शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या टीमसाठी ममता बॅनर्जीची सहमती, टीएमसीचे अभिषेक बॅनर्जी परदेश दौऱ्यावर जाणार
3
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
4
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
5
Jyoti Malhotra : आधी घेतली मुलीची बाजू, आता मात्र युटर्न! ज्योती मल्होत्राचे वडील म्हणतात, "मला माहीत नाही..." 
6
Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
7
आता फ्रॉडचं नो टेन्शन! पेमेंट करण्यापूर्वी फॉलो करा 'ही' सरकारी ट्रिक; कोणीही घालणार नाही गंडा
8
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
9
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
10
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
11
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
12
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
13
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
14
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
15
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
16
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
17
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
18
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
19
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
20
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती

रेल्वेच्या प्रवाशांनीही घेतला धसका

By admin | Updated: August 7, 2016 01:02 IST

गाड्या रिकाम्याच : प्रवासी संख्या रोडावली, आरक्षण कक्षांमध्येही शुकशुकाट

रत्नागिरी : महाडमध्ये पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी व पावसाच्या कोसळधारा या पार्श्वभूमीवर एस. टी. व अन्य खासगी वाहनांद्वारे होणारी प्रवासी वाहतूक रोडावली आहे. कोकण रेल्वेकडे हे प्रवासी वळतील अशी शक्यता होती. मात्र, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्यांकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली असून, अनेक रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. महाडमधील दुर्घटनेची दहशत अद्यापही जनमनावर दिसून येत आहे. मुसळधार पाऊस, तुफानी वारे व महाडची दुर्घटना या सर्वच पार्श्वभूमीवर प्रवासाला बाहेर पडण्यापेक्षा घरीच थांबणे अनेकांनी पसंत केले आहे. महाड-पोलादपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री कोसळून त्यावरून सावित्री नदीत दोन एस. टी.बस व तवेरासह अन्य वाहने कोसळली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मृतदेह शोधण्याचे कार्य अद्यापही सुरूच आहे. ४०पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून, त्यातील २१ मृतदेह किनाऱ्यांवर, खाड्यांमधून सापडले आहेत. या थरकाप उडविणाऱ्या दुर्घटनेमुळे सारेच धास्तावले आहेत. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच रोडावले आहे. रत्नागिरीतून सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रेल्वेगाडी नेहमीच प्रवाशांनी भरून वाहते. मात्र, महाडच्या पूल दुर्घटनेनंतर या गाडीलाही प्रवासी संख्या रोडावली आहे. सावंतवाडीहून जाणारी राज्यराणी, दिवा पॅसेंजर, मडगाववरून सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही प्रवासी संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. येत्या रविवारी (७ आॅगस्ट) नागपंचमी सण असूनही मुंबईहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात कोसळधारांचे थैमान आहे. नदीनाले भरले आहेत. पूरसदृश स्थिती असल्याने प्रवासाला बाहेर पडणे धोकादायक असल्यानेच प्रवासीसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकांवरील आरक्षण कक्षाकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आजही या कक्षात शुकशुकाट दिसत होता. एकूणच महाडच्या दुर्घटनेची दहशत कमी होण्यास आठवडाभराचा कालावधी जाणार असल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)मुंबई मार्गावर एस. टी.चेही भारमान घटलेमहामार्गावरून कंटेनरला बंदीवाहतूक शाखेचा निर्णय : मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरुच