शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजून ऐरणीवरच!

By admin | Updated: November 18, 2015 00:03 IST

कृषी कार्यालय : आठजणांना सोडले वाऱ्यावर

देवरुख : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) या कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ‘कृषितज्ज्ञ’ आठ कर्मचाऱ्यांना तालुका कृषी कार्यालयाने गेल्या महिनाभरापासून वाऱ्यावरच सोडले आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अद्याप अधिकारीच उपलब्ध होऊ शकलेले नसल्याने पाणलोटच्या त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.हे कंत्राटी कर्मचारी ५ वर्षांपेक्षा अधिक वर्षे या कार्यालयात कृषितज्ज्ञ या पदावर कंत्राटी म्हणून कामावर होते. मात्र, पाणलोट विकास कार्यक्रम पूर्ण झालेला नसतानाही तालुका कृषी विभागाने आठ कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. इतर तालुक्यांप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात त्यांना पुन्हा सामावून घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळेच हे स्थानिक कर्मचारी संतापले आहेत.यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्हाणे जिल्हा पातळीवरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपासून नेत्यांची भेट घेऊन मांडले होते. याचा जाब विचारण्यासाठी तालुका कृषी कार्यालयावरच जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तालुका कृषी अधिकारी दिवाळीपूर्वी सुटीवर गेल्याने आपले म्हणणे मांडता येणार नाही, याची खात्री झाल्यावर दिवाळीपूर्वी १६ तारखेला सोमवारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे निश्चित केले होते. सोमवारीही अधिकारी तालुका कृषी कार्यालयात न आल्याने दुसऱ्यांदा आपले म्हणणे त्या आठ कर्मचाऱ्यांना मांडता आले नाही.सुटी संपल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिकारी कार्यालयात हजर राहतात. मात्र, सोमवारी तसे न झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताहेत की? असा सवालच स्थानिकांच्या मनात उभा राहिला आहे.सोमवारी याबाबत त्यांच्याशी आमदारांनी संपर्क साधला असता दोन दिवसानंतर आपण भेटू, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात प्रकल्प कालावधीमध्ये आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामाईक मार्गदर्शक सुचना २००८ (सुधारित २०११) नुसार करण्यात आली आहे. यानुसारच हे स्थानिक ‘आठ कर्मचारी’ ‘कृ षितज्ज्ञ’ म्हणून या प्रकल्पांतर्गत संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात कंत्राटी स्वरुपात काम करीत होते. त्यांचा नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५पर्यंत करण्यात आली होती. मात्र प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचे देखील असताना तालुका कृषी अधिकारी मुद्दामहून त्या स्थानिक आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना डावलताना दिसत आहेत. म्हणूनच गेल्या महिन्यापासून ते कर्मचारी वाऱ्यावरच आहेत. मात्र त्यांची समस्या अजूनही ऐरणीवरच आहे. (प्रतिनिधी)हा प्रश्न ‘लोकमत’ने प्रथम लावून धरल्याने कृषी जिल्हा यंत्रणा स्तरावरुन हालचाली निर्माण झाल्या होत्या. तशी फोनाफोनी सुरु होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण ऐरणीवर आले आहे. याप्रश्नी वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नसल्याने पाणलोटच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही टांगताच आहे.संगमेश्वर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालयाचा मनमानीपणा.तालुका कृ षी अधिकारी करताहेत दुर्लक्ष; स्थानिकांना डावलण्याचा घाट.त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेत नसल्याने होतोय संताप.अन्य तालुक्यांप्रमाणेच सामावून घेण्याची होतेय मागणी.