शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

गणेशोत्सवात पूजनासाठी पुरोहितांची तारांबळ

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

समस्या : भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटतेय

मिलिंद पारकर - कणकवली -गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी घरोघरी होणाऱ्या गणेश पूजनासाठी जाताना पुरोहितांची तारांबळ उडते. दिवसेंदिवस पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याने पहाटेपासून रात्रीपर्यंत पहिल्या दिवसाचे गणेशपूजन करण्याची वेळ येते. गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरच्या गणपतीची पूजा व्हावी यासाठी प्रत्येकजण आधीपासून गावातील भटजींना ‘आमच्याकडे आधी’ असे सांगून ठेवतो. तरीही सर्वांकडेच गणेशपूजन करायचे असल्याने पुरोहितांची दमछाक होते. प्रत्येकजण आपल्याकडे पुरोहितांना घेऊन जाण्यासाठी टपून असतो. यातून भटजींची पळवापळवी होते. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी गावच्या ब्राम्हणांकडून गणेशपूजन केले जाते. मात्र, गावातील पुरोहितांना गणेश पूजनासाठी पहाटेपासून पूजेला सुरूवात करावी लागते आणि सायंकाळपर्यंत घरोघर फिरून गणेशपूजन पार पाडावे लागते.जिल्ह्यात वे. मू. बाळकृष्ण कापडी वेदपाठशाळा, वागदे, वे.मू.मुरवणे गुरूजी वेदपाठशाळा, वायंगणी, दाभोली येथील पूर्णानंद स्वामी मठ, वासुदेवानंद सरस्वती वेदपाठशाळा, साळगांव, टेंबेस्वामी पाठशाळा माणगांव, सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळा या जिल्ह्यातील वेदपाठशाळांमधून एकूण ६० ते ७० विद्यार्थी भिक्षुकीचे शिक्षण घेतात. गणेश पूजनासाठी ब्राम्हणांची आयातगणेशोत्सवात पूजनासाठी ब्राम्हणांची मोठी कमतरता जाणवते. पहाटे अगदी ३ वाजल्यापासून पूजा सुरू करतात. तेव्हा कुठे सायंकाळपर्यंत गावातील पूजा आटोपतात. जिल्ह्यात सगळीकडेच ही कमतरता भरून काढण्यासाठी मग जिल्ह्याबाहेरून पुरोहित मागवले जातात. ग्रामपुरोहिताच्या हाताखाली हे पुरोहित काम करतात. नृसिंहवाडी आदी भागातून पुरोहित जिल्ह्यात दाखल होतात. भिक्षुकीपासून दूरब्राम्हण समाजातील नव्या पिढीतील मुले पारंपरिक भिक्षुकीचे शिक्षण घेण्यापेक्षा आता शाळा, कॉलेज करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. भिक्षुकीमधून उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकतो. परंतु भिक्षुकी करणाऱ्या मुलांकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तसेच पौरोहित्य करणाऱ्याला राजाश्रय मिळत नाही. विवाहासाठी मुलींकडून भिक्षुकी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात नाही. ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे भिक्षुकी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विवाहप्रसंगी अशा मुलांना मुलींकडून पसंती मिळत नाही. पौरोहित्याला राजाश्रय मिळत नाही. धार्मिकतेकडून भौतिकतेकडे ओढ यामुळे तरूण पिढी भिक्षुकीपासून दुरावत आहे.- बाळकृष्ण कापडे, वे. मूर्ती, वागदे