शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

कणकवलीची राडे संस्कृती सावंतवाडीत नको

By admin | Updated: September 15, 2014 23:29 IST

दीपक केसरकर यांची टीका : किनळे येथील कार्यक्रमात प्रतिपादन

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्याला बापूसाहेबांचा वारसा आहे. सर्व लोकांना एकत्र ठेवण्याची किमया त्यांच्यामध्ये होती. ती किमया टिकविण्याची गरज आहे. यामुळे कणकवलीची राडे संस्कृती या सावंतवाडीत आणू देऊ नका आणि सावंतवाडीत प्रेमाची संस्कृती चालते हे दाखवून द्या, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. किनळे येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, एकनाथ नारोेजी, सावंतवाडी नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रुपेश राऊळ, मंगेश तळवणेकर, भाई देऊलकर, किनळे सरपंच यशोदा नाईक, उपसरपंच पांडुरंग नाईक आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. याआधी मी केलेल्या कामांचे नारळ विरोधी नेते मंडळींनी फोडले. गेल्या पाच वर्षात मला मारण्याची धमकी देऊन एकही आमसभा घेऊ दिली नाही. माजी आमदार शंकर कांबळी म्हणाले, माजी आमदार राजन तेली यांनी हिंमत असेल, तर नारायण राणे यांचा पुत्र ज्या मतदार संघात लढणार आहे, त्या मतदार संघात लढवून दाखवावे. नारायण राणे आणि आपले संबंध बिघडायला राजन तेली हेच जबाबदार आहेत. तसेच मंगेश तळवणेकर हेसुध्दा काँग्रेसमधून बाहेर पडण्यास तेलीच कारणीभूत आहेत. वेळोवेळी राणे यांचे कान भरून काँग्रेसमधून चांगले पदाधिकारी बाहेर काढण्याचे काम तेलींनी केले आहे. त्यामुळेच त्यांची राणेंविरोधात लढण्याची हिंमत होत नसून ते कोणताही संबंध नसताना सावंतवाडी मतदार संघातून लढत आहेत. त्यांना सावंतवाडीची जनता योग्य जागा दाखवेल, असे कांबळी यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)