शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जागा दिल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेत्ये गावात क्वॉयर युनिट : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 16:16 IST

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे, जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. सिंधुदुर्गसाठी १२ क्वॉयरचे युनिट मंजूर झाले आहेत. त्यापैकी एक युनिट वेत्ये गावाला देण्यात येईल. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेत्ये येथे केले.

ठळक मुद्देग्रामसचिवालयाचे भूमिपूजनमहिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार

तळवडे : जनतेने मला जिल्ह्याच्या विकासासाठी निवडून दिले आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे, जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.

सिंधुदुर्गसाठी १२ क्वॉयरचे युनिट मंजूर झाले आहेत. त्यापैकी एक युनिट वेत्ये गावाला देण्यात येईल. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेत्ये येथे केले.वेत्ये येथील नूतन ग्रामसचिवालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, तहसीलदार सतीश कदम, प्रभारी गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सरपंच सुनील गावडे, नूतन सरपंच स्नेहा मिठबावकर, नरेंद्र मिठबावकर, रमेश गावकर, माजी पंचायत समिती सदस्य बबन राणे, मोहन गावकर, विजय जाधव, बुधाजी गावडे, सोनुर्ली सरपंच गुुजन हिराप यांच्यासह वेत्ये येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री केसरकर म्हणाले, वेत्ये गावातील ग्रामस्थांची एकजूट कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. कोणतेही काम यशस्वी करायचे असल्यास एकजूट महत्त्वाची आहे. वेत्ये गावातील कोणतेही विकासकाम असो, ते पूर्ण करून दिले जाईल. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आज बेकारीचे प्रमाण वाढले आहे. शासनाने अनेक योजना आणल्या आहेत, त्यांचा लाभ घ्या, असे आवाहन केले.

आपल्याला मिळालेल्या पदाचा गावच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयोग करा. पर्यटन विकास असो किंवा अन्य कोणताही प्रकल्प असो, गाव हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपल्या गावाचा विकास करा. त्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले. 

ग्रामस्थांतर्फे सत्कारवेत्ये ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे काम बरीच वर्षे रखडले होते. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण होत आहे. त्यामुळे वेत्ये येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी ग्रामस्थांच्यावतीने पालकमंत्री दीपक केसरकर व जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग