शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून ऐरणीवरच!

By admin | Updated: November 18, 2015 00:03 IST

कृषी कार्यालय : आठजणांना सोडले वाऱ्यावर

देवरुख : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ‘कृषितज्ज्ञ’ आठ कर्मचाऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाने गेल्या महिनाभरापासून वाऱ्यावरच सोडले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्याप अधिकारीच उपलब्ध होऊ शकलेले नसल्याने पाणलोटच्या त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.हे कंत्राटी कर्मचारी ५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे या कार्यालयात कृषितज्ज्ञ या पदावर कंत्राटी म्हणून कामावर होते. मात्र, पाणलोट विकास कार्यक्रम पूर्ण झालेला नसतानाही तालुका कृषी विभागाने आठ कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. इतर तालुक्यांप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात त्यांना पुन्हा सामावून घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच हे स्थानिक कर्मचारी संतापले आहेत.यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे जिल्हा पातळीवरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून नेत्यांची भेट घेऊन मांडले होते. याचा जाब विचारण्यासाठी तालुका कृषी कार्यालयावरच जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तालुका कृषी अधिकारी दिवाळीपूर्वी सुटीवर गेल्याने आपले म्हणणे मांडता येणार नाही, याची खात्री झाल्यावर दिवाळीपूर्वी १६ तारखेला सोमवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. सोमवारीही अधिकारी तालुका कृषी कार्यालयात न आल्याने दुसऱ्यांदा आपले म्हणणे त्या आठ कर्मचाऱ्यांना मांडता आले नाही.सुटी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी कार्यालयात हजर राहतात. मात्र, सोमवारी तसे न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताहेत की? असा सवालच स्थानिकांच्या मनात उभा राहिला आहे.सोमवारी याबाबत त्यांच्याशी आमदारांनी संपर्क साधला असता दोन दिवसानंतर आपण भेटू, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात प्रकल्प कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामाईक मार्गदर्शक सुचना २००८ (सुधारित २०११) नुसार करण्यात आली आहे. यानुसारच हे स्थानिक ‘आठ कर्मचारी’ ‘कृ षितज्ज्ञ’ म्हणून या प्रकल्पांतर्गत संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात कंत्राटी स्वरुपात काम करीत होते. त्यांचा नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५पर्यंत करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचे देखील असताना तालुका कृषी अधिकारी मुद्दामहून त्या स्थानिक आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलताना दिसत आहेत. म्हणूनच गेल्या महिन्यापासून ते कर्मचारी वाऱ्यावरच आहेत. मात्र त्यांची समस्या अजूनही ऐरणीवरच आहे. (प्रतिनिधी)हा प्रश्न ‘लोकमत’ने प्रथम लावून धरल्याने कृषी जिल्हा यंत्रणा स्तरावरुन हालचाली निर्माण झाल्या होत्या. तशी फोनाफोनी सुरु होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण ऐरणीवर आले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याने पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही टांगताच आहे.संगमेश्वर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाचा मनमानीपणा.तालुका कृ षी अधिकारी करताहेत दुर्लक्ष; स्थानिकांना डावलण्याचा घाट.त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेत नसल्याने होतोय संताप.अन्य तालुक्यांप्रमाणेच सामावून घेण्याची होतेय मागणी.