शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दणका

By admin | Updated: November 21, 2015 23:57 IST

कलंबिस्त येथे वीज कोसळली : तिघे बचावले; घराचे नुकसान, वीज उपकरणे खाक

सिंधुदुर्गनगरी : शनिवारी मालवणसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मालवण शहरात माड वीज खांबावर कोसळून वाहिन्या तुटून पडल्याने नुकसान झाले. सलग दोन दिवस देवगडमध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त-घनशेळवाडी येथे राहणाऱ्या सावंत कुटुंबीयांच्या घरावर वीज कोसळल्याने हे कुटुंब थोडक्यात बचावले. घराची प्रचंड हानी झाली आहे. कलंबिस्त येथे अनंत शिवराम सावंत यांच्यासह त्यांची पत्नी अपर्णा व मुलगा चेतन हे तिघे घरात होते. विजेचा लोळ घरावर कोसळताच घरातील सर्वजण बाहेर आल्याने हे कुटुंब बचावले. मात्र, विजेच्या तडाख्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे, तर घरातील विजेची साधने जळून खाक झाली. घराच्या मागील भिंतीला मोठे तडे गेले आहेत. अन्य भिंतींना लहान भेगा गेल्याने कुटुंब भयभीत झाले आहे. उशिरापर्यंत याबाबत महसूल विभागाला माहिती नव्हती. जिल्ह्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने शनिवारी मालवण तालुक्याला दमदार सरींनी झोडपले. दुपारनंतर तालुक्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. पावसात वाऱ्याचाही जोर वाढल्याने पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील भरड परिसरातील मयेकर कुटुंबीयांचा माड रस्त्यावर कोसळल्याने वीज खांब तसेच वीज वाहिन्याही तुटून गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांच्यासह नागरिकांनी रस्त्यावर कोसळलेला माड बाजूला केला. मात्र, वीजवाहिन्या रस्त्यावर पडल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील अनेक गावांतही भातकापणी करत असलेल्या शेतकऱ्यांचे व आंबा काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. काही गावांत वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. देवगड तालुक्यामध्ये गेले दोन दिवस सलग अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पीक धोक्यात आले आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली होती. विजयदुर्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात, तर देवगड परिसरामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडला. शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयदुर्ग, गिर्ये, पुरळ, पडेल, वाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर देवगड, जामसंडे, तळेबाजार, कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या. यामुळे आंबा कलमावर आलेला मोहोर काळा पडून वाया जाण्याची शक्यता जाणकार बागायदारांकडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गेली आठ वर्षे सातत्याने अवकाळी पाऊस पडून आंबा पिकाचे नुकसान होत आहे. याहीवर्षी मोहोर येण्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत. अवकाळी पडलेल्या पावसामुळे आलेला मोहोर वाया जातो, कलमांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव वाढतो. अवकाळीने कुडाळ तालुक्यातही मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली असून या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. सायंकाळी त्याने विश्रांती घेतली. (प्रतिनिधी)