने कोकण किनारपट्टीत येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाच्या दिलेल्या इशाराप्रमाणे सिंधुदुर्गात सोमवारी सकाळपासूनच पावसाने संततधार बरसत हाहाकार माजविला. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सतत कोसळणाऱ्या पावसाने हाहाकार माजविला असून, कुडाळ तालुक्यातील पाट हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजचे मराळवाडी येथील बारावीत शिकणारे दोन विद्यार्थी ओहोळाला आलेल्या पुरात वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हे दोघेही मित्र असून, पाट हायस्कूलमध्ये बारावीत कॉमर्स शाखेत शिकत होते. दरम्यान, त्यांच्या या आकस्मित निधनाने पाट गावावर शोककळा पसरली असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. ओटवणेतील चार, तर सावंतवाडी-उभागुंडा येथील आठ घरांमध्ये पाणी घुसल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे सावंतवाडी आगाराने चार एसटी फेऱ्याही रद्द केल्या आहेत. सावंतवाडी व बांदा बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पुराच्या पाण्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. येथील गोठोस्कर मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरू असतानाच पाणी घुसल्याने वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)पुराचे पाणी लग्नमंडपातसावंतवाडीतील गोठोस्कर यांच्या श्री मंगल कार्यालयात सोमवारी विवाह समारंभ होता. मात्र, रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने मंगल कार्यालयालगतच्या ओहोळाला पूर आल्याने सर्व पाणी मंगल कार्यालयात घुसले. त्यामुळे मंगल कार्यालयात वऱ्हाडी मंडळींचीे एकच तारांबळ उडाली. अनेक वस्तू पुरात वाहून गेल्या. पाण्यात खुर्च्याही तरंगत होत्या. मात्र, लग्नकार्य सुरळीत पार पडले.चोरद नदीला पूर; ४० गावांचा संपर्क तुटलापाचव्या दिवशीही मुसळधार : पावसाने आषाढ गाजविलारत्नागिरी : महिनाभर संततधार सुरू ठेवणाऱ्या पावसाने शेवटचे सलग पाच दिवस मुसळधार वृष्टी करून आषाढ महिना चांगलाच गाजविला. जिल्ह्यात जोरदार कोसळणाऱ्या सरींमुळे अनेक मार्गांवर दरडी, झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. खेडमध्ये चोरद नदी पुलावरून पाणी वाहू लागल्याने तब्बल तीन तास ४0 गावांशी असलेले दळणवळण ठप्प झाले होते. आणखी दोन दिवस पावसाचा असाच जोर राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने चांगलाच जोर घेतला आहे. गतवर्षी जूनमध्ये वेळेवर सुरुवात होऊनही पावसाने जुलै आणि आॅगस्टमध्ये दडी मारली होती. त्यामुळे गतवर्षी सर्वांत नीचांकी पाऊस झाला होता. मात्र, गेल्या सप्टेंबरपर्यंतची म्हणजे तब्बल चार महिन्यांचा कोटा पावसाने यंदा जुलैअखेर पूर्ण केला आहे. त्यामुळे यावेळी शेतीची कामे पूर्ण झाल्याने बळिराजा समाधानी आहे.गत आठवड्यातील गुरुवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. जराही विश्रांती न घेता पाऊस पडत आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली; मात्र सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७९० मिलिमीटर (सुमारे ८ इंच) पावसाची नोंद झाली आहे.या २४ तासांत जोरदार वृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यावर दरड कोसळणे, जुनाट झाडे कोसळणे, आदी प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आलेल्या माहितीनुसार, शेणाली घाटात रस्त्यावर माती व झाड पडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते बाजूला केले आहे. मंडणगड-खेड रस्त्यावर कोसळलेली दरडही बाजूला करण्यात आली असून, वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.खेड तालुक्यातील खोपी फाट्यावर रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली शाळा क्र. १ ची भिंत पडली आहे. गुहागर - चिपळूण - कऱ्हाड रस्त्यावर झाड पडले होते, तेही बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शेंबवणे (ता. संगमेश्वर) येथे एका गोठ्याचे