शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सिंधुदुर्ग येथे राबविले स्वच्छता अभियान

By admin | Updated: October 2, 2016 23:27 IST

: पाचशेहून अधिक शिवप्रेमींचा सहभाग

 मालवण : महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग व गडकिल्ले संवर्धन समिती गडकिल्ले स्वच्छता अभियानाअंतर्गत किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती व सेवाभावी संस्था यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘महा’स्वच्छता अभियानाला शिवप्रेमी व किल्लेप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या पर्यटनाची शान असलेल्या ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर पुरातत्व विभाग व गडकिल्ले संवर्धन समितीच्यावतीने जिल्ह्यात पहिलीच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मालवणसह जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर येथील सेवाभावी संस्थांनी स्वागतार्ह सहभाग दर्शविला. राज्यातील गडकिल्ले स्वच्छतेतून संवर्धनाचा संदेश या अभियानातून देण्यात आला. मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत संयुक्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील सतरा सेवाभावी संस्था तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोहिमेत प्लास्टिक बाटल्या, वेष्टने, पिशव्या यासह किल्ल्यातील गोड्या पाण्याच्या विहिरी, मंदिरे, महाराजांच्या हाताचे व पायांचे ठसे, चुना तयार करण्याची जागा आदी ठिकाणी वाढलेली झाडी-झुडपे प्रामुख्याने हटविण्यात आली. या मोहिमेत शंभराहून अधिक गोण्या कचरा गोळा करण्यात आला, अशी माहिती प्रेरणोत्सव समिती सचिव विजय केनवडेकर यांनी दिली. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी डॉ. अमर अडके यांनी स्वच्छतेचे महत्त्व विषद करून उपस्थित शिवप्रेमींना स्वच्छता कामाची विभागणी करून देण्यात आली. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, तहसीलदार वीरधवल खाडे, बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, बांधकाम विभागाचे प्रदीप पाटील, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, श्रीराम सकपाळ, भाऊ सामंत, गणेश कुशे, दत्तात्रय नेरकर, संजय गावडे, डॉ. रामचंद्र काटकर, अनिल न्हिवेकर, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हेमंत प्रभू, नागेश कदम, योगेश पटकारे यांच्यासह किल्लेप्रेमी, नागरिक, विद्यार्थी तसेच किल्ले सिंधुदुर्ग रहिवासी संघ, किल्ले प्रवासी होडी व्यावसायिक संघटना, शिवशक्ती पर्यटन होडी संघटना, व्यापारी संघ, आस्था ग्रुप, झेप घे भरारी युवा मंच, रोटरी क्लब, लायन्स-लायनेस क्लब, शिवाजी वाचन मंदिर, सिंधुदुर्ग महाविद्यालय, अध्यापिका महाविद्यालय, मालवण पत्रकार समिती, फोटोग्राफर्स असोसिएशन, मैत्रय प्रतिष्ठान-कोल्हापूर अशा सतरा सेवाभावी संस्था व सुमारे ५०० हून अधिक किल्लेप्रेमी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. राज्यात गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरु झाली असून किल्ल्यांचे संवर्धन करणार असल्याचे डॉ. अडके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आगामी काळात तालुक्यातील चिंदर येथील भगवंतगड, मसुरे येथील भरतगड, रामगड यासह अनेक किल्ल्यांची डागडुजी, संवर्धन व स्वच्छता केली जाणार आहे. चतु:सूत्री कार्यक्रमांतर्गत किल्ल्यांवर स्वच्छता, किल्ल्यांचे संवर्धन व जतन असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अमर अडके यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी) तालुक्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन होणार शासनाच्या किल्ले संवर्धन समितीच्या माध्यमातून अनेक गड-किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. मालवणसह जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर येथील सेवाभावी संस्थांनी स्वागतार्ह सहभाग दर्शवला. राज्यातील गडकिल्ले स्वच्छतेतून संवर्धनाचा संदेश या अभियानातून देण्यात आला.