शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दणका

By admin | Updated: November 21, 2015 23:57 IST

कलंबिस्त येथे वीज कोसळली : तिघे बचावले; घराचे नुकसान, वीज उपकरणे खाक

सिंधुदुर्गनगरी : शनिवारी मालवणसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मालवण शहरात माड वीज खांबावर कोसळून वाहिन्या तुटून पडल्याने नुकसान झाले. सलग दोन दिवस देवगडमध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त-घनशेळवाडी येथे राहणाऱ्या सावंत कुटुंबीयांच्या घरावर वीज कोसळल्याने हे कुटुंब थोडक्यात बचावले. घराची प्रचंड हानी झाली आहे. कलंबिस्त येथे अनंत शिवराम सावंत यांच्यासह त्यांची पत्नी अपर्णा व मुलगा चेतन हे तिघे घरात होते. विजेचा लोळ घरावर कोसळताच घरातील सर्वजण बाहेर आल्याने हे कुटुंब बचावले. मात्र, विजेच्या तडाख्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे, तर घरातील विजेची साधने जळून खाक झाली. घराच्या मागील भिंतीला मोठे तडे गेले आहेत. अन्य भिंतींना लहान भेगा गेल्याने कुटुंब भयभीत झाले आहे. उशिरापर्यंत याबाबत महसूल विभागाला माहिती नव्हती. जिल्ह्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने शनिवारी मालवण तालुक्याला दमदार सरींनी झोडपले. दुपारनंतर तालुक्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. पावसात वाऱ्याचाही जोर वाढल्याने पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील भरड परिसरातील मयेकर कुटुंबीयांचा माड रस्त्यावर कोसळल्याने वीज खांब तसेच वीज वाहिन्याही तुटून गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांच्यासह नागरिकांनी रस्त्यावर कोसळलेला माड बाजूला केला. मात्र, वीजवाहिन्या रस्त्यावर पडल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील अनेक गावांतही भातकापणी करत असलेल्या शेतकऱ्यांचे व आंबा काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. काही गावांत वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. देवगड तालुक्यामध्ये गेले दोन दिवस सलग अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पीक धोक्यात आले आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली होती. विजयदुर्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात, तर देवगड परिसरामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडला. शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयदुर्ग, गिर्ये, पुरळ, पडेल, वाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर देवगड, जामसंडे, तळेबाजार, कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या. यामुळे आंबा कलमावर आलेला मोहोर काळा पडून वाया जाण्याची शक्यता जाणकार बागायदारांकडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गेली आठ वर्षे सातत्याने अवकाळी पाऊस पडून आंबा पिकाचे नुकसान होत आहे. याहीवर्षी मोहोर येण्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत. अवकाळी पडलेल्या पावसामुळे आलेला मोहोर वाया जातो, कलमांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. अवकाळीने कुडाळ तालुक्यातही मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली असून या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. सायंकाळी त्याने विश्रांती घेतली. (प्रतिनिधी)