शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात पूजनासाठी पुरोहितांची तारांबळ

By admin | Updated: August 28, 2014 22:23 IST

समस्या : भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटतेय

मिलिंद पारकर - कणकवली -गणेशोत्सवात गणेश पूजनासाठी पुरोहितांची आवश्यकता असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी घरोघरी होणाऱ्या गणेश पूजनासाठी जाताना पुरोहितांची तारांबळ उडते. दिवसेंदिवस पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या घटत चालली असल्याने पहाटेपासून रात्रीपर्यंत पहिल्या दिवसाचे गणेशपूजन करण्याची वेळ येते. गणेश पूजनाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरच्या गणपतीची पूजा व्हावी यासाठी प्रत्येकजण आधीपासून गावातील भटजींना ‘आमच्याकडे आधी’ असे सांगून ठेवतो. तरीही सर्वांकडेच गणेशपूजन करायचे असल्याने पुरोहितांची दमछाक होते. प्रत्येकजण आपल्याकडे पुरोहितांना घेऊन जाण्यासाठी टपून असतो. यातून भटजींची पळवापळवी होते. प्रथेनुसार प्रत्येक ठिकाणी गावच्या ब्राम्हणांकडून गणेशपूजन केले जाते. मात्र, गावातील पुरोहितांना गणेश पूजनासाठी पहाटेपासून पूजेला सुरूवात करावी लागते आणि सायंकाळपर्यंत घरोघर फिरून गणेशपूजन पार पाडावे लागते.जिल्ह्यात वे. मू. बाळकृष्ण कापडी वेदपाठशाळा, वागदे, वे.मू.मुरवणे गुरूजी वेदपाठशाळा, वायंगणी, दाभोली येथील पूर्णानंद स्वामी मठ, वासुदेवानंद सरस्वती वेदपाठशाळा, साळगांव, टेंबेस्वामी पाठशाळा माणगांव, सावंतवाडी संस्कृत वेद पाठ शाळा या जिल्ह्यातील वेदपाठशाळांमधून एकूण ६० ते ७० विद्यार्थी भिक्षुकीचे शिक्षण घेतात. गणेश पूजनासाठी ब्राम्हणांची आयातगणेशोत्सवात पूजनासाठी ब्राम्हणांची मोठी कमतरता जाणवते. पहाटे अगदी ३ वाजल्यापासून पूजा सुरू करतात. तेव्हा कुठे सायंकाळपर्यंत गावातील पूजा आटोपतात. जिल्ह्यात सगळीकडेच ही कमतरता भरून काढण्यासाठी मग जिल्ह्याबाहेरून पुरोहित मागवले जातात. ग्रामपुरोहिताच्या हाताखाली हे पुरोहित काम करतात. नृसिंहवाडी आदी भागातून पुरोहित जिल्ह्यात दाखल होतात. भिक्षुकीपासून दूरब्राम्हण समाजातील नव्या पिढीतील मुले पारंपरिक भिक्षुकीचे शिक्षण घेण्यापेक्षा आता शाळा, कॉलेज करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे भिक्षुकी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. भिक्षुकीमधून उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ शकतो. परंतु भिक्षुकी करणाऱ्या मुलांकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तसेच पौरोहित्य करणाऱ्याला राजाश्रय मिळत नाही. विवाहासाठी मुलींकडून भिक्षुकी करणाऱ्या मुलांना पसंती दिली जात नाही. ब्राम्हण कुटुंबातील मुलांचे भिक्षुकी करण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. विवाहप्रसंगी अशा मुलांना मुलींकडून पसंती मिळत नाही. पौरोहित्याला राजाश्रय मिळत नाही. धार्मिकतेकडून भौतिकतेकडे ओढ यामुळे तरूण पिढी भिक्षुकीपासून दुरावत आहे.- बाळकृष्ण कापडे, वे. मूर्ती, वागदे