शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

बेळणे, नांदगाव पूल धोकादायक

By admin | Updated: August 6, 2016 00:20 IST

मुंबई-गोवा महामार्ग : प्रश्न ऐरणीवर ; आणखी प्रतिक्षा किती करायची?

निकेत पावसकर -- नांदगाव  -महाडजवळ सावित्री नदीवरील घडलेल्या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटीशकालीन तसेच आयुर्मर्यादा संपलेल्या पुलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच महामार्गावर ७५ वर्षांपुर्वी उभारलेला पियाळी नदीवरील नांदगाव पूल व ५५ वर्षांपूर्वीचा बेळणे नदीवरील बेळणे पूल असून हे दोन्ही पूल वाहतूकीस धोकादायक बनले आहेत. सावित्रीच्या घटनेनंतर प्रशासन जागे होऊन या पुलांचे काम होईल का? असा प्रश्न वाहन चालक व परिसरातील नागरिक विचारीत आहेत. या महामार्गावर १९६१ साली बांधलेला बेळणे पूल तर १९४१ साली बांधलेला नांदगाव पूल आहे. दोन्ही पुलांची सद्यस्थिती अत्यंत बिकट झाली असून ते वाहतूकीस धोकादायक बनले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित विभागांकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या पडताळणीमध्ये हे दोन्ही पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल मिळत आला आहे. दरवर्षी कोकणात पडणारा प्रचंड पाऊस आणि या महामार्गावरून अतिअवजड वाहनांची अहोरात्र सुरू असणारी वाहतूक यामुळे हे पूल किती वर्ष तग धरून राहतील. याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. असे पूल बांधताना त्यांची आयुर्मर्यादा निश्चित केलेली नसते. मात्र दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसानंतर बांधकामाचे निरिक्षण होते. या निरिक्षणात बांधकाम पाहिले जाते. पूल व्हायब्रेट होतो का? आणि अवजड वाहने जाताना पूल हादरतो का? याची पाहणी केली जाते. त्यानुसार हे पूल सुस्थितीत असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे, असे महामार्ग प्राधिकरण सावंतवाडी व रत्नागिरी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. या दोन्ही पुलांची आणि रस्त्याची सद्यस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलावर पाणी साचून राहते. पियाळी नदी मोठी असल्याने येथे सर्वाधिक धोका संभवतो. अनेकदा या पुलाचे संरक्षक कठडे तुटून पडतात. अशावेळी अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष जात नाही. एखादी दुदैवी घटना घडल्यास या अधिकाऱ्यांना जाग येते. विशेष म्हणजे या संरक्षक कठड्यांना दरवर्षी रंगरंगोटी करण्याखेरीज इतर कोणतेच काम संबंधित विभागाकडून होताना दिसत नाही. महाडच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील बिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्याची घोषणा केली आहे. अश प्रकरणात केवळ आॅडीट न करता दोन्ही पुलांना पर्यायी व्यवस्था केली पाहिजे. अन्यथा चौपदरीकरणाच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. बेळणे आणि नांदगाव पुलाबाबत अजून किती प्रतिक्षा करायची असा प्रश्न विचारला जात आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातही काही पुलांचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. मात्र या पुलाला पर्यायी व्यवस्था किंवा पर्यायी पूल अद्याप उभारले नाहीत. चौपदरीकरण पूर्ण होईपर्यंत जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागणार आहे. महामार्गावरील खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजवावेतबेळणे पुलासह नांदगाव पुलावर व या परिसरात पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी नांदगाव-बेळणे परिसरातील ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी कोकणात मोठ्या प्रमाणावर भाविक विविध भागातून येत असतात. त्यावेळी कोणतीही दुदैवी घटना घडू नये यासाठी खड्डे बुजवावेत या मागणीने जोर धरला आहे.