शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

नाटळ येथील विहिरीचे शुद्धीकरण

By admin | Updated: October 8, 2014 00:19 IST

आरोग्य विभागाकडून दखल : ‘ते’ सांडपाणी नाल्यात सोडले--लोकमतचा प्रभाव

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ जाधववाडीतील सार्वजनिक विहिरींमध्ये सांडपाणी जात असल्याने विहिरीचे पाणी दूषित झाले आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे वृत्त नुकतेच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने दखल घेत विहिरीचे पाणी शुद्धीकरण केले आहे. झिरपून जाणाऱ्या सांडपाण्याला वेगळा मार्ग काढून नाल्यात सोडण्यात आले आहे. आरोग्य विभागाने पाण्यात टीसीएल पावडर टाकून पाणी शुद्ध केले आहे. ग्रामपंचायतस्तरावर विहिरीची डागडुजी करण्याबाबत सरपंचांनी येथील ग्रामस्थांना ठोस आश्वासन दिले आहे.जाधववाडी येथील ही सार्वजनिक विहीर पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आली होती. सुमारे २०-२५ घरे या विहिरीवरून पाणी भरतात. या विहिरीची डागडुजी करून देण्याबाबत निधी मंजूर करून देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंचांनी येथील ग्रामस्थांना दिले आहे. विहिरीच्यानजिक असलेल्या घरमालकांना स्वच्छतेबाबत सरपंच व संबंधित खात्याने सक्त ताकीद दिली आहे. नाटळ ग्रामपंचायतीच्यावतीने विहिरीच्या आजूबाजूस साचलेला गाळ काढण्यात आला असून विहिरीचा परिसर निर्जंतुक करण्यात आला आहे. विहिरीत येणारे सांडपाणी, जनावरांचे मलमूत्र व शेण यांचा वेगळा मार्ग काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने आपल्या समस्यांची दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)