शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात पूजनासाठी पुरोहितांची तारांबळ

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

समस्या : भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटतेय

मिलिंद पारकर - कणकवली -गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी घरोघरी होणाऱ्या गणेश पूजनासाठी जाताना पुरोहितांची तारांबळ उडते. दिवसेंदिवस पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याने पहाटेपासून रात्रीपर्यंत पहिल्या दिवसाचे गणेशपूजन करण्याची वेळ येते. गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरच्या गणपतीची पूजा व्हावी यासाठी प्रत्येकजण आधीपासून गावातील भटजींना ‘आमच्याकडे आधी’ असे सांगून ठेवतो. तरीही सर्वांकडेच गणेशपूजन करायचे असल्याने पुरोहितांची दमछाक होते. प्रत्येकजण आपल्याकडे पुरोहितांना घेऊन जाण्यासाठी टपून असतो. यातून भटजींची पळवापळवी होते. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी गावच्या ब्राम्हणांकडून गणेशपूजन केले जाते. मात्र, गावातील पुरोहितांना गणेश पूजनासाठी पहाटेपासून पूजेला सुरूवात करावी लागते आणि सायंकाळपर्यंत घरोघर फिरून गणेशपूजन पार पाडावे लागते.जिल्ह्यात वे. मू. बाळकृष्ण कापडी वेदपाठशाळा, वागदे, वे.मू.मुरवणे गुरूजी वेदपाठशाळा, वायंगणी, दाभोली येथील पूर्णानंद स्वामी मठ, वासुदेवानंद सरस्वती वेदपाठशाळा, साळगांव, टेंबेस्वामी पाठशाळा माणगांव, सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळा या जिल्ह्यातील वेदपाठशाळांमधून एकूण ६० ते ७० विद्यार्थी भिक्षुकीचे शिक्षण घेतात. गणेश पूजनासाठी ब्राम्हणांची आयातगणेशोत्सवात पूजनासाठी ब्राम्हणांची मोठी कमतरता जाणवते. पहाटे अगदी ३ वाजल्यापासून पूजा सुरू करतात. तेव्हा कुठे सायंकाळपर्यंत गावातील पूजा आटोपतात. जिल्ह्यात सगळीकडेच ही कमतरता भरून काढण्यासाठी मग जिल्ह्याबाहेरून पुरोहित मागवले जातात. ग्रामपुरोहिताच्या हाताखाली हे पुरोहित काम करतात. नृसिंहवाडी आदी भागातून पुरोहित जिल्ह्यात दाखल होतात. भिक्षुकीपासून दूरब्राम्हण समाजातील नव्या पिढीतील मुले पारंपरिक भिक्षुकीचे शिक्षण घेण्यापेक्षा आता शाळा, कॉलेज करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. भिक्षुकीमधून उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकतो. परंतु भिक्षुकी करणाऱ्या मुलांकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तसेच पौरोहित्य करणाऱ्याला राजाश्रय मिळत नाही. विवाहासाठी मुलींकडून भिक्षुकी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात नाही. ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे भिक्षुकी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विवाहप्रसंगी अशा मुलांना मुलींकडून पसंती मिळत नाही. पौरोहित्याला राजाश्रय मिळत नाही. धार्मिकतेकडून भौतिकतेकडे ओढ यामुळे तरूण पिढी भिक्षुकीपासून दुरावत आहे.- बाळकृष्ण कापडे, वे. मूर्ती, वागदे